शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

ठाण्यात चक्क स्मशानभूमीचीच झाली चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 02:03 IST

ओवळा-माजिवडा मतदारसंघात पूर्वी ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या काळात नागरी वस्ती कमी असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात स्मशानभूमीची आवश्यकता भासत नव्हती.

ठाणे : शहरात पूर्वी अस्तित्वात असलेल्या स्मशानभूमीच्या जागेवर मोठमोठी गृहसंकुले उभी राहिली असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केला. या स्मशानभूमीच्या जागेवर इमारती उभारण्यास परवानगी कशी काय देण्यात आली, याची चौकशी करून चोरीला गेलेल्या स्मशानभूमींचा शोध महापालिकेने घ्यावा, अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे केली आहे.ओवळा-माजिवडा मतदारसंघात पूर्वी ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या काळात नागरी वस्ती कमी असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात स्मशानभूमीची आवश्यकता भासत नव्हती. त्यामुळे लक्ष्मी चिरागनगर परिसरातील नागरिक हे शेठ ग्रुपच्या सद्य:स्थितीत उभ्या असलेल्या वसंत लॉन्स गृहसंकुलाच्या नाल्याशेजारील जागेत अंत्यसंस्कार करत होते. वर्तकनगर, शिवाईनगर, शास्त्रीनगर परिसरातील नागरिक सध्या रस्ता नसलेल्या रामबाग व जुन्या कोंजेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करत होते. उपवन व पोखरण रोड नं. २ परिसरातील नागरिक हे आता उभ्या असलेल्या नीळकंठ गृहसंकुल परिसराच्या जागेत अंत्यसंस्कार करत होते. त्याचबरोबर लोकमान्यनगर परिसरातील नागरिक हे यशोधननगर, देवेंद्र इंडस्ट्रीजसमोरील नाल्यालगत उभ्या असलेल्या इमारतींच्या जागेत अंत्यसंस्कार करत होते. जुना कोकणीपाडा व वसंत विहार परिसरातील नागरिक हे कल्पतरू व नीळकंठ गृहसंकुलांच्या परिसरातील जागेत अंत्यसंस्कार करत होते, असे सरनाईक यांनी सांगितले. येऊर, पाटोणापाडा परिसरातील नागरिक हे खाजगी जागेवर आजही उघड्यावर अंत्यसंस्कार करत आहेत, तर पानखंडा गावात स्मशानभूमी वनखात्याच्या जागेत असल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार करत आहेत.पालिकेने शोध घेण्याची केली मागणीओवळा येथील काही नागरिक ब्ल्यू रूफ क्लबशेजारील दिलीप ओवळेकर यांनी बांधलेल्या जागेत अंत्यसंस्कार करत आहेत. भार्इंदरपाडा व आसपासचे नागरिक नागलाबंदरशेजारील मेरीटाइम बोर्डाच्या जागेवर उघड्यावर अंत्यसंस्कार करत आहेत. एकूणच ठाणे शहरात नवनवीन गृहसंकुले उभी राहत असल्याने या भागातील स्मशानभूमी चोरीला गेल्या की काय, असा प्रश्न त्यांनी केला असून गायब झालेल्या व चोरीला गेलेल्या स्मशानभूमीचा महापालिकेने शोध घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :thaneठाणे