शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात एकहाती सत्तेचे स्वप्न सेना साकारणार?

By admin | Updated: June 20, 2016 02:01 IST

मागील काही वर्षात ठाण्याच्या बाबतीत शिवसेनेची रणनिती बदलू लागली असून निष्ठावतांना डावलणे, उपऱ्यांना पक्षात घेऊन त्यांना संधी देणे, मुस्लीम बहुल वस्तीसाठी वेगळी व्यूहरचना करणे

मागील काही वर्षात ठाण्याच्या बाबतीत शिवसेनेची रणनिती बदलू लागली असून निष्ठावतांना डावलणे, उपऱ्यांना पक्षात घेऊन त्यांना संधी देणे, मुस्लीम बहुल वस्तीसाठी वेगळी व्यूहरचना करणे, परप्रांतियांना संधी असा बदल २०१२ पासून झाला आहे. परंतु आता त्यांच्याच मित्रपक्षाने कुरघोडी करण्याचे ठरवल्याने, शिवसेना देखील एकहाती सत्ता प्रस्थापित करण्यासाठी, बेरजेच्या राजकारणाला महत्त्व देऊ लागली आहे. परंतु त्यात ती कितपत यशस्वी होणार आणि २०१७ मध्ये एकहाती सत्ता आणून सुर्वण महोत्सवी वर्षाची भेट ‘मातोश्री’ला देते का? याबाबतची उत्सुकता दिवसागणिक शिगेला पोहचत आहे. ठाण्यात सर्वप्रथम सत्ता मिळाल्याने ८० टक्के समाजकारणाची राजकारणाशी कशी सांगड घालावी हे या शहराने शिवसेनेला दाखवून दिले. नगरपालिकेच्या राजकारणातून ठाण्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांत शिरकाव केलेल्या शिवसेनेचा ठाणे जिल्ह्यात विस्तार म्हणा किंवा घोडदौड म्हणा सुरू झाली, ती ठाणे लोकसभेचा मतदारसंघ भाजपाकडून हिसकावून घेतल्यानंतर. राम कापसे यांच्या ताब्यात असलेला हा विस्तीर्ण मतदारसंघ शिवसनेने युतीच्या वाटाघाटीत पदरात पाडून घेतला आणि मतदारसंघाच्या विस्ताराइतकीच पक्षाची ताकदही विस्तारत नेली. अडीअडचणीला धावून येणारी, अ‍ॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून मदतीचा हात देणारी, प्रसंगी ‘अरे’ ला ‘कारे’ करणारी आणि महागाईच्या काळात स्वस्तात तेल-डाळी-साखर अशा वस्तू पुरवत आधी संघटना म्हणून आणि नंतर पक्ष म्हणून शिवसेना घराघरात पोचली. सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून यायचे आणि गरजेनुसार आपण उभे केलेले-आपल्याला पाठींबा दिलेले अपक्ष, छोटे पक्ष यांच्या मदतीने सत्ता टिकवायची ही शिवसेनेची शैली. ठाणे हे मुंबईला खेटून असले तरी तेथील राजकारणाचा प्रभाव शिवसेनेने येथील राजकारणावर पडू दिला नाही. सुरूवातीला जनसंघाशी संघर्ष असला तरी त्यांच्याशीही जुळवून घेतले. सत्ता मिळवणे, ती टिकवणे हे एकमेव उद्दीष्ट असल्याने मुंबईत दिली नसली, तरी येथे मनसेची टाळी घेतली गेली, कधी बसपाला जवळ केले गेले; तर कधी रिपब्लिकन पक्षांना. त्यामुळे सत्तेच्या वळचणीतून शिवसेना विस्तारत राहिली. शिवसेनेच्या विस्तारात सिंहाचा वाटा आनंद दिघे यांचा होता आणि त्यानंतर आताच्या काळात एकनाथ शिंदे यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांच्या काळात शिवसेना बहरली, फोफावली आणि भक्कम झाली. आक्रमक संघटन आणि अविरत समाजकारण ही शिवसेनेची बलस्थाने आहेत. पूर्ण बहुमत नसले तरी बेरजेचे राजकारण करत सत्ता कशी टिकवावी हे शिवसेनेचे कौशल्य असल्याचे गेल्या दोन दशकांत सतत दिसून आले. संघटना म्हणून एकजिनसीपणाने काम करणे हेही शिवसेनेचे आणखी एक वैशिष्ट्य.