शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

ठाणे जिल्ह्यात एक हजार ६९७ कोरोना रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:38 IST

ठाणे : शुक्रवारी एक हजार ६९७ रग्ण सापडल्याने आता जिल्ह्यातील रुग्णसंख्या चार लाख ९७ हजार ८१० झाली आहे, ...

ठाणे : शुक्रवारी एक हजार ६९७ रग्ण सापडल्याने आता जिल्ह्यातील रुग्णसंख्या चार लाख ९७ हजार ८१० झाली आहे, तर ५९ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आठ हजार ३७० नोंदली गेली आहे.

ठाणे मनपाच्या परिसरात ३२५ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या एक लाख २५ हजार ८७४ झाली, तर सात दगावल्याने मृतांची संख्या एक हजार ७९० वर गेली आहे. कल्याण-डोंबिवलीला ५५८ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या एक लाख २८ हजार ९३० झाली. दिवसभरातील २० मृतांमुळे आतापर्यंत एक हजार ६४४ मृत्यू नोंदवण्यात आले आहेत.

उल्हासनगरला ७६ रुग्णांच्या वाढीसह दोन मृत्यू झाले. आता येथील रुग्णसंख्या १९ हजार ६७८ झाली असून ४५५ मृतांची नोंद झाली आहे. भिवंडीला २२ रुग्ण सापडले असून चार मृत्यू झाले आहेत. येथील एकूण रुग्ण १० हजार २०० झाले असून मृत्यू ४१४ नोंद झाले. मीरा-भाईंदरला १६६ रुग्णांसह आठ मृतांची वाढ झाली. आता येथील रुग्णसंख्या ४६ हजार ९०० झाली असून एक हजार १७२ मृतांची नोंद करण्यात आली आहे. अंबरनाथला ४१ रुग्णांच्या वाढीसह एका जणाचा मृत्यू झाला. येथील रुग्णसंख्या आता १८ हजार ७२१ झाली असून ३९६ मृतांची नोंद झाली. कुळगाव-बदलापूरमध्ये ६५ रुग्णांची भर पडून एक जण दगावला आहे. आता येथील १९ हजार ९१४ रुग्णांसह २२८ मृतांची नोंद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या गावपाड्यांमध्ये २५३ रुग्णांसह सात मृतांची भर पडली. यामुळे परिसरात ३१ हजार ५०८ रुग्णांसह ७७९ मृत्यूंची नोंद झाली आहे.