शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

ठामपा हक्कभंगाच्या छायेत

By admin | Updated: December 22, 2016 06:13 IST

विधान परिषद सभापती अथवा विधानसभा अध्यक्ष यांनी दिलेले निर्देश राज्य शासनावर बंधनकारक असताना ठाणे महापालिकेने

ठाणे : विधान परिषद सभापती अथवा विधानसभा अध्यक्ष यांनी दिलेले निर्देश राज्य शासनावर बंधनकारक असताना ठाणे महापालिकेने सभापतींच्या निर्देशाशी विपरित ठराव मंजूर केल्यामुळे नवा कायदेशीर व राजकीय पेच निर्माण झाला आहे. कळवा खाडीलगतची अतिक्रमणे काढण्याबाबत महासभेने एकमताने मंजूर केलेला ठराव राज्य शासनाकडे पाठवून कारवाईमधील अडथळा दूर करण्याकरिता महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल बुधवारी दिवसभर प्रयत्नशील होते. मात्र, अचानक राष्ट्रवादी काँग्रेसने महासभेतील ठरावाच्या बाजूने केलेल्या मतदानापासून फारकत घेतल्याने शिवसेना, भाजपाचे नगरसेवकही मतपेटीच्या राजकारणाबाबत सावध झाले आहेत.विधिमंडळाच्या सर्वोच्च सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्यांनी दिलेले आदेश साऱ्यांवरच बंधनकारक असतात. असे असतानाही ठाणे महापालिकेतील नगरसेवकांनी त्या आदेशांच्या विपरित ठराव केल्यामुळे हक्कभंगाची कारवाई ओढवून घेतल्याचे विधिमंडळ कायद्याच्या जाणकारांचे मत आहे. यापूर्वी २१ वर्षांपूर्वी विधानसभा अध्यक्षांच्या आदेशाच्या विपरित निर्णय घेऊन मुंबई महापालिका सभागृहाने हक्कभंगाची कारवाई ओढवून घेतली होती. त्याचीच पुनरावृत्ती झाल्याचे जाणकारांचे मत आहे.ठाणे महापालिका प्रशासन महासभेतील ठराव राज्य शासनाच्या खटपटीत बुधवारी होते. ठराव राज्य शासनाकडे धाडण्याकरिता सूचक, अनुमोदक आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या त्यावर स्वाक्षऱ्या घेण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत सूचक आणि अनुमोदक यांच्या स्वाक्षऱ्याच झालेल्या नव्हत्या. महापौर संजय मोरे यांच्याशी संपर्क साधला असता, तो ठराव अद्याप माझ्यापर्यंत आलाच नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रकरण विधिमंडळाशी संबंधित असल्याने आता जर या ठरावावर स्वाक्षऱ्या केल्या तर आपण गोत्यात येणार नाही ना, अशा विवंचनेत सध्या सूचक, अनुमोदक सापडले आहेत. कळवा-मुंब्रा ही राष्ट्रवादी काँग्रेसची व्होट बँक असून कारवाईमुळे ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्याला धक्का लागेल. यामुळे मंगळवारी ठरावाला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या कळव्यातील आठ नगरसेवकांना राजीनामे देण्यास पक्षाने भाग पाडले. राष्ट्रवादीची व्होट बँक फोडण्यासाठी कारवाईचा अट्टहास सत्ताधाऱ्यांकडून सुरू झाल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. पालिकेकडून होणाऱ्या या कारवाईत सुमारे ३ हजार घरे जमीनदोस्त होणार आहेत. म्हणजे तब्बल ३० हजारांहून अधिक रहिवासी बेघर होणार आहेत, असा राष्ट्रवादीचा दावा आहे. त्यामुळे आयुक्तांची कारवाई सुरूच राहिली, तर राष्ट्रवादीला फटका बसून त्याचा फायदा कदाचित कळव्यात शिवसेना आणि भाजपा उठवेल, अशी भीती राष्ट्रवादीला वाटत आहे. आम्ही व्होट बँकेचे राजकारण करीत नसल्याचे राष्ट्रवादी जाहीरपणे सांगत असली तरी नगरसेवकांचे राजीनामे देऊन आयुक्तांवर दबाव आणून निवडणुकीपर्यंत बेकायदा बांधकामे वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीच्या पवित्र्याने शिवसेना, भाजपादेखील सावध झाले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर आयुक्तांनी कारवाई सुरूच ठेवली, तर आज राष्ट्रवादीच्या मतदारांवर हातोडा पडत असल्याने ते अडचणीत आहेत. उद्या कदाचित आपल्या मतदारांवरही आयुक्त हातोडा टाकू शकतात. त्यामुळे आता महासभेच्या ठरावावर स्वाक्षऱ्या करून हक्कभंगाची कारवाई ओढवून घेण्यास व त्यापेक्षाही मतदारांचा विश्वासभंग करण्यास सत्ताधारी शिवसेना-भाजपाही का कू करू लागले आहेत. (प्रतिनिधी)