शिवसेना ठाण्यात फोफावली असली, सत्तेची दोरी तिच्या हाती असली तरी ठाणे शहराचा अपेक्षित विकास न झाल्याचा ठपका शिवसेनेवर ठेवला जातो. झपाट्याने होणाऱ्या नागरीकरणाच्या गरजा, लोकांच्या अपेक्षा समजून घेण्यात शिवसेना खूप कमी पडली. नागरीकरणातील उच्च मध्यमवर्ग, त्यावरील वर्गाचा विचार फारसा शिवसेनेकडून झालेला नाही. संघटनेकरिता राबणारा शिवसैनिक आणि सत्ता उपभोगणारे नगरसेवक यांच्यातील ठसठसणारे मतभेद वेळोवेळी समोर येतात. २०१२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा विचार केल्यास, या निवडणुकीत शिवसेनेची सत्तेची गणिते जुळविण्यासाठी ऐनवेळेस निष्ठावंतांना डावलून इतर पक्षातून आलेल्यांना संधी दिल्याने निष्ठावान शिवसैनिक नाराज झाला होता. या नाराज शिवसैनिकाने थेट लेखी स्वरुपात मातोश्रीला तक्रार देखील केली होती. परंतु फोडाफोडीचे राजकारण करुनही शिवसेनेला सत्तेची गणिते जुळविण्यासाठी मनसेच्या कुबड्या हाती घ्याव्या लागल्या होत्या. परंतु २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा मित्रपक्ष भाजपा भलताच फोफावल्याने त्याचा धसका सेनेने घेतला आहे. विशेष करून कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत एकहाती सत्ता खेचून आणण्याचे शिवसेनेचे दावे भाजपाने उधळून लावले. त्यामुळे आता शिवसेनेत चलबिचल सुरु झाली आहे. ठाण्यात जर अशी परिस्थिती ओढवली तर काय करायचे असा पेच त्यांच्या पुढे उभा ठाकला आहे.शिवसेनेला स्थापन होऊन आता ५० वर्षांचा काळ लोटला. शिवसेनेला सत्तेचा पहिला मान ठाणे शहराने दिला. त्यामुळे शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे वर्षानुवर्षांचे घट्ट समीकरण आहे. ठाणे महापालिका स्थापना झाल्यापासून आजपर्यंतचा इतिहास तपासला तर, ठाण्याने जरी शिवसेनेला सत्तेचा अधिकार बहाल केला असला तरी आजपर्यंत शिवसेनेला कधीही एकहाती हुकुमत ठाण्यावर गाजवता आलेली नाही. सत्तेकरिता शिवसेनेने राजकारणाचा टक्का वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ सत्ता कशी मिळविता येईल हेच उद्दीष्ट ठेवले असल्याने वेळप्रसंगी सत्तेसाठी टोकाची भूमिका घेण्याची तयारी शिवसेनेने सुरु केली आहे. शिवसेनेत निष्ठावंतांना वारंवार डावलले जात असले तरी देखील, तेही केवळ एका आदेशावर सर्व नाराजी गिळून पक्षाने उमेदवार म्हणून दगड जरी दिला असला तरी त्याला शेंदूर फासून देव बनवण्याकरिता सज्ज असतात, हे ‘मातोश्री’ने जाणले आहे. आता पुन्हा त्याच निष्ठावतांना आदेश देऊन कामाला लावण्याची तयारी सुरु झाली आहे. त्यातही शिवसेनेत गटतटाचे राजकारण असेल तरी निवडणुकीच्या वेळेस एकत्र येऊन जोमाने काम करवून घेण्याचे कसब ठाण्यातील शिवसेना नेतृत्वाच्या अंगी आहे. मित्रपक्ष भाजपाचे आक्रमण परतावून लावत ठाण्यातील शिवसेना सुवर्ण महोत्सवी वर्षात तरी, एकहाती सत्ता स्थापन करण्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वप्न होणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.