शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

ठाण्यात १० सिग्नल फ्लॅश मोडवर, पाच वर्षांत सव्वा कोटीचा चुराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 04:40 IST

शहरातील बेशिस्त वाहतुकीमुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडी होऊन निष्पाप नागरिकांना त्याची झळ सोसावी लागत आहे. त्याची जाणीव गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रखरतेने होत आहे.

सुरेश लोखंडे ठाणे : शहरातील बेशिस्त वाहतुकीमुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडी होऊन निष्पाप नागरिकांना त्याची झळ सोसावी लागत आहे. त्याची जाणीव गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रखरतेने होत आहे. यास स्वयंचलित सिग्नल यंत्राही जबाबदार असल्याचे आढळून आले आहे. त्यावर, प्रामुख्याने लक्ष केंद्रित करून ठाणे शहरातील सिग्नल यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.शहरातील ठिकठिकाणच्या रस्त्यांवर सुमारे २५ सिग्नल कार्यरत आहेत. मागील पाच वर्षांच्या कालावधीत या सिग्नलच्या देखभाल दुरुस्तीवर एक कोटी २५ लाख ३६ हजारांची रक्कम खर्चही झाली आहे. मात्र, त्यातील केवळ १५ सिग्नल कार्यरत असल्याचा दावा केला जात असून १० सिग्नल फ्लॅश मोडवर असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ते नादुरुस्त असल्याचे दिसून येत असल्याने येथील वाहतूक बेशिस्तीत व मनमानी धावत असल्याचे निदर्शनास आले आहे. शहराची लोकसंख्या, त्यातील वाहन संख्या ही जीव घेणारी ठरत आहे. अपघातांचे प्रमाण लक्षात घेता वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज आहे. त्यासाठी जागोजागी असलेली सिग्नल यंत्रणा सतर्क केल्यास वाहतूक पोलिसांवरील ताणही मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.गणेश चतुर्थीच्या मिरवणुकांप्रसंगी शहरातील बेशिस्त वाहतुकीचा फटका विघ्नहर्त्या गणरायालादेखील बसला आहे. तरीदेखील सिग्नल यंत्रणा व शहरातील वाहतूक सुरळीत असल्याचा दावा प्रशासनाकडून होत असल्याचे उघड झाले आहे. शहरात तीनहातनाका, अल्मेडा रोड, खोपटनाका, कॅटबरी, तुळशीधाम चौक, ब्रह्मांडनाका, विजय गार्डन, आनंदनगर, कासारवडवली, ओवळानाका, कोळशेत रोड, बाळकुम जकातनाका, जीपीओ, यशस्वीनगरनाका, वसंत विहार चौक आदी १५ सिग्नल सद्य:स्थितीत कार्यरत आहेत. मात्र, सर्वाधिक वाहतुकीचे चौक व नाक्यांवरील सिग्नल यंत्रणा कुचकामी असून ते केवळ फलॅश मोडवर कार्यरत आहेत. यामध्ये ईस्टर्न एक्स्प्रेस महामार्ग व एलबीएस महामार्ग, जुना आग्रा रोड आदींवरील वाहतुकीला तोंड देणारा टेलिफोन एक्स्चेंज चौकातील सिग्नल केवळ नामधारी आहे.याप्रमाणेच वागळे चेकनाका, मानपाडानाका, खारेगावनाका, कोर्टनाका, पाटीलपाडा चौक, संत गजानन चौक, तीन पेट्रोलपंप, मनीषनगर जंक्शन आणि काशिनाथ घाणेकर चौक आदी महत्त्वाच्या ठिकाणचे सिग्नल फ्लॅश मोडवर असूनही ते कार्यरत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.