शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

ठाणे फेरीवाल्यांचे आवडते ‘स्थानक’

By admin | Updated: February 21, 2017 06:14 IST

रेल्वे स्थानकातील प्रवेशद्वारांवर तसेच पादचारी पुलांवर असणारे फेरीवाले आणि त्यांच्यामुळे गर्दीच्या वेळेत जाता-येता प्रवाशांना

मुंबई : रेल्वे स्थानकातील प्रवेशद्वारांवर तसेच पादचारी पुलांवर असणारे फेरीवाले आणि त्यांच्यामुळे गर्दीच्या वेळेत जाता-येता प्रवाशांना होणारा मनस्ताप आणि विरोध केल्यास फेरीवाल्यांकडून होणारी दादागिरी ही प्रवाशांना प्रत्यक्षात पाहण्यास व अनुभवण्यास मिळते. यातून प्रवाशांची सुटका करण्यासाठी मध्य रेल्वे आरपीएफकडून नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात फेरीवाल्यांविरोधात विशेष कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत १ हजार ४३२ फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचा विळखा असलेल्या ठाणे, कल्याण स्थानकांत आरपीएफकडून सर्वाधिक लक्ष केंद्रित करत जादा मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. फेरीवाल्यांच्या स्थानकांना असलेल्या विळख्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. फेरीवाल्यांना विरोध करताच त्यांच्याकडून प्रवाशांवर दादागिरीही केली जाते. त्यामुळे स्थानके फेरीवालामुक्त होणार कधी, असा प्रश्न उद्भवतो. पश्चिम रेल्वे आरपीएफने स्थानके पूर्णपणे फेरीवालामुक्त होऊ शकत नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर मध्य रेल्वे आरपीएफने मात्र फेरीवालामुक्त स्थानकांसाठी प्रयत्न चालवले आहेत. त्यादृष्टीने जानेवारी महिन्यात विशेष मोहीम हाती घेतली. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी सात पथके तयार करण्यात आली आहेत. यातील प्रत्येक पथकात एक अधिकारी आणि चार आरपीएफ जवान सामील आहेत. स्थानकांवर कारवाई करतानाच लोकलमधून विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. विशेष मोहिमेद्वारे जानेवारी महिन्यात १ हजार ४३२ जणांना पकडण्यात आले आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करीत ५ लाख ३८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. महत्त्वाची बाब म्हणजे ही कारवाई करताना कर्तव्यात कसूर ठेवणाऱ्या आरपीएफ अधिकारी आणि जवानांवरही कारवाई केली जाणार आहे. यात आतापर्यंत जवळपास ४ आरपीएफ कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात असल्याचे मध्य रेल्वे आरपीएफकडून सांगण्यात आले. यात दोषी आढळल्यास त्यांना दंड आकारला जाईल किंवा अन्य कारवाईचे पर्यायही असल्याचे मध्य रेल्वे आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी सांगितले. फेरीवाल्यांविरोधात सर्व स्थानकांवर कारवाई सुरू आहे. मात्र सर्वाधिक कारवाईसाठी जादा मनुष्यबळ हे ठाणे, कल्याण स्थानकांत तैनात करण्यात आले आहे. या दोन्ही स्थानकांत कारवाईसाठी प्रत्येकी १० जवान तैनात करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.