शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

ठाणे जिल्ह्यात मत मोजणीच्या सर्वाधिक ३४ फेऱ्या मुरबाडला; सर्वात कमी २० फेऱ्या उल्हासनगरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 20:17 IST

या मतमोजणीसाठी प्रत्येक मतमोजणी केंद्रावर एक केंद्रीय निरीक्षक असून जिल्ह्यातील सर्व मतमोजणी केंद्रांवरील १८ केंद्रीय निरीक्षकांच्या नियंत्रणात मतमोजणी होणार आहेत. नऊ हजार पोलिस बंदोबस्तासह ११ एसआरपीएफ व सीआरपीएफच्या तुकड्या या मतमोजणी केंद्रांवर आहेत. मतमोजणी केंद्रावर अधिकृत प्राधिकार पत्र किंवा निवडणूक ओळखपत्र असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असणार आहे. उमेदवारांचे प्रतिनिधी, पर्यवेक्षक, मतमोजणी कर्मचारी या सर्वांना आयोगाच्या तसेच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या यांच्या निर्देशाचे तंतोतंत पालन करावयाचे आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात २१२ उमेदवार३० लाख ६२ हजार ५४४ मतदारांनी (४७.९१ टक्के) २१२ उमेदवारांना मतदान केलेविजयी उमेदवार दुपारी २ वाजे आत निश्चित होण्याची शक्यता एका राऊंडला जास्तीत जास्त अर्धा तास

ठाणे : जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात ६३ लाख ९२ हजार ३५७ मतदारांपैकी ३० लाख ६२ हजार ५४४ मतदारांनी (४७.९१ टक्के) २१२ उमेदवारांना मतदान केले आहे. ठिकठिकाणच्या १८ मतमोजणी केंद्रांवर ही मतमोजणी २४ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपासून सुरू होईल. एक राऊंड पूर्ण होण्यासाठी तब्बल अर्धा तास लागणार आहे. यानुसार सर्वाधिक मुरबाड येथील मतमोजणी ३४ फेऱ्यांमध्ये पूर्ण होणार आहे. तर उल्हासनगरला सर्वात कमी म्हणजे २० फेऱ्यांमध्येही मतमोजणी होणार आहे.         जिल्ह्यातील ३० लाख ६२ हजार ५४४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये १७ लाख ३२ हजार ९१२ पुरूषांसह १३ लाख २९ हजार ४८७ महिला आणि १४५ इतर मतदारांनी मतदान केले आहे. या २१२ उमेदवारांपैकी विजयी उमेदवार  दुपारी २ वाजेच्या आत निश्चित होण्याची शक्यता आहे. मतदारसंघात झालेले एकूण मतदान, तेथील उमेदवार, एकूण ईव्हीएम आदींचा विचार करता एका राऊंडला जास्तीत जास्त अर्धा तास लागणार आहे. १८ विधानसभाच्या मतमोजणीपैकी सर्वात जास्त ३४ फेऱ्यामध्ये मुरबाड मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे.यानुसार अन्यही १६ मतदारसंघात मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहेत. तर उल्हासनगर मतदारसंघात सर्वात कमी २० फेऱ्यामध्ये मतमोजणी पूर्ण होणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.        जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी १८ मतमोजणी केंद्रावर होणार आहे. या प्रत्येक मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी १४ टेबल लावण्यात आले आहे. त्यावर १२० कर्मचारी आहेत. यानुसार जिल्ह्यात एक हजार २०० कर्मचारी या १८ मतदान केंद्रांवर तैनात आहे. या अधिकारी, कर्मचाऱ्याव्दारे अत्यंत पारदर्शीपणाने व अचूकतेने मतमोजणी करण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पहिल्या फेरीची मतमोजणी झाल्यानंतर, दुसरी फेरीची मतमोजणी सुरू करण्याचे नियोजन आहे. सर्व प्रथम ईटीपीबीएस (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम) मते बारकोडद्वारे मोजली जाणार आहेत. तसेच पोस्टल बॅलेटद्वारे प्राप्त झालेली मते मोजली जाणार आहेत.

        या मतमोजणीसाठी प्रत्येक मतमोजणी केंद्रावर एक केंद्रीय निरीक्षक असून जिल्ह्यातील सर्व मतमोजणी केंद्रांवरील १८ केंद्रीय निरीक्षकांच्या नियंत्रणात मतमोजणी होणार आहेत. नऊ हजार पोलिस बंदोबस्तासह ११ एसआरपीएफ व सीआरपीएफच्या तुकड्या या मतमोजणी केंद्रांवर आहेत. मतमोजणी केंद्रावर अधिकृत प्राधिकार पत्र किंवा निवडणूक ओळखपत्र असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असणार आहे. उमेदवारांचे प्रतिनिधी, पर्यवेक्षक, मतमोजणी कर्मचारी या सर्वांना आयोगाच्या तसेच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या यांच्या निर्देशाचे तंतोतंत पालन करावयाचे आहे.