शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

Thane: भंडार्ली कचरा प्रकल्प ३१ ऑगस्ट पासून होणार कायमचा बंद

By अजित मांडके | Updated: August 3, 2023 19:11 IST

Thane: मागील कित्येक वर्षे चर्चेत असलेला डायघर कचरा प्रकल्प अखेर पूर्ण क्षमतेने परंतु तो सुध्दा टप्याटप्याने येत्या १ सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. त्यामुळे महापालिकेला अखेर या निमित्ताने हक्काचे डम्पींगही उपलब्ध झाले आहे.

- अजित मांडके ठाणे - ठाणे महापालिकेचा भंडार्ली येथील कचरा प्रकल्प पुढील १५ सप्टेंबर पर्यंत बंद केला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिकांना दिले होते. त्यानुसार महापालिकेने त्याची तयारी केली असून आता १५ सप्टेंबर नाही तर ३१  ऑगस्ट पासून भंडार्ली येथील कचरा प्रकल्प टप्याटप्याने कायमचा बंद होणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेने दिली. तर मागील कित्येक वर्षे चर्चेत असलेला डायघर कचरा प्रकल्प अखेर पूर्ण क्षमतेने परंतु तो सुध्दा टप्याटप्याने येत्या १ सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. त्यामुळे महापालिकेला अखेर या निमित्ताने हक्काचे डम्पींगही उपलब्ध झाले आहे.

ठाणे महापालिकेला हक्काचे डम्पींग नसल्याने मागील काही वर्षे महापालिका दिवा येथे कचरा डम्प करीत होती. परंतु त्याला विरोध झाल्याने अखेर दिड वर्षापूर्वी येथील डम्पींग कायमचे बंद करण्यात आले. त्यानंतर डायघरचा प्रकल्प सुरु करण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरु केल्या होत्या. परंतु त्याठिकाणी देखील स्थानिकांचा विरोध दिसून आला. दिव्यातील विरोध लक्षात घेऊन महापालिकेने तात्पुरत्या स्वरुपात भंडार्ली येथे कचरा टाकण्यास सुरवात केली होती. हा प्रकल्प केवळ एक वर्षासाठी होता. परंतु वर्षभरानंतरही हा प्रकल्प सुरु राहिल्याने आणि पावसाळ्यात त्याचा त्रास येथील रहिवाशांना झाल्याने अखेर स्थानिकांनी मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मागील महिन्यात महापालिकेत धडक दिली होती. त्यानंतर आयुक्त अभिजीत बांगर यांनी त्यांना १५ सप्टेंबर पर्यंत तेथील प्रकल्प बंद करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर या शिष्ठमंडळाने काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावेळी शिंदे यांनी देखील तेच आश्वासन येथील स्थानिकांना दिले होते.

परंतु आता १५ सप्टेंबर नाही तर ३१ ऑगस्ट हा भंडार्ली येथे कचरा टाकण्याचा शेवटचा दिवस असणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. त्यानंतर येथील कचरा महापालिकेच्या हक्काच्या डम्पींगमध्ये टाकला जाणार आहे. ठाणे महापालिकेचे डायघर येथे कचरा प्रकल्प उभारण्याचे प्रयत्न सुमारे १४ वर्षानंतर प्रत्यक्षात उतरत आहे. त्यानुसार येत्या १ सप्टेंबर पासून याच ठिकाणी संपूर्ण क्षमतेने येथे कचºयावर प्रक्रिया करणारा प्रकल्प सुरु केला जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

३१  ऑगस्ट पासून भंडार्ली येथील कचरा प्रकल्प हा टप्याटप्याने बंद केला जाणार आहे. परंतु १ सप्टेंबर पासून डायघर येथे देखील टप्याटप्याने कचरा टाकला जाणार आहे. १५ सप्टेंबर पासून येथील प्रकल्प संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित केला जाणार आहे. सध्या १ सप्टेंबर पासून पहिल्या टप्यात डायघर येथे टाकल्या जाणा-या कच-यावर शास्त्रोक्तपध्दतीने प्रक्रिया केली जाणार आहे. त्यानंतर दुसºया टप्यात वीज निर्मिती केली जाणार आहे.- प्रशांत रोडे (अतिरिक्त आयुक्त, ठामपा)

टॅग्स :dumpingकचराthaneठाणे