शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

ठाण्याची स्पर्धा पुण्याशी

By admin | Updated: April 12, 2016 01:09 IST

मुंबई, पुणे या पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ठाणे जिल्ह्यातून पालघर या आदिवासीबहुल क्षेत्राचा नवा जिल्हा निर्माण झाल्याने मानव विकास निर्देशांकाच्या नव्या अहवालात

ठाणे : मुंबई, पुणे या पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ठाणे जिल्ह्यातून पालघर या आदिवासीबहुल क्षेत्राचा नवा जिल्हा निर्माण झाल्याने मानव विकास निर्देशांकाच्या नव्या अहवालात पुणे शहराशी ठाण्याची स्पर्धा होण्याची व दरडोई उत्पन्नात पुणे उणे ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्याच्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड व शहापूर हे दोन तालुके मागास असून उर्वरित सर्व तालुके संपन्न आहेत. ठाणे जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जिल्ह्याच्या मानव विकास निर्देशांकाच्या आराखड्याचे सादरीकरण ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांना करण्यात आले. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात सादर झालेल्या ताज्या आर्थिक पाहणी अहवालात मुंबईचा मानव विकास निर्देशांक ०.८४१, पुण्याचा ०.८१४ तर ठाणे जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक ०.८०० आहे. जिल्ह्याचे २०१४ मध्ये विभाजन झाल्यानंतर नव्या ठाणे जिल्ह्याचा मानव विकास अहवाल यशदा आणि मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागातर्फे तयार करण्यात आला. यासाठी ७५० नागरी तर २५० ग्रामीण भागातील घरांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले. राहणीमानाचा दर्जा, आरोग्य, रोजगार, दारिद्रय, लैंगिक असमानता, साक्षरता, पायाभूत सुविधा, अशा निकषांच्या आधारे नोंदले गेलेले निष्कर्ष यावेळी मांडण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड व शहापूर या दोन तालुक्यांत वरील निकषांच्या आघाडीवर वाईट परिस्थिती आहे. सदर अहवाल इंग्रजी आणि मराठीत तयार करून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसमोर ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. मानवी विकासाचा वेग अभ्यासण्यासाठी युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅमतर्फे असा अहवाल तयार करण्यात येत असतो याचाच एक भाग म्हणून नीती आयोगाच्या सूचनेनुसार मानव विकास अहवालाचे काम केले जाते अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे यांनी दिली. अर्थशास्त्र विभागाच्या डॉ. मनीषा कर्णिक, प्रो. नाडकर्णी, स्वाती राजू, संध्या म्हात्रे तसेच यशदाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.