शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

ठाणे जिल्हा हगणदारीमुक्तीचा दावा खोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 01:02 IST

ठाणे जिल्हा हगणदारीमुक्त झाल्याचा व स्वच्छतेबाबत केंद्राने महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्याला प्रथम क्रमांक घोषित केल्याबद्दल शाबासकी मिळवली जात आहे

बाळाराम भोईरठाणे जिल्हा हगणदारीमुक्त झाल्याचा व स्वच्छतेबाबत केंद्राने महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्याला प्रथम क्रमांक घोषित केल्याबद्दल शाबासकी मिळवली जात आहे. परंतु, या कौतुकास खरोखरच ठाणे जिल्हा पात्र नाही, असा माझा अनुभव आहे. जिल्ह्यात विविध कमिट्या आल्या की, रंगरंगोटी करायची, रस्ते धुवायचे आणि शौचालयांना रंग लावायचा, असे करून स्वच्छता केल्याचा देखावा करायचा. मात्र, प्रत्यक्षात स्वच्छता झालेलीच नाही. ठाणे जिल्ह्यातील वस्तुस्थिती वेगळीच आहे. जिल्ह्यात हजारो शौचालये बांधली. परंतु, ग्रामीण भागातील अनेक शौचालये आजही बंद आहेत. जिल्ह्यातील भीषण पाणीटंचाईमुळे ही शौचालये बंद झाली आहेत. हजारो शौचालये अर्धवट अवस्थेत आहेत. अनेक शौचालये नादुरुस्त आहेत. शासकीय कार्यालयांमधील शौचालये बंद आहेत. सार्वजनिक शौचालयांत घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने कुणी तेथे पाऊल ठेवायला तयार नाही.

भिवंडी तालुक्यात यावर्षी एक हजार ९४४ वैयक्तिक शौचालये मंजूर झाली. त्यातील एक हजार ७०० लोकांनी कर्ज काढून कामे पूर्ण केली. परंतु, या सर्व लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम अजूनही मिळालेली नाही. २४४ शौचालये अपूर्ण, अर्धवट आहेत. हीच परिस्थिती जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांची आहे. घरातील सांडपाण्यासाठी शोषखड्डे धोरण बंद पडले. पाणीटंचाईमुळे लोक शौचालयात जाण्यापेक्षा बाहेर उघड्यावर जाणे पसंत करतात. जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये अजूनही ४५ टक्के लोक व मुख्यत्वे महिला उघड्यावर शौचासाठी जातात. तरीही, ठाणे जिल्हा हगणदारीमुक्त कसा म्हणता येईल. शौचालयांची स्थिती व ठिकठिकाणचे घाणीचे साम्राज्य याचा नेमका सर्व्हे केल्यास ‘स्वच्छता दर्पण’ हा किताब मिळण्याबाबत साशंकता निर्माण होईल.(श्रमजीवी संघटनेचे महाराष्टÑाचे सरचिटणीस)- शब्दांकन : सुरेश लोखंडेकेंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने केलेल्या मूल्यांकनात राज्यामध्ये ‘स्वच्छता दर्पण’मध्ये ठाणे जिल्ह्याने प्रथम स्थान प्राप्त केले असले, तरी जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील गावखेड्यांमध्ये घाणीचे साम्राज्य आजही पाहायला मिळते. असे असताना जिल्हा स्वच्छ कसा? कागदोपत्री आकडेवारी सादर करून ‘स्वच्छता दर्पण’मध्ये प्रथम स्थान मिळवले आहे किंवा कसे, असा संशय घ्यायला जागा आहे.

टॅग्स :thaneठाणेSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान