शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

ठाकुर्लीच्या त्या २५० झाडांची कत्तल होणार!

By admin | Updated: August 27, 2015 00:07 IST

ठाकुर्लीतील मध्य रेल्वेच्या हद्दीतील २५० झाडांची कत्तल करण्यावर महापालिकेचे आयएएस आयुक्त ई. रवींद्रन यांनी बुधवारी शिक्कामोर्तब केले. दीड वर्षापासूनच्या या प्रलंबित

डोंबिवली : ठाकुर्लीतील मध्य रेल्वेच्या हद्दीतील २५० झाडांची कत्तल करण्यावर महापालिकेचे आयएएस आयुक्त ई. रवींद्रन यांनी बुधवारी शिक्कामोर्तब केले. दीड वर्षापासूनच्या या प्रलंबित विषयासह अन्य विषयांसंदर्भात महापालिकेत झालेल्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वनप्रेमी अशोक वैद्य आणि भाजपा गटनेते नगरसेवक श्रीकर चौधरी यांनी त्यास कडाडून विरोध केला, परंतु त्यास न जुमानता त्या दोघांचा विरोध, अशीच नोंद करत अन्य सदस्यांच्या मताने रवींद्रन यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले. आयुक्तांच्या या निर्णयाला चौधरी-वैद्य यांनी विरोध केला. पर्यावरणाचा ऱ्हास होत असतानाच अशी कत्तल होऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. तसेच केडीएमसीतील डोंबिवलीचा प्रदूषणात देशात १४ वा क्रमांक असून राज्यात दुसरा आहे. विविध कारणांमुळे हरित लवादानेही येथील कंपन्यांना कोट्यवधींची पेनल्टी सुनावली आहे. ते प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. असे असतानाच आणखी ऱ्हास होणारा हा निर्णय घाईने घेण्यात येऊ नये, असेही ते म्हणाले. एवढेच नव्हे तर सचिवांनी मतदान घ्यावे आणि त्यानंतरच याबाबतचा निर्णय घ्यावा, असा आग्रह चौधरींनी केला. परंतु, सचिव सुभाष भुजबळ यांनी निर्णय घेण्याअगोदरच एका सदस्याने त्यास मोडता घालत विरोध करून आयुक्तांना निर्णय घेण्यास भाग पाडल्याची टीकाही त्यांनी केली.(प्रतिनिधी) आयुक्तांचा जावईशोध..या वेळी माहिती देताना आयुक्त म्हणाले की, रेल्वेचा त्या ठिकाणी होणारा प्रकल्प हा राष्ट्रीय प्रकल्प आहे. तसेच तेथे जी झाडे आहेत, त्यापासून केवळ टिंबर मिळेल. उरला प्रश्न आॅक्सिजनचा, तर त्यातून केवळ २ टक्क्याहून कमी आॅक्सिजन मिळेल. खरा आॅक्सिजन हा सागरी परिसरातून मिळत असतो. असे स्पष्टीकरण देत त्यास मंजुरी दिल्याचे चौधरी म्हणाले. मात्र, समुद्रापासून मिळणारा आॅक्सिजन हे पहिल्यांदाच ऐकण्यात आले असून ज्ञानात भर पडल्याचे चौधरी म्हणाले. तसेच आयुक्तांच्या या माहितीबद्दल जावईशोध अशी खोचक टीकाही त्यांनी केली.