शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
6
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
7
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
8
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
9
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
10
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
11
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
12
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
13
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
14
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
15
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
16
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
17
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
18
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
19
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
20
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण

कोरोना रुग्णसंख्येत ठाणे जिल्हा देशात तिसऱ्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाच्या जागतिक संकटातून काही अंशी सावरत असतानाच ऐन वर्षाच्या टप्प्यात रुग्णसंख्येत वाढ होत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : कोरोनाच्या जागतिक संकटातून काही अंशी सावरत असतानाच ऐन वर्षाच्या टप्प्यात रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या वाढत्या रुग्णसंख्येत देशातील आठ जिल्हे आघाडीवर असून राज्यातील या आठ जिल्ह्यांमध्ये देशात ठाणे जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर पुणे आणि नागपूर अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकावर आहे. मुंबईला मागे टाकत ठाणे जिल्ह्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्यामुळे प्रशासकीय पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे.

ठाणे जिल्हा देशात तिसऱ्या क्रमांकावर असल्याच्या वृत्तास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे यांनी दुजोरा दिला आहे. तब्बल दहा हजार रुग्ण सध्या जिल्ह्यात उपचार घेत आहेत. यामध्ये समाधानाची बाब म्हणजे जिल्ह्यातील मृत्यूदर कमी असला तरी वाढत्या रुग्णसंख्येने आरोग्य यंत्रणा चिंतेत आहे. यासाठी शुक्रवारी उशिरापर्यंत आरोग्य उप संचालकांच्या उपस्थितीत बैठक घेऊन आरोग्य यंत्रणेने कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग वाढवण्यासह आरोग्याच्या दृष्टीने विविध उपाय योजनावर जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा झाल्याचेही डॉ. रेंघे यांनी लोकमतला सांगितले.

जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णवाढीचे प्रमाण कल्याण डोंबिवली महापालिका पाठोपाठ ठाणे महापालिका परिसरात आहे. यानंतर नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर परिसरात रुग्णसंख्या वाढताना आढळून येत आहे. शुक्रवारी जिल्ह्यात आढळलेले १ हजार १५३ रुग्णसंख्या ही या वर्षातील सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदली गेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ७४ हजार २८३ रुग्णसंख्या आढळलेली आहे. त्यापैकी २ लाख ५९ हजार ३६० रुग्ण बरे झाले आहेत. तर मृत्यू ६ हजार ३२६ झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. या वाढत्या रुग्णसंख्येला आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा, पोलीस आणि जिल्ह्यातील महापालिका प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक नियमांकडे लक्ष केंद्रित केले आहे.

.......

जिल्ह्यातील लसीकरण -

जिल्ह्यातील लसीकरण केंद्र- ८५२

* जिल्ह्यात रोजचे अपेक्षित लसीकरण - २०८०

* आतापर्यंत पहिला डोस - १५१५७३

* दुसरा डोस - ३०२४२

* ४५ वर्षे ते ज्येष्ठ नागरिकांचे डोस - २६५

.........