शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

ठाण्यात चक्क स्मशानभूमीचीच झाली चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 02:03 IST

ओवळा-माजिवडा मतदारसंघात पूर्वी ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या काळात नागरी वस्ती कमी असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात स्मशानभूमीची आवश्यकता भासत नव्हती.

ठाणे : शहरात पूर्वी अस्तित्वात असलेल्या स्मशानभूमीच्या जागेवर मोठमोठी गृहसंकुले उभी राहिली असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केला. या स्मशानभूमीच्या जागेवर इमारती उभारण्यास परवानगी कशी काय देण्यात आली, याची चौकशी करून चोरीला गेलेल्या स्मशानभूमींचा शोध महापालिकेने घ्यावा, अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे केली आहे.ओवळा-माजिवडा मतदारसंघात पूर्वी ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या काळात नागरी वस्ती कमी असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात स्मशानभूमीची आवश्यकता भासत नव्हती. त्यामुळे लक्ष्मी चिरागनगर परिसरातील नागरिक हे शेठ ग्रुपच्या सद्य:स्थितीत उभ्या असलेल्या वसंत लॉन्स गृहसंकुलाच्या नाल्याशेजारील जागेत अंत्यसंस्कार करत होते. वर्तकनगर, शिवाईनगर, शास्त्रीनगर परिसरातील नागरिक सध्या रस्ता नसलेल्या रामबाग व जुन्या कोंजेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करत होते. उपवन व पोखरण रोड नं. २ परिसरातील नागरिक हे आता उभ्या असलेल्या नीळकंठ गृहसंकुल परिसराच्या जागेत अंत्यसंस्कार करत होते. त्याचबरोबर लोकमान्यनगर परिसरातील नागरिक हे यशोधननगर, देवेंद्र इंडस्ट्रीजसमोरील नाल्यालगत उभ्या असलेल्या इमारतींच्या जागेत अंत्यसंस्कार करत होते. जुना कोकणीपाडा व वसंत विहार परिसरातील नागरिक हे कल्पतरू व नीळकंठ गृहसंकुलांच्या परिसरातील जागेत अंत्यसंस्कार करत होते, असे सरनाईक यांनी सांगितले. येऊर, पाटोणापाडा परिसरातील नागरिक हे खाजगी जागेवर आजही उघड्यावर अंत्यसंस्कार करत आहेत, तर पानखंडा गावात स्मशानभूमी वनखात्याच्या जागेत असल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार करत आहेत.पालिकेने शोध घेण्याची केली मागणीओवळा येथील काही नागरिक ब्ल्यू रूफ क्लबशेजारील दिलीप ओवळेकर यांनी बांधलेल्या जागेत अंत्यसंस्कार करत आहेत. भार्इंदरपाडा व आसपासचे नागरिक नागलाबंदरशेजारील मेरीटाइम बोर्डाच्या जागेवर उघड्यावर अंत्यसंस्कार करत आहेत. एकूणच ठाणे शहरात नवनवीन गृहसंकुले उभी राहत असल्याने या भागातील स्मशानभूमी चोरीला गेल्या की काय, असा प्रश्न त्यांनी केला असून गायब झालेल्या व चोरीला गेलेल्या स्मशानभूमीचा महापालिकेने शोध घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :thaneठाणे