शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
4
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
5
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
6
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
7
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
8
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
9
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
10
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
11
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
12
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
13
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
14
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
15
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
16
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
17
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
18
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
19
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
20
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन

लोकसहभागातून ठाणे जिल्ह्यात ३५० वनराई बंधारे

By admin | Updated: November 12, 2015 01:21 IST

जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई विचारात घेऊन नदीनाल्यांंतून वाहून जाणारे पाणी वनराई बंधाऱ्यांव्दारे अडवण्यात येत आहे.

ठाणे : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई विचारात घेऊन नदीनाल्यांंतून वाहून जाणारे पाणी वनराई बंधाऱ्यांव्दारे अडवण्यात येत आहे. यासाठी एकही पैसा खर्च न करता सुमारे ३५० बंधारे लोकसहभागातून बांधल्याचा दावा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने केला आहे. यासाठी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे पुढे येण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी (सीईओ) यांच्यासह अतिरिक्त सीईओ रवींद्र पाटील, डेप्युटी सीईओ अशोक पाटील यांच्यासह जि.प.च्या सात अधिकाऱ्यांनी मुरबाड तालुक्यातील गावपाड्यांत जागृती केली. याशिवाय, जंगलातील ठिकठिकाणच्या बंधाऱ्यांचेदेखील उद्घाटन केल्याचे पाटील यांनी सांगितले.शहापूर तालुक्यातील मुंडेपाड्याच्या रानात गावकऱ्यांनी सुमारे २१ हजार रुपये खर्चाचा बंधारा बांधला आहे. त्यात सुमारे तीन टीएमसी पाण्याचा साठा तयार झाला. याशिवाय, लोकांमध्ये जनजागृती करीत असतानाच स्वत: परिश्रम घेऊन शिक्षक व शिक्षिका बंधारे घालत असल्याचे अंबरनाथचे गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के यांनी सांगितले. यानुसार बोराडपाडा केंद्र शाळेच्या नियंत्रणातील शिक्षक व शिक्षिकांनी नंबरवाडीच्या रानात बंधारा बांधला. यामध्ये रामू वाघ, इसामे, नवनाथ अस्वरे, विजय चव्हाण, ज्ञानेश्वर कारोटे, सुनील पाटोळे, पांडुरंग शिर्के (कुडेरान), दखणे, कोळी, जाधव या शिक्षकांसह शिक्षिका जोशी, महाजन, पाटील, पुंडकर, कुसाळकर, सावंत, शेलार, साबळे, बोरसे आदी हा नंबरवाडीचा बंधारा बांधून लोकसहभागास चालना दिली.