शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

ठाण्यात २४ बाय ७ पाणीपुरवठा

By admin | Updated: April 12, 2017 03:40 IST

पाणीगळती, चोरी, वितरण व्यवस्था भक्कम करतांनाच ठाणेकरांना येत्या काळात २४ बाय सात म्हणजेच आठवड्याचे सातही दिवस २४ तास पाणी देण्यासाठीचे नियोजन करण्यास

ठाणे : पाणीगळती, चोरी, वितरण व्यवस्था भक्कम करतांनाच ठाणेकरांना येत्या काळात २४ बाय सात म्हणजेच आठवड्याचे सातही दिवस २४ तास पाणी देण्यासाठीचे नियोजन करण्यास पालिकेने सुरुवात केली या संदर्भातील पहिला पायलट प्रोजेक्ट उथळसर प्रभाग समितीत राबविला जाणार असून या संदर्भातील अ‍ॅटोमॅटीक मीटरची निविदा मागविली आहे. यानुसार पुढील तीन वर्षात या भागातील तब्बल १४ हजार ५०० ग्राहकांना २४ तास पाणी मिळणार आहे. ठाणे महापालिकेने पाणी व्यवस्था मजबुत करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यानुसार रिमॉडेलींग योजना, वॉटर आॅडिट, वॉटर किआॅक्स, स्मार्ट मीटर, पाणीगळती रोखणे, चोरीवर निर्बंध घालण्यासाठी २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात भरीव अशी तरतूद केली आहे. महापालिका हद्दीतील सद्यस्थितीत २३.५० लाख लोकसंख्येला सरासरी २ ते ६ तास एवढ्या कालावधीत ४८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे. आता ठाणेकरांसाठी २४ तास पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना पालिकेने प्रस्तावित केली आहे. त्यानुसार हा प्रकल्प ५ वर्षात पूर्ण करण्याची पालिकेची इच्छा असून २० वर्ष कालावधीसाठी देखभाल दुरुस्तीसह राबविण्याचा पालिकेचा मानस आहे. यामध्ये अस्तित्वातील व नव्याने अंथरण्यात येणाऱ्या वाहिन्यांचा लेखाजोखा करुन गळती शोधणे, ती बंद करणे, जलमापकांचे वाचन व त्याचे देयक वितरीत करुन प्रभावीपणे त्याची वसुली करणे आदी बाबींचा यामध्ये अंतर्भाव केला आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर नागरिकांना २४ तास शुद्ध व स्वच्छ पाणी भारतीय मानकाप्रमाणे उपलब्ध होणार आहे. तर वाया जाणाऱ्या पाण्याची बचत होऊन सुयोग्य नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी ५० कोटींची आर्थिक तरतूद प्रस्तावित केली आहे. (प्रतिनिधी) - आता अर्थसंकल्पात नमूद केलेल्या बाबींचा विचार करुन पहिला पायलेट प्रोजेक्ट उथळसर प्रभाग समितीमध्ये कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील आॅटोमॅटीक मीटरची निविदा मागविल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर या प्रभाग समितीमध्ये हा प्रयोग राबविला जाणार आहे. - याअंतर्गत सिद्धेश्वर जलकुंभ, जेल जलकुंभ, ऋुतूपार्क, रुस्तमजी जलकुंभाखालील वितरण व्यवस्था मजबुत करण्यात येणार असून या जलकुंभांवरुन पाणी पहिल्या टप्यात १४ हजार ५०० ग्राहकांना मिळणार असून तीन वर्षात योजना पूर्ण होणार आहे. - ही योजना अंशत: पीपीपी तत्वावर राबविली जाणार असून 70%रक्कम संबधीत विकासकाला काम सुरु असताना आणि उर्वरित रक्कम ही पुढील सात वर्षांच्या देखभाल दुरुस्तीच्या कालावधीत दिली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.