शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

ठामपाची प्लास्टिक अन् थर्माकोलमुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 03:02 IST

ठाणे महापालिकेने आता प्लास्टिक बंदीसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. निर्धारीत कालावधीनंतरही प्लास्टिक किंवा थर्माकोलच्या वस्तुंचा वापर केल्याचे आढळल्यास संबधीतांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यास पालिकेने बुधवारपासून सुरुवात केली.

ठाणे : ठाणे महापालिकेने आता प्लास्टिक बंदीसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. निर्धारीत कालावधीनंतरही प्लास्टिक किंवा थर्माकोलच्या वस्तुंचा वापर केल्याचे आढळल्यास संबधीतांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यास पालिकेने बुधवारपासून सुरुवात केली.दुकानांच्या गोडाउनमधील वस्तुंची विल्हेवाट लावण्यासाठीही पालिकने पावले उचलली. त्याकरीता एक व्हॉट्सअ‍ॅप नंबर उपलब्ध करून दिला असून त्यावर एक मेसेज करताच महापालिकेची गाडी प्लास्टिक, थर्माकोलच्या वस्तू उचलण्यासाठी हजर होणार आहे.>व्हॉटस्अ‍ॅप सेवेद्वारे घरपोच संकलन करणारकाही महिन्यांपूर्वी राज्य शासनाच्या वतीने प्लास्टीक आणि थर्माकोल बंदी जाहीर केली होती. त्यानुसार ठाणे महापालिकेने ३१ मार्च रोजी नोटीस प्रसिद्ध करून ठाणेकरांना व व्यावसायिक, दुकानदारांना प्लास्टिक, थर्माकोलच्या वस्तूंचा वापर बंद करण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी एक महिन्याची मुदत देऊन त्यांची विल्हेवाट लावण्याची संधी दिली होती. त्याची मुदत संपल्यानंतर शहरामध्ये मोठयाप्रमाणात प्लास्टिक, थर्माकोलच्या वस्तूंची विक्री व वापर होत असल्याचे निदर्शनास आले. वास्तविक बंदी लागू केल्यानंतर मोठ्याप्रमाणातील या वस्तूंची विल्हेवाट कुठे लावायची यासंदर्भात व्यावसायिक, दुकानदारांमध्ये संभ्रम होता. त्यामुळे महापालिकेने ८२९१८३५८९३ हा व्हॉट्सअ‍ॅप क्र मांक उपलब्ध करून दिला आहे. या क्र मांकावर प्लास्टिक, थर्माकोलच्या वस्तूंची माहिती दिल्यास पालिकेची गाडी येऊन त्याचे संकलन करणार आहे. ही सुविधा मोफत असणार आहे.>दंडात्मक कारवाई होणारप्लास्टिक, थर्माकोलच्या वस्तूंचा वापर, खरेदी, विक्री किंवा साठवणूक करताना कोणी आढळल्यास संबधीतांवर बुधवारपासून दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. बंदी मोडल्यास पहिल्यांदा पाच हजार, त्यानंतर १० ते २० हजारांचा दंड आणि तीन वर्षांचा कारावास होणार आहे.>प्लॉस्टिक वापर टाळण्याचे आवाहनसर्वप्रकारच्या प्लास्टिक पिशव्या, थर्माकेल, प्लास्टिकपासून बनविण्यात येणाऱ्या व एकदाच वापरल्या जाणारे ताट, वाट्या, चमचे, भांडी, अन्नपदार्थ पॅकेजिंगची भांडी आदींचा वापर टाळावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.