शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

ठाणे जिल्हा आरोग्य विभाग जपतोय बालकांचे हृदय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 23:27 IST

वर्षभरात १४७ बालकांवर शस्त्रक्रिया : आरोग्य विभागाची माहिती

ठाणे : सध्याच्या घडीला तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात हृदयरोगाचे आजार बळावत असून, त्यामुळे मृत्यू होण्याच्या प्रमाणातदेखील वाढ होत आहे. असे असताना दुसरीकडे जिल्हा आरोग्य विभागाकडून मात्र, नवजात बालकांसह विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात असल्याचे दिसून येत आहे.राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मागील वर्षभरात ० ते १७ वयोगटातील हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या १४७ विद्यार्थ्यांवर हृदय शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली. यामध्ये सर्वाधिक ० ते ६ वयोगटातील ११३ बालकांचा तर, ७ ते १७ वयोगटातील ९४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एकीकडे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावातदेखील बालकांचे हृदय जपण्याचे बहुमूल्य काम जिल्हा आरोग्य विभाग करीत आहे.

दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या आढळत आहे. त्यामुळे इतर आजाराच्या रुग्णांकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड होत आहे. असे असताना राज्य शासनाचा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद आणि जिल्हा शल्यचिकिस्क यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वयोगातील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येते. त्यामध्ये विशेषत: जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाडी, खासगी अनुदानित शाळांमधील आणि महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते.जिल्ह्यात ३२ पथके तैनात : यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाने जिल्ह्यात ३२ पथके नेमली आहेत. या एका पथकात एक पुरुष डॉक्टर, एक महिला डॉक्टर, एक नर्स आणि औषधवाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तीन विविध टप्प्यांत बालकांची तपासणी करण्यात येत असते. यामध्ये अंगणवाडी स्तरावर एप्रिल ते सप्टेंबर आणि आॅक्टोबर ते मार्च अशा दोन टप्प्यांत तर, शालेय विद्यार्थ्यांची एप्रिल ते मार्च या एका टप्प्यात आरोग्य तपासणी करण्यात येते. त्यानुसार मागील सहा वर्षांत ० ते १८ या वयोगटातील ८१७ बालकांना हृदयविकार असल्याचे निदर्शनात आले.

टॅग्स :thaneठाणे