शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

ठाणे जिल्ह्यात चार तालुके वाढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 06:29 IST

जिल्ह्याचे विभाजन होऊन तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यापाठोपाठ आता डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर आणि भिवंडी पूर्व या चार नवीन तालुक्यांची लवकरच निर्मित होणार आहे. त्यासाठी राजकीय व प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत.

सुरेश लोखंडे ठाणे : जिल्ह्याचे विभाजन होऊन तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यापाठोपाठ आता डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर आणि भिवंडी पूर्व या चार नवीन तालुक्यांची लवकरच निर्मित होणार आहे. त्यासाठी राजकीय व प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत.ठाण्यातून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यामुळे ठाणे जिल्ह्यात सात तालुके शिल्लक आहेत. त्यात आता या चार तालुक्यांची भर पडून ते ११ होणार आहेत. महसूलच्या विविध कामांसाठी नागरिकांची होत असलेली फरफट, वाढती लोकसंख्या आणि त्याचा प्रशासनावर पडत असलेला ताण आदी समस्या कमी होण्याची शक्यता आहे. या पावसाळी अधिवेशनानंतर चारही तालुक्यांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.ठाणे तालुक्याचे विभाजन होऊन नवी मुंबईला तालुक्याचा दर्जा मिळेल. ठाण्यात समाविष्ट असलेल्या मीरा-भार्इंदरलादेखील तालुक्याचा दर्जा देऊन मीरा रोड येथे तहसीलदार कार्यालय उभारले जाणार आहे. कल्याण तालुक्याचे विभाजन होऊन डोंबिवली, तर भिवंडी तालुक्यातून भिवंडी पूर्व तालुक्याची निर्मिती करण्याचा प्रस्ताव आहे.प्रत्येक तालुक्यासाठी तहसीलदार व अतिरिक्त तहसीलदार असे दोन अधिकारी असणार आहेत. त्यांच्या कार्यालयांसाठी लागणाºया अन्य कर्मचारी वर्गाचेदेखील नियोजन जवळजवळ निश्चित झाले आहे. या चार शहरी तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात महसूल असल्यामुळे त्यांची वसुली या स्वतंत्र तहसीलदार कार्यालयांकडून होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.नवी मुंबईतून वगळलेली १४ गावे सध्या कल्याण तालुक्यात आहेत. ती ठाणे तालुक्यात समाविष्ट होण्याची शक्यता आहे. डोंबिवली या शहरी तालुक्यासदेखील २७ गावांमधील काही गावे जोडण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. यासह ठाण्याची २२ गावे मिळून होणाºया ६३ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेला खीळ बसणार असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.भिवंडी गोदामांचा ग्रामीण तालुका कायमभिवंडी तालुक्यातील ६० ग्रामपंचायत क्षेत्रात २५ हजार गोदामे आहेत. त्याचा ग्रामीण तालुका कायम राहणार आहे. नव्याने निर्माण होणाºया शहरी तालुक्यात भिवंडी-निजामपूर मनपा क्षेत्र १३ गावे, एमएमआरडीए क्षेत्रातील ५१ गावांमधील काही भागांचा समावेश करण्याची शक्यता आहे.मीरा-भार्इंदरच्या शेतकºयांना सुमारे ३० किमी अंतर कापून ठाणे गाठावे लागते. या शहरात उत्तन परिसर पर्यटन क्षेत्र आहे.