शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे-दिवा मार्गिका रखडल्याने ‘लोकल खोळंबा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 05:41 IST

ठाणे ते दिवा पाचवी आणि सहावी मार्गिका प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडल्याने प्रवाशांचा दररोज लोकल खोळंबा होत आहे.

मुंबई : ठाणे ते दिवा पाचवी आणि सहावी मार्गिका प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडल्याने प्रवाशांचा दररोज लोकल खोळंबा होत आहे. ठाणे स्थानकावर मध्य, ट्रान्स हार्बर हे मार्ग जोडले आहेत. यासह अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या या स्थानकावर थांबा घेतात. त्यामुळे या स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र रेल्वेकडून अपुऱ्या सुविधा प्रवाशांना पुरविल्या जातात. या स्थानकादरम्यान कोणताही तांत्रिक बिघाड झाल्यास लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावते. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा अमूल्य वेळ वाया जातो.ठाणे ते दिवा पाचवी आणि सहावी मार्गिका बनल्यास मेल, एक्स्प्रेससाठी विशेष मार्गिका तयार होईल. त्यामुळे उपनगरीय रेल्वे स्थानकांवर आलेला ताण कमी होऊन वक्तशीरपणा वाढेल, असा आशावाद मध्य रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला. मुंबईतील खासदार आणि रेल्वे अधिकारी यांची याबाबत नुकतीच बैठक झाली. यामध्ये ठाणे ते दिवा, कल्याण ते बदलापूर, कल्याण ते कसारा हे रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याची चर्चा या बैठकीत झाली.>ऐतिहासिक स्थानक दुर्लक्षितमुंबई ते ठाणे पहिली रेल्वे धावली. त्यामुळे मुंबई ते ठाणे या मार्गाला फार मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. सीएसएमटी स्थानकाला जागतिक दर्जा आहे. मात्र ठाणे स्थानक ऐतिहासिकदृष्ट्या मागे आहे. त्यामुळे या स्थानकाचे नूतनीकरण, मार्ग वाढविण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली.