शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

ठाणे जिल्हा हगणदारीमुक्तीचा दावा खोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 01:02 IST

ठाणे जिल्हा हगणदारीमुक्त झाल्याचा व स्वच्छतेबाबत केंद्राने महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्याला प्रथम क्रमांक घोषित केल्याबद्दल शाबासकी मिळवली जात आहे

बाळाराम भोईरठाणे जिल्हा हगणदारीमुक्त झाल्याचा व स्वच्छतेबाबत केंद्राने महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्याला प्रथम क्रमांक घोषित केल्याबद्दल शाबासकी मिळवली जात आहे. परंतु, या कौतुकास खरोखरच ठाणे जिल्हा पात्र नाही, असा माझा अनुभव आहे. जिल्ह्यात विविध कमिट्या आल्या की, रंगरंगोटी करायची, रस्ते धुवायचे आणि शौचालयांना रंग लावायचा, असे करून स्वच्छता केल्याचा देखावा करायचा. मात्र, प्रत्यक्षात स्वच्छता झालेलीच नाही. ठाणे जिल्ह्यातील वस्तुस्थिती वेगळीच आहे. जिल्ह्यात हजारो शौचालये बांधली. परंतु, ग्रामीण भागातील अनेक शौचालये आजही बंद आहेत. जिल्ह्यातील भीषण पाणीटंचाईमुळे ही शौचालये बंद झाली आहेत. हजारो शौचालये अर्धवट अवस्थेत आहेत. अनेक शौचालये नादुरुस्त आहेत. शासकीय कार्यालयांमधील शौचालये बंद आहेत. सार्वजनिक शौचालयांत घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने कुणी तेथे पाऊल ठेवायला तयार नाही.

भिवंडी तालुक्यात यावर्षी एक हजार ९४४ वैयक्तिक शौचालये मंजूर झाली. त्यातील एक हजार ७०० लोकांनी कर्ज काढून कामे पूर्ण केली. परंतु, या सर्व लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम अजूनही मिळालेली नाही. २४४ शौचालये अपूर्ण, अर्धवट आहेत. हीच परिस्थिती जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांची आहे. घरातील सांडपाण्यासाठी शोषखड्डे धोरण बंद पडले. पाणीटंचाईमुळे लोक शौचालयात जाण्यापेक्षा बाहेर उघड्यावर जाणे पसंत करतात. जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये अजूनही ४५ टक्के लोक व मुख्यत्वे महिला उघड्यावर शौचासाठी जातात. तरीही, ठाणे जिल्हा हगणदारीमुक्त कसा म्हणता येईल. शौचालयांची स्थिती व ठिकठिकाणचे घाणीचे साम्राज्य याचा नेमका सर्व्हे केल्यास ‘स्वच्छता दर्पण’ हा किताब मिळण्याबाबत साशंकता निर्माण होईल.(श्रमजीवी संघटनेचे महाराष्टÑाचे सरचिटणीस)- शब्दांकन : सुरेश लोखंडेकेंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने केलेल्या मूल्यांकनात राज्यामध्ये ‘स्वच्छता दर्पण’मध्ये ठाणे जिल्ह्याने प्रथम स्थान प्राप्त केले असले, तरी जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील गावखेड्यांमध्ये घाणीचे साम्राज्य आजही पाहायला मिळते. असे असताना जिल्हा स्वच्छ कसा? कागदोपत्री आकडेवारी सादर करून ‘स्वच्छता दर्पण’मध्ये प्रथम स्थान मिळवले आहे किंवा कसे, असा संशय घ्यायला जागा आहे.

टॅग्स :thaneठाणेSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान