शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने फासला डिजिटल इंडियाला हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 23:13 IST

किऑस्को मशीन बंद : आॅनलाइन सातबाऱ्याअभावी नागरिकांचे हाल

ठाणे : ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळ मजल्यावर सातबारा मिळविण्यासाठी किआॅस्को मशीन बसविली आहे. मात्र, ती मशीन गेल्या काही दिवसांपासून बंद असल्यामुळे आॅनलाइन सातबारा घेण्यासाठी येणाºया नागरिकांना निराश होऊन खालीहात परतावे लागत आहे. तर, सेतू कार्यालयात बसवलेल्या फाइल ट्रॅकिंगच्या दोन्ही मशीनही बंद असल्याचे समोर आले आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया मोहिमेलाच या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करून जिल्हा प्रशासनाने हरताळ फासल्याचे दिसत आहे.

सध्याचे युग हे हायटेक युग म्हणून ओळखले जात आहे. त्यात सर्व सरकारी कार्यालयांचा कारभार डिजिटल होत आहे. त्यानुसार, महसूल विभागानेही आॅनलाइन पद्धतीचा अवलंब करीत राज्यभरातील कोणताही सातबारा संबंधित शेतकऱ्यांस आॅनलाइन मिळवता यावा, यासाठी सातबारा संगणकीकरणाचे कामदेखील वेगाने सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलदार कार्यालयामार्फत आॅनलाइन सेवा देण्यात येत आहे. त्यात आपले सरकारच्या ई-महाभूमी उपक्र माखाली आॅनलाइन सातबारे शेतकºयांना उपलब्ध होत आहेत. त्यानुसार, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील तळ मजल्यावर किआॅस्को मशीन बसविली आहे. या मशीनद्वारे केवळ २३ रुपयांमध्ये शेतकºयांना अवघ्या काही मिनिटांतच सातबारा प्राप्त होत आहे. त्यामुळे सातबारा घेण्यासाठी तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत नाहीत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही मशीन बंद आहे.फाइल ट्रॅकिंग मशीनही बंदसेतू कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयातील तळ मजल्यावर व पहिल्या मजल्यावर फाइल ट्रॅकिंगसह शासकीय माहिती मिळविण्यासाठी व शासनाच्या इतर वेबसाइटची माहिती देणारे मशीनदेखील मागील दोन महिन्यांपासून बंद असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे विविध प्रकल्पांच्या फाईल नेमक्या कुठे आहेत, हे शोधणे अशिलांना कठिण होऊन बसले असून जिल्हाधिकारी कार्यालयांतील कथीत दलालांची मात्र, यामुळे चांदी झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळेच प्रशासन हे ट्रॅकिंग मशीनसह किआॅस्क दुरुस्तीकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप होऊ लागला आहे.शेतकºयांना बसतोय नाहक भुर्दंडज्या शेतकºयांची स्थानिक तहसील कार्यालयाकडून अडवणूक करण्यात येते, त्यातील बहुसंख्य जण जिल्हाधिकारी असलेल्या या किआॅस्कमध्ये सातबाराचे उतारे घेण्यासाठी येत असतात. मात्र, ते बंद असल्याने दूरवरून भाडे खर्चुन येऊनही त्यांना खाली हात परतावे लागत असल्याने त्यांना नाहक आर्थिक भुुर्दंड बसत आहे.