शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

ठाणे जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघात ६६ उमेदवार निवडणूक रिंगणात- दुरंगी लढतीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 18:51 IST

जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्यात म्हणजे २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी ८७ उमेदवारांनी ११४ नामनिर्देशनपत्र (अर्ज) दाखल केले होते. छाननीमध्ये १२ नामनिर्देशनपत्र अवैध ठरले होते. शिल्लक राहिलेल्या ७५ उमेदवारांपैकी नऊ उमेदवारांनी त्यांची उमेदवारी शुक्रवारी मागे घेतली. यामुळे आता ६६ उमेदवार जिल्ह्यातील निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत.

ठळक मुद्देबंडखोर उमेदवारांनी देखील उमेदवारी मागे घेतल्यामुळे प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमधील दुरंगी लढतीचा मार्ग मोकळाभिवंडीच्या मतदान केंद्रांमध्ये केवळ एक मतदान यंत्र

ठाणे : जिल्ह्यातील लोकसभेच्या ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही मतदारसंघातून नऊ उमेदवारांनी त्यांची उमेदवारी आज मागे घेतली आहे. यामुळे या तिन्ही मतदारसंघात आता केवळ ६६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ठिकठिकाणच्या बंडखोर उमेदवारांनी देखील उमेदवारी मागे घेतल्यामुळे आता या तिन्ही मतदारसंघांमधील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमधील दुरंगी लढतीचा मार्ग मोकळा झाला आहे.जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्यात म्हणजे २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी ८७ उमेदवारांनी ११४ नामनिर्देशनपत्र (अर्ज) दाखल केले होते. छाननीमध्ये १२ नामनिर्देशनपत्र अवैध ठरले होते. शिल्लक राहिलेल्या ७५ उमेदवारांपैकी नऊ उमेदवारांनी त्यांची उमेदवारी शुक्रवारी मागे घेतली. यामुळे आता ६६ उमेदवार जिल्ह्यातील निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत. या उमेदवारांना होणा-या मतदानासाठी ठाणे व कल्याण मतदारसंघामधील मतदार केंद्रांवर दोन बॅलेड युनिट म्हणजे मतदानयंत्र लागणार आहेत. तर भिवंडीच्या मतदान केंद्रांमध्ये केवळ एक मतदान यंत्र उपलब्ध करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.ठाणे मतदार संघात आता २५ पैकी २३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दोघांनी उमेदवारी मागे घेतली. यामुळे शिवसेना व राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये आता दुरंगी लढत होणार आहे. या दोन प्रमुख उमेदवारांसह या मतदारसंघात आता नोंदणीकृत अमान्य पक्षांच्या १३ उमेदवारांसह दहा अपक्ष उमेदवार ठाणे मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात शिल्लक आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघात ३६ उमेदवार होते. यातून चार अवैध ठरले होते. शिल्लक राहिलेल्या ३२ उमेदवारांपैकी चार जणांनी उमेदवारी मागे घेतल्याने आता २८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामतदार संघातही शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांमध्ये लढत होईल. भिवंडी मतदार संघात तिरंगी लढत होणार होती. पण शिवसेनेच्या व काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराने देखील उमेदवारी मागे घेतल्यामुळे या मतदार संघात आता भाजपा व काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमध्ये दुरंगी लढतीचा मार्ग मोकळा झाला. भिवंडीत शिल्लक राहिलेल्या १८ उमेदवारांपैकी तीन जणांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे या मतदारसंघात आता १५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

टॅग्स :thaneठाणेlok sabhaलोकसभा