शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

ठाणे जिल्ह्याला मिळाल्या ८५ हजार लसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:38 IST

ठाणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ठाण्यासह जिल्ह्यात लसींचा साठा अपुरा पडू लागला होता. ठाण्यात तर वीकेंड ...

ठाणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ठाण्यासह जिल्ह्यात लसींचा साठा अपुरा पडू लागला होता. ठाण्यात तर वीकेंड लॉकडाऊनचे कारण देऊन दोन दिवस लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यानंतर आता जिल्ह्याला ८५ हजार लसींचा साठा मिळाला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा लसीकरण उत्सव केवळ दोन दिवसच चालेल, अशी शक्यता आहे. तर सोमवारी सांयकाळी किंवा मंगळवारी सकाळपर्यंत आणखी ८१ हजार लसींचा साठा मिळणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

ठाणे शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून लसींअभावी लसीकरण मोहिमेचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत होते, तर लसींचा साठा अपुरा असल्याने वीकेंड लॉकडाऊनचे कारण देऊन ठाण्यासह अनेक ठिकाणी लसीकरण दोन दिवस बंद ठेवले होते. त्यामुळे केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार लसींचा उत्सव कसा साजरा करायचा असा पेच जिल्ह्यातील शासकीय यंत्रणांपुढे निर्माण झाला होता. परंतु, आता जिल्ह्यासाठी सोमवारी सकाळी ८५ हजार लसींचा साठा उपलब्ध झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. त्यानुसार त्याचे वाटपही झाले आहे. या सर्व लसी कोविशिल्डच्या असल्याचेही सांगण्यात आले. परंतु, उपलब्ध झालेला साठा वितरित केल्यानंतर प्रत्येक महापालिकेच्या वाटेला दीड हजार ते २० हजारपर्यंत साठा मिळाला आहे. त्यामुळे तो किती दिवस पुरणार, असा प्रश्न महापालिकांना पडला आहे.

पुढील दोन दिवस पुरेल एवढा हा साठा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. परंतु त्यानंतर काय करायचे असा पेच आहेच. त्यामुळे लसीकरणाचा उत्सव कसा साजरा करायचा? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. दुसरीकडे सोमवारी सांयकाळी किंवा मंगळवार सकाळपर्यंत आणखी ८१ हजार लसींचा साठा उपलब्ध होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. तो वेळेत आला तरच हा उत्सव साजरा होऊ शकणार आहे. आलेल्या साठ्याचे वाटप दिवसभर सुरू होते. त्यामुळे अनेक ठिकाणी रोजच्या रोज सुरू असलेल्या केंद्रापैकी अनेक केंद्र सोमवारीदेखील बंदच असल्याचे दिसून आले. परंतु, मंगळवारी सर्व केंद्रावर लसीकरण पुन्हा सुरू होईल, असा दावा महापालिकांनी केला आहे.

महापालिका - मिळालेला लसींचा साठा

ठाणे - १५,०००

नवीमुंबई - २०,०००

कल्याण डोंबिवली - १२,०००

उल्हासनगर - १५००

भिवंडी - १५००

मीरा-भाईंदर - १५,०००

ठाणे ग्रामीण - २०,०००

--------------

एकूण - ८५०००