शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
3
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
4
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
5
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
6
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
7
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
8
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
9
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
11
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
12
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
13
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
14
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
15
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
16
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
17
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
18
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
19
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
20
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."

ठाण्यात कोरोना रुग्णांचा मृत्युदर पाच टक्क्यांनी वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना आता मृत्युदरही वाढल्याचे दिसत आहे. यापूर्वी मृत्युदर दोन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना आता मृत्युदरही वाढल्याचे दिसत आहे. यापूर्वी मृत्युदर दोन टक्क्यांच्या आसपास होता. आता तो ७.३ टक्क्यांच्या घरात गेला आहे. परंतु, महापालिकेच्या दप्तरी मात्र रोज ५ ते सात जणांचेच मृत्यू होत असल्याची आकडेवारी दिली जात आहे. महापालिकेच्या जवाहरबाग स्मशानभूमीत रोजच्या रोज १५ ते २० मृतदेह जाळले जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे, तर इतर दोन स्मशानभूमीतही रोजच्या रोज ८ ते १० मृतदेह येत असल्याची माहिती स्मशानभूमीत काम करणाऱ्या कामगारांनी दिली. त्यामुळे महापालिका पुन्हा मृत्यूंचा आकडा लपविते काय, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यातही गेल्या दोन दिवसांत ३५ मृत्यू झाल्याचा आरोपही करण्यात येत आहे. परंतु महापालिकेने तो फेटाळला आहे.

ठाणे महापालिका हद्दीत आतापर्यंत ९५ हजार ७३७ कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर ७८ हजार ४६२ जण उपचार घेऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत एक हजार ४४४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. यापूर्वी महापालिका हद्दीत बाधित रुग्णांचा मृत्युदर हा दोन टक्क्यांच्या आसपास होता. आता तो ७.३ टक्क्यांच्या घरात गेला आहे. परंतु, हा आकडा केवळ महापालिकेच्या दप्तरी आहे. प्रत्यक्षात महापालिका हद्दीत रोजच्या रोज मृत्यूंचा आकडा वाढताना दिसत आहे. स्मशानभूमीत काम करणाऱ्या कामगारांशी या संदर्भात चर्चा केली असता, जेव्हापासून शहरात कोरोना वाढत आहे, तेव्हापासून आमचादेखील ताण वाढला असल्याचे ते सांगतात. परंतु त्यांनादेखील ही माहिती उघड न करण्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळेच त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. ठाणे महापालिकेच्या एकट्या जवाहर बाग स्मशानभूमीत रविवारी सुमारे २० मृतांवर अंत्यसंस्कार झाल्याची माहिती येथील सूत्रांनी दिली, तर मागील काही दिवसांत रोजच्या रोज १५ ते २० मृतदेहांना अग्नि देण्याचे काम केल्याचेही त्यांनी सांगितले. जवाहर बाग स्मशानभूमीत चार गॅस शवदाहिनी आहेत त्यामुळे येथे सध्या येथे येणाऱ्या मृतदेहांमुळे येथील कर्मचाऱ्यांवरील ताणदेखील वाढल्याचे दिसत आहे, तर उर्वरित वागळे आणि कळव्याच्या स्मशानभूमीतही रोजच्या रोज ८ ते १० कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे रोजच्या रोज सरासरी आकडा जरी काढला १५ ते २० मृत्यू होत असल्याचे दिसत आहे. परंतु, महापालिकेच्या दप्तरी रोज ५ ते ७च मृत्यू दाखविले जात आहेत. त्यामुळे महापालिका कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू लपवित आहे का, असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. यापूर्वीदेखील मागील वर्षी अशाच प्रकारे पालिकेने मृत्यू लपविल्याने त्यांच्यावर टीका झाली होती. त्यामुळे आता किती मृत्यू महापालिका लपविते आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शनिवारी एका दिवसात ग्लोबल रुग्णालयात सुमारे २० मृत्यू झाले असल्याची माहितीदेखील समोर आली आहे. परंतु, पालिकेने हा दावा फेटाळला आहे. येथील रुग्णालयात दाखल एका रुग्णाने त्याच्या नजरेसमोरच आठ मृतदेह नेतांना पाहिले असल्याने त्याने ही माहिती दिली. परंतु, तसे काहीच झालेले नसल्याचा दावा महापालिकेने केला.

ठाण्यात एका खासगी रुग्णालयात एका रुग्णाचा पहाटे ३ वाजता मृत्यू झाला होता. त्यानंतर सकाळी ९ वाजल्यापासून रुग्णाचे नातेवाइकांनी शववाहिनी मिळावी यासाठी फोन केला होता. परंतु, तब्बल सव्वापाच तासानंतर ती मिळाली. त्यानंतरदेखील स्मशानभूमीत नेल्यानंतर एक तास ताटकळत त्यांना थांबावे लागल्याची बाब समोर आली आहे. त्यातही शववाहिनी मिळावी यासाठी संपर्क साधल्यानंतर आधी शासकीय रुग्णालयातील मृतदेह आम्हाला न्यायचे आहेत, तेथील पूर्ण झाल्यानंतर आम्ही तुमच्याकडे येऊ, असे उत्तर रुग्णांच्या नातेवाइकांना मिळाले होते. एकूणच यामुळे सध्या मृत्यूंचे प्रमाण किती आहे, शहरात हे यावरून दिसत आहे.

........

महापालिकेकडून कोणत्याही प्रकारचा मृत्यूंचा आकडा लपविला जात नाही. महापालिकेकडे जेवढी नोंदणी होत आहे, तेवढेच दाखविले जात आहे.

संदीप माळवी, उपायुक्त, ठामपा