शहरं
Join us  
Trending Stories
1
Satara Crime: महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ
2
पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
3
IND vs AUS : गिलनं पुन्हा गमावला टॉस; युवा ऑलराउंडर दुखापतीमुळे OUT; कुलदीपसह प्रसिद्ध कृष्णाला संधी
4
टाटा मोटर्सचं नाव बदललं, आता 'या' नावाने शेअर बाजारात ओळखली जाणार कंपनी; डिमर्जरनंतर झाला मोठा बदल
5
सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट 
6
SIP Investment: एका वर्षात एसआयपीनं भरला खिसा, मागील दिवाळीनंतर या ५ म्युच्युअल फंडांनी दिला २०% पेक्षा जास्त रिटर्न
7
"सलमान खानसोबत चित्रपट करणार नाही"; महेश मांजरेकरांचं मोठं विधान, म्हणाले- "मी त्याला शिवी..."
8
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
9
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, पतीने पत्नीला कुऱ्हाडीनं कापलं! नंतर पोलीस स्टेशनला जाऊन म्हणाला..
10
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
11
जान्हवी कपूर विवाहबंधनात अडकणार? अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल; लग्नाची तारीख सांगितल्याची चर्चा
12
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
13
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
15
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
16
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
17
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
18
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
19
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
20
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध

ठाणे-दिवा मार्गिका रखडल्याने ‘लोकल खोळंबा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 05:41 IST

ठाणे ते दिवा पाचवी आणि सहावी मार्गिका प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडल्याने प्रवाशांचा दररोज लोकल खोळंबा होत आहे.

मुंबई : ठाणे ते दिवा पाचवी आणि सहावी मार्गिका प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडल्याने प्रवाशांचा दररोज लोकल खोळंबा होत आहे. ठाणे स्थानकावर मध्य, ट्रान्स हार्बर हे मार्ग जोडले आहेत. यासह अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या या स्थानकावर थांबा घेतात. त्यामुळे या स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र रेल्वेकडून अपुऱ्या सुविधा प्रवाशांना पुरविल्या जातात. या स्थानकादरम्यान कोणताही तांत्रिक बिघाड झाल्यास लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावते. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा अमूल्य वेळ वाया जातो.ठाणे ते दिवा पाचवी आणि सहावी मार्गिका बनल्यास मेल, एक्स्प्रेससाठी विशेष मार्गिका तयार होईल. त्यामुळे उपनगरीय रेल्वे स्थानकांवर आलेला ताण कमी होऊन वक्तशीरपणा वाढेल, असा आशावाद मध्य रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला. मुंबईतील खासदार आणि रेल्वे अधिकारी यांची याबाबत नुकतीच बैठक झाली. यामध्ये ठाणे ते दिवा, कल्याण ते बदलापूर, कल्याण ते कसारा हे रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याची चर्चा या बैठकीत झाली.>ऐतिहासिक स्थानक दुर्लक्षितमुंबई ते ठाणे पहिली रेल्वे धावली. त्यामुळे मुंबई ते ठाणे या मार्गाला फार मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. सीएसएमटी स्थानकाला जागतिक दर्जा आहे. मात्र ठाणे स्थानक ऐतिहासिकदृष्ट्या मागे आहे. त्यामुळे या स्थानकाचे नूतनीकरण, मार्ग वाढविण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली.