शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

Thane: दीड दिवसांच्‍या गणपती विसर्जनात १० टन निर्माल्‍य संकलित

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: September 21, 2023 14:05 IST

Thane Ganesh Mahotsav: प्रत्‍येक उत्‍सव हा हरित उत्‍सव व्‍हावा यासाठी गेली बारा वर्षे काम करीत असलेल्‍या समर्थ भारत व्‍यासपीठाच्‍या महानिर्माल्‍य अभियानाला गणेशभक्‍तांनी याही वर्षे उदंड प्रतिसाद दिला.

- प्रज्ञा म्हात्रेठाणे - प्रत्‍येक उत्‍सव हा हरित उत्‍सव व्‍हावा यासाठी गेली बारा वर्षे काम करीत असलेल्‍या समर्थ भारत व्‍यासपीठाच्‍या महानिर्माल्‍य अभियानाला गणेशभक्‍तांनी याही वर्षे उदंड प्रतिसाद दिला. दीड दिवसाच्‍या गणेश विसर्जनाच्‍यावेळी यंदा १० टनाहून अधिक निर्माल्‍य भक्‍तांनी दान केले. यावर्षी निर्माल्‍यातील अविघटनशिल घटकांचे प्रमाण लक्षणियरित्‍या घट असल्‍याचे निदर्शनास आले आहे.

ठाणे महानगरपालिका आणि समर्थ भारत व्‍यासपीठ गेली १२ वर्षे गणेशोत्‍सव काळातील निर्माल्‍य व्‍यवस्‍थापन करीत आहे. तलावांचे शहर असलेल्‍या ठाण्‍याने कृतीम तलाव व निर्माल्‍य व्‍यवस्‍थापन असे दोन अभिनव उपक्रम महाराष्‍ट्राला दिले आहेत. प्रत्‍येक उत्‍सव हा हरित उत्‍सव व्‍हावा व पर्यावरणाचे जतन, रक्षण तसेच सर्वधन व्‍हावे यासाठी समर्थ भारत व्‍यासपीठ नेहमीच प्रयत्‍नशिल असते यात ठाणे महानगरपालिका, रोटरी क्‍लब ऑफ ठाणे गार्डन सिटी तसेच प्रकल्‍प पुर्ननिर्माणचे सदस्‍य सहयोग देत असतात. दीड दिवसाच्‍या गणपतीत १० टनाहुन अधिक निर्माल्‍य संकलित करण्‍यात आले आहे. या निर्माल्‍यावर प्रक्रिया करून त्‍याचे सेंद्रीय खत तयार केले जाणार आहे.

तसेच निर्माल्‍यातील अविघटनशिल घटकांचे वर्गीकरण करून ते पुर्नप्रक्रियेसाठी पाठवण्‍यात येणार आहेत. यावर्षी अविघटनशिल घटक जसे की, प्‍लास्‍टीक, थर्मोकोल यांचे निर्माल्‍यातील प्रमाण लक्षणियरित्‍या कमी झाले असुन केवळ ४ टक्‍केच म्‍हणजे ४०० किलोच अजैविक कचरा आढळुन आला. गेल्‍या १२ वर्षांच्‍या सातत्‍यपुर्ण जनजागृती, कृतीरूप कार्यक्रमामुळे हे शक्‍य झाले आहे. यात पर्यावरणस्‍नेही गणेशभक्‍त व समर्थ भारत व्‍यासपीठाशी संलग्‍न सफाईसेवक महिलांचे अनन्‍यसाधारण असे योगदान लाभले आहे अशी प्रतिक्रिया समर्थ भारत व्‍यासपीठाचे संचालक सुजय कुलकर्णी यांनी व्‍यक्‍त केली. दीड दिवसांच्‍या गणपती सोबत पाच, सात आणि दहा दिवसांच्‍या गणपतीच्‍या विजर्सनाच्‍यावेळी देखील निर्माल्‍य संकलित करण्‍यात येणार आहे. तरी भाविकांनी तलावात,खाडीत निर्माल्‍य विसर्जित न करता ते विसर्जन घाटावर ठाणे महानगरपालिकेच्‍या निर्माल्‍य स्‍वीकार केंद्रात दान करावे असे आवाहन व्‍यासपीठाचे संचालक सुजय कुलकर्णी यांनी केले आहे.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवthaneठाणे