शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात कोरोना रुग्णांचा मृत्युदर पाच टक्क्यांनी वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना आता मृत्युदरही वाढल्याचे दिसत आहे. यापूर्वी मृत्युदर दोन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना आता मृत्युदरही वाढल्याचे दिसत आहे. यापूर्वी मृत्युदर दोन टक्क्यांच्या आसपास होता. आता तो ७.३ टक्क्यांच्या घरात गेला आहे. परंतु, महापालिकेच्या दप्तरी मात्र रोज ५ ते सात जणांचेच मृत्यू होत असल्याची आकडेवारी दिली जात आहे. महापालिकेच्या जवाहरबाग स्मशानभूमीत रोजच्या रोज १५ ते २० मृतदेह जाळले जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे, तर इतर दोन स्मशानभूमीतही रोजच्या रोज ८ ते १० मृतदेह येत असल्याची माहिती स्मशानभूमीत काम करणाऱ्या कामगारांनी दिली. त्यामुळे महापालिका पुन्हा मृत्यूंचा आकडा लपविते काय, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यातही गेल्या दोन दिवसांत ३५ मृत्यू झाल्याचा आरोपही करण्यात येत आहे. परंतु महापालिकेने तो फेटाळला आहे.

ठाणे महापालिका हद्दीत आतापर्यंत ९५ हजार ७३७ कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर ७८ हजार ४६२ जण उपचार घेऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत एक हजार ४४४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. यापूर्वी महापालिका हद्दीत बाधित रुग्णांचा मृत्युदर हा दोन टक्क्यांच्या आसपास होता. आता तो ७.३ टक्क्यांच्या घरात गेला आहे. परंतु, हा आकडा केवळ महापालिकेच्या दप्तरी आहे. प्रत्यक्षात महापालिका हद्दीत रोजच्या रोज मृत्यूंचा आकडा वाढताना दिसत आहे. स्मशानभूमीत काम करणाऱ्या कामगारांशी या संदर्भात चर्चा केली असता, जेव्हापासून शहरात कोरोना वाढत आहे, तेव्हापासून आमचादेखील ताण वाढला असल्याचे ते सांगतात. परंतु त्यांनादेखील ही माहिती उघड न करण्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळेच त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. ठाणे महापालिकेच्या एकट्या जवाहर बाग स्मशानभूमीत रविवारी सुमारे २० मृतांवर अंत्यसंस्कार झाल्याची माहिती येथील सूत्रांनी दिली, तर मागील काही दिवसांत रोजच्या रोज १५ ते २० मृतदेहांना अग्नि देण्याचे काम केल्याचेही त्यांनी सांगितले. जवाहर बाग स्मशानभूमीत चार गॅस शवदाहिनी आहेत त्यामुळे येथे सध्या येथे येणाऱ्या मृतदेहांमुळे येथील कर्मचाऱ्यांवरील ताणदेखील वाढल्याचे दिसत आहे, तर उर्वरित वागळे आणि कळव्याच्या स्मशानभूमीतही रोजच्या रोज ८ ते १० कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे रोजच्या रोज सरासरी आकडा जरी काढला १५ ते २० मृत्यू होत असल्याचे दिसत आहे. परंतु, महापालिकेच्या दप्तरी रोज ५ ते ७च मृत्यू दाखविले जात आहेत. त्यामुळे महापालिका कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू लपवित आहे का, असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. यापूर्वीदेखील मागील वर्षी अशाच प्रकारे पालिकेने मृत्यू लपविल्याने त्यांच्यावर टीका झाली होती. त्यामुळे आता किती मृत्यू महापालिका लपविते आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शनिवारी एका दिवसात ग्लोबल रुग्णालयात सुमारे २० मृत्यू झाले असल्याची माहितीदेखील समोर आली आहे. परंतु, पालिकेने हा दावा फेटाळला आहे. येथील रुग्णालयात दाखल एका रुग्णाने त्याच्या नजरेसमोरच आठ मृतदेह नेतांना पाहिले असल्याने त्याने ही माहिती दिली. परंतु, तसे काहीच झालेले नसल्याचा दावा महापालिकेने केला.

ठाण्यात एका खासगी रुग्णालयात एका रुग्णाचा पहाटे ३ वाजता मृत्यू झाला होता. त्यानंतर सकाळी ९ वाजल्यापासून रुग्णाचे नातेवाइकांनी शववाहिनी मिळावी यासाठी फोन केला होता. परंतु, तब्बल सव्वापाच तासानंतर ती मिळाली. त्यानंतरदेखील स्मशानभूमीत नेल्यानंतर एक तास ताटकळत त्यांना थांबावे लागल्याची बाब समोर आली आहे. त्यातही शववाहिनी मिळावी यासाठी संपर्क साधल्यानंतर आधी शासकीय रुग्णालयातील मृतदेह आम्हाला न्यायचे आहेत, तेथील पूर्ण झाल्यानंतर आम्ही तुमच्याकडे येऊ, असे उत्तर रुग्णांच्या नातेवाइकांना मिळाले होते. एकूणच यामुळे सध्या मृत्यूंचे प्रमाण किती आहे, शहरात हे यावरून दिसत आहे.

........

महापालिकेकडून कोणत्याही प्रकारचा मृत्यूंचा आकडा लपविला जात नाही. महापालिकेकडे जेवढी नोंदणी होत आहे, तेवढेच दाखविले जात आहे.

संदीप माळवी, उपायुक्त, ठामपा