शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
3
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
4
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
5
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
6
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
7
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
8
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
9
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
10
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
11
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
12
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
13
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
14
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
15
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
16
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
17
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
18
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
19
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
20
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

ठाण्यात २४ बाय ७ पाणीपुरवठा

By admin | Updated: April 12, 2017 03:40 IST

पाणीगळती, चोरी, वितरण व्यवस्था भक्कम करतांनाच ठाणेकरांना येत्या काळात २४ बाय सात म्हणजेच आठवड्याचे सातही दिवस २४ तास पाणी देण्यासाठीचे नियोजन करण्यास

ठाणे : पाणीगळती, चोरी, वितरण व्यवस्था भक्कम करतांनाच ठाणेकरांना येत्या काळात २४ बाय सात म्हणजेच आठवड्याचे सातही दिवस २४ तास पाणी देण्यासाठीचे नियोजन करण्यास पालिकेने सुरुवात केली या संदर्भातील पहिला पायलट प्रोजेक्ट उथळसर प्रभाग समितीत राबविला जाणार असून या संदर्भातील अ‍ॅटोमॅटीक मीटरची निविदा मागविली आहे. यानुसार पुढील तीन वर्षात या भागातील तब्बल १४ हजार ५०० ग्राहकांना २४ तास पाणी मिळणार आहे. ठाणे महापालिकेने पाणी व्यवस्था मजबुत करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यानुसार रिमॉडेलींग योजना, वॉटर आॅडिट, वॉटर किआॅक्स, स्मार्ट मीटर, पाणीगळती रोखणे, चोरीवर निर्बंध घालण्यासाठी २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात भरीव अशी तरतूद केली आहे. महापालिका हद्दीतील सद्यस्थितीत २३.५० लाख लोकसंख्येला सरासरी २ ते ६ तास एवढ्या कालावधीत ४८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे. आता ठाणेकरांसाठी २४ तास पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना पालिकेने प्रस्तावित केली आहे. त्यानुसार हा प्रकल्प ५ वर्षात पूर्ण करण्याची पालिकेची इच्छा असून २० वर्ष कालावधीसाठी देखभाल दुरुस्तीसह राबविण्याचा पालिकेचा मानस आहे. यामध्ये अस्तित्वातील व नव्याने अंथरण्यात येणाऱ्या वाहिन्यांचा लेखाजोखा करुन गळती शोधणे, ती बंद करणे, जलमापकांचे वाचन व त्याचे देयक वितरीत करुन प्रभावीपणे त्याची वसुली करणे आदी बाबींचा यामध्ये अंतर्भाव केला आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर नागरिकांना २४ तास शुद्ध व स्वच्छ पाणी भारतीय मानकाप्रमाणे उपलब्ध होणार आहे. तर वाया जाणाऱ्या पाण्याची बचत होऊन सुयोग्य नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी ५० कोटींची आर्थिक तरतूद प्रस्तावित केली आहे. (प्रतिनिधी) - आता अर्थसंकल्पात नमूद केलेल्या बाबींचा विचार करुन पहिला पायलेट प्रोजेक्ट उथळसर प्रभाग समितीमध्ये कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील आॅटोमॅटीक मीटरची निविदा मागविल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर या प्रभाग समितीमध्ये हा प्रयोग राबविला जाणार आहे. - याअंतर्गत सिद्धेश्वर जलकुंभ, जेल जलकुंभ, ऋुतूपार्क, रुस्तमजी जलकुंभाखालील वितरण व्यवस्था मजबुत करण्यात येणार असून या जलकुंभांवरुन पाणी पहिल्या टप्यात १४ हजार ५०० ग्राहकांना मिळणार असून तीन वर्षात योजना पूर्ण होणार आहे. - ही योजना अंशत: पीपीपी तत्वावर राबविली जाणार असून 70%रक्कम संबधीत विकासकाला काम सुरु असताना आणि उर्वरित रक्कम ही पुढील सात वर्षांच्या देखभाल दुरुस्तीच्या कालावधीत दिली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.