शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

दिवाळीसाठी ठाण्याचे ‘ब्रॅण्ड’ सेलिब्रेशन, ठाणे होणार लख्ख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:44 IST

दिवाळीपूर्वी ठाणेकरांचा प्रवास सुखकर आणि अपघातमुक्त करण्यासाठी ठाणे महापालिकेने कंबर कसली आहे. त्यानुसार, शहरातील रस्त्यांची धुलाई, खड्डे बुजवणे, वॉल पेटिंग्ज, बॅरिकेट्स पेंटिग्ज, फुटपाथ, गार्डन धुलाई, तलावांची सफाई आणि एकूणच

ठाणे : दिवाळीपूर्वी ठाणेकरांचा प्रवास सुखकर आणि अपघातमुक्त करण्यासाठी ठाणे महापालिकेने कंबर कसली आहे. त्यानुसार, शहरातील रस्त्यांची धुलाई, खड्डे बुजवणे, वॉल पेटिंग्ज, बॅरिकेट्स पेंटिग्ज, फुटपाथ, गार्डन धुलाई, तलावांची सफाई आणि एकूणच चकाचक व विद्युत रोषणाईने ठाणे लख्ख चमकवण्यासाठी महापालिकेचे तब्बल ११० इंजिनीअर दिवसरात्र कामाला लागले आहेत. एकूणच ब्रॅण्ड ठाण्याचे ब्रॅण्डिंग करून ठाणेकरांबरोबर दिवाळीच जबरदस्त सेलिब्रेशन करण्यात येणार आहे.शहराने स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू केली. परंतु, या स्मार्ट ठाण्यात आजही अनेक समस्यांना तोंड लागत आहे. खड्ड्यांतून मार्ग काढणे, घाणेरडे फुटपाथ, धुळीमुळे होणाºया प्रदूषणासह इतर समस्यांमुळे ठाणेकर पुरते हैराण आहेत. दिवाळीपूर्वी तरी यातून सुटका होणार का, असा सवाल त्यांच्याकडून होत आहे. ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांनी १० दिवसांपूर्वी सर्व विभागांच्या अधिकाºयांची बैठक घेऊन दिवाळीपूर्वी चांगले रस्ते, खड्डेमुक्त प्रवास, विद्युत रोषणाई आदी कामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, आता नगरअभियंता अनिल पाटील यांनी तत्काळ याचे व्हिजन तयार करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल ११० इंजिनीअरची टीम आणि ६०० जणांचे पथक कामाला लागले आहे.शहरातील ३ लाख ५९ स्क्वेअर मीटर परिसरात पेटिंग्जचे काम सुरू झाले आहे. पालिका आयुक्तांनी ब्रॅण्डिंग ठाण्याच्या ज्या तीन छटा सांगितल्या आहेत. त्या पेटिंग्जच्या माध्यमातून उमटल्या जात आहेत. त्यानुसार, या कामी खाजगी लोकसहभाग घेतला जात आहे. तसेच यामध्ये शहरातील १४१ किमीचे ९८ रस्ते आणि २२ चौक हे या माध्यमातून चकाचक केले जात आहेत. या ठिकाणी रस्त्यावर पडलेले १७०० खड्डे बुजवण्याबरोबर डिव्हायडरसह बॅरिकेट्स पेंटिंग आदींसह फुटपाथ, रस्ते धुलाईचीदेखील कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. याशिवाय, फुटपाथच्या बाजूला असलेल्या झाडांनादेखील ९ इंचांपर्यंत रंगरंगोटी करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांचे, चौकांचे रूपडे पालटणार आहे. याशिवाय, रस्त्यावरील डेब्रिज उचलणे, गटार साफ करणे, कचरा उचलणे, ही कामेही केली जात आहेत. याशिवाय, शहरातील मुख्य गार्डन, तलावांचीदेखील साफसफाई केली जात आहे. येत्या १३ आॅक्टोबरपर्यंत ही कामे केली जाणार असून यामध्ये झाडांवर विद्युत रोषणाई करणे, मोठे लाइट लावणे, हाय वे चकाचक करणे या याकामांचादेखील समावेश आहे. एकूणच एखादा नागरिक जेव्हा दिवाळीची पहिली अंघोळ करून घराबाहेर पडेल, तेव्हा त्याला ब्रॅण्डिंग ठाण्याचे सेलिब्रेशन पाहावयास मिळावे, हा मुख्य उद्देश असल्याची माहिती प्रभारी नगरअभियंता अनिल पाटील यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेdiwaliदिवाळी