शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

ठाण्यात १० सिग्नल फ्लॅश मोडवर, पाच वर्षांत सव्वा कोटीचा चुराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 04:40 IST

शहरातील बेशिस्त वाहतुकीमुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडी होऊन निष्पाप नागरिकांना त्याची झळ सोसावी लागत आहे. त्याची जाणीव गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रखरतेने होत आहे.

सुरेश लोखंडे ठाणे : शहरातील बेशिस्त वाहतुकीमुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडी होऊन निष्पाप नागरिकांना त्याची झळ सोसावी लागत आहे. त्याची जाणीव गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रखरतेने होत आहे. यास स्वयंचलित सिग्नल यंत्राही जबाबदार असल्याचे आढळून आले आहे. त्यावर, प्रामुख्याने लक्ष केंद्रित करून ठाणे शहरातील सिग्नल यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.शहरातील ठिकठिकाणच्या रस्त्यांवर सुमारे २५ सिग्नल कार्यरत आहेत. मागील पाच वर्षांच्या कालावधीत या सिग्नलच्या देखभाल दुरुस्तीवर एक कोटी २५ लाख ३६ हजारांची रक्कम खर्चही झाली आहे. मात्र, त्यातील केवळ १५ सिग्नल कार्यरत असल्याचा दावा केला जात असून १० सिग्नल फ्लॅश मोडवर असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ते नादुरुस्त असल्याचे दिसून येत असल्याने येथील वाहतूक बेशिस्तीत व मनमानी धावत असल्याचे निदर्शनास आले आहे. शहराची लोकसंख्या, त्यातील वाहन संख्या ही जीव घेणारी ठरत आहे. अपघातांचे प्रमाण लक्षात घेता वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज आहे. त्यासाठी जागोजागी असलेली सिग्नल यंत्रणा सतर्क केल्यास वाहतूक पोलिसांवरील ताणही मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.गणेश चतुर्थीच्या मिरवणुकांप्रसंगी शहरातील बेशिस्त वाहतुकीचा फटका विघ्नहर्त्या गणरायालादेखील बसला आहे. तरीदेखील सिग्नल यंत्रणा व शहरातील वाहतूक सुरळीत असल्याचा दावा प्रशासनाकडून होत असल्याचे उघड झाले आहे. शहरात तीनहातनाका, अल्मेडा रोड, खोपटनाका, कॅटबरी, तुळशीधाम चौक, ब्रह्मांडनाका, विजय गार्डन, आनंदनगर, कासारवडवली, ओवळानाका, कोळशेत रोड, बाळकुम जकातनाका, जीपीओ, यशस्वीनगरनाका, वसंत विहार चौक आदी १५ सिग्नल सद्य:स्थितीत कार्यरत आहेत. मात्र, सर्वाधिक वाहतुकीचे चौक व नाक्यांवरील सिग्नल यंत्रणा कुचकामी असून ते केवळ फलॅश मोडवर कार्यरत आहेत. यामध्ये ईस्टर्न एक्स्प्रेस महामार्ग व एलबीएस महामार्ग, जुना आग्रा रोड आदींवरील वाहतुकीला तोंड देणारा टेलिफोन एक्स्चेंज चौकातील सिग्नल केवळ नामधारी आहे.याप्रमाणेच वागळे चेकनाका, मानपाडानाका, खारेगावनाका, कोर्टनाका, पाटीलपाडा चौक, संत गजानन चौक, तीन पेट्रोलपंप, मनीषनगर जंक्शन आणि काशिनाथ घाणेकर चौक आदी महत्त्वाच्या ठिकाणचे सिग्नल फ्लॅश मोडवर असूनही ते कार्यरत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.