शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
4
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
5
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
6
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
7
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
8
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
9
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
10
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
11
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
12
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
13
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
14
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
15
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
16
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
17
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
18
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
19
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
20
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय

ठाणे फेरीवाल्यांचे आवडते ‘स्थानक’

By admin | Updated: February 21, 2017 06:14 IST

रेल्वे स्थानकातील प्रवेशद्वारांवर तसेच पादचारी पुलांवर असणारे फेरीवाले आणि त्यांच्यामुळे गर्दीच्या वेळेत जाता-येता प्रवाशांना

मुंबई : रेल्वे स्थानकातील प्रवेशद्वारांवर तसेच पादचारी पुलांवर असणारे फेरीवाले आणि त्यांच्यामुळे गर्दीच्या वेळेत जाता-येता प्रवाशांना होणारा मनस्ताप आणि विरोध केल्यास फेरीवाल्यांकडून होणारी दादागिरी ही प्रवाशांना प्रत्यक्षात पाहण्यास व अनुभवण्यास मिळते. यातून प्रवाशांची सुटका करण्यासाठी मध्य रेल्वे आरपीएफकडून नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात फेरीवाल्यांविरोधात विशेष कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत १ हजार ४३२ फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचा विळखा असलेल्या ठाणे, कल्याण स्थानकांत आरपीएफकडून सर्वाधिक लक्ष केंद्रित करत जादा मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. फेरीवाल्यांच्या स्थानकांना असलेल्या विळख्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. फेरीवाल्यांना विरोध करताच त्यांच्याकडून प्रवाशांवर दादागिरीही केली जाते. त्यामुळे स्थानके फेरीवालामुक्त होणार कधी, असा प्रश्न उद्भवतो. पश्चिम रेल्वे आरपीएफने स्थानके पूर्णपणे फेरीवालामुक्त होऊ शकत नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर मध्य रेल्वे आरपीएफने मात्र फेरीवालामुक्त स्थानकांसाठी प्रयत्न चालवले आहेत. त्यादृष्टीने जानेवारी महिन्यात विशेष मोहीम हाती घेतली. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी सात पथके तयार करण्यात आली आहेत. यातील प्रत्येक पथकात एक अधिकारी आणि चार आरपीएफ जवान सामील आहेत. स्थानकांवर कारवाई करतानाच लोकलमधून विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. विशेष मोहिमेद्वारे जानेवारी महिन्यात १ हजार ४३२ जणांना पकडण्यात आले आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करीत ५ लाख ३८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. महत्त्वाची बाब म्हणजे ही कारवाई करताना कर्तव्यात कसूर ठेवणाऱ्या आरपीएफ अधिकारी आणि जवानांवरही कारवाई केली जाणार आहे. यात आतापर्यंत जवळपास ४ आरपीएफ कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात असल्याचे मध्य रेल्वे आरपीएफकडून सांगण्यात आले. यात दोषी आढळल्यास त्यांना दंड आकारला जाईल किंवा अन्य कारवाईचे पर्यायही असल्याचे मध्य रेल्वे आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी सांगितले. फेरीवाल्यांविरोधात सर्व स्थानकांवर कारवाई सुरू आहे. मात्र सर्वाधिक कारवाईसाठी जादा मनुष्यबळ हे ठाणे, कल्याण स्थानकांत तैनात करण्यात आले आहे. या दोन्ही स्थानकांत कारवाईसाठी प्रत्येकी १० जवान तैनात करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.