शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

लोकसहभागातून ठाणे जिल्ह्यात ३५० वनराई बंधारे

By admin | Updated: November 12, 2015 01:21 IST

जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई विचारात घेऊन नदीनाल्यांंतून वाहून जाणारे पाणी वनराई बंधाऱ्यांव्दारे अडवण्यात येत आहे.

ठाणे : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई विचारात घेऊन नदीनाल्यांंतून वाहून जाणारे पाणी वनराई बंधाऱ्यांव्दारे अडवण्यात येत आहे. यासाठी एकही पैसा खर्च न करता सुमारे ३५० बंधारे लोकसहभागातून बांधल्याचा दावा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने केला आहे. यासाठी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे पुढे येण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी (सीईओ) यांच्यासह अतिरिक्त सीईओ रवींद्र पाटील, डेप्युटी सीईओ अशोक पाटील यांच्यासह जि.प.च्या सात अधिकाऱ्यांनी मुरबाड तालुक्यातील गावपाड्यांत जागृती केली. याशिवाय, जंगलातील ठिकठिकाणच्या बंधाऱ्यांचेदेखील उद्घाटन केल्याचे पाटील यांनी सांगितले.शहापूर तालुक्यातील मुंडेपाड्याच्या रानात गावकऱ्यांनी सुमारे २१ हजार रुपये खर्चाचा बंधारा बांधला आहे. त्यात सुमारे तीन टीएमसी पाण्याचा साठा तयार झाला. याशिवाय, लोकांमध्ये जनजागृती करीत असतानाच स्वत: परिश्रम घेऊन शिक्षक व शिक्षिका बंधारे घालत असल्याचे अंबरनाथचे गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के यांनी सांगितले. यानुसार बोराडपाडा केंद्र शाळेच्या नियंत्रणातील शिक्षक व शिक्षिकांनी नंबरवाडीच्या रानात बंधारा बांधला. यामध्ये रामू वाघ, इसामे, नवनाथ अस्वरे, विजय चव्हाण, ज्ञानेश्वर कारोटे, सुनील पाटोळे, पांडुरंग शिर्के (कुडेरान), दखणे, कोळी, जाधव या शिक्षकांसह शिक्षिका जोशी, महाजन, पाटील, पुंडकर, कुसाळकर, सावंत, शेलार, साबळे, बोरसे आदी हा नंबरवाडीचा बंधारा बांधून लोकसहभागास चालना दिली.