शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

स्वच्छता पंधरवड्याकडे एनजीओंची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 02:47 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर असा स्वच्छता पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय घेतला.

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर असा स्वच्छता पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, देशभर पंधरवडा सुरू झाला आहे. अशा कार्यक्र मांत नेहमीच पुढाकार घेणाऱ्या सामाजिक संस्थांपैकी एकही संस्था (एनजीओ) या पंधरवड्यास पाच दिवस उलटले, तरी अद्यापही ठाणे रेल्वेस्थानकात सहभागी झालेली नाही. एनजीओ सोडाच स्थानिक खासदारांसह भाजपाच्या स्थानिक पदाधिकाºयांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. यामुळे अजून आठ ते दहा दिवस हे अभियान सुरू राहणार असल्याने आता तरी ठाण्यातील सामाजिक संस्थांनी या उपक्र मात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रवासी संघटनांसह रेल्वे प्रशासनाने केले आहे.पंतप्रधान मोदी यांनी स्वच्छरेल्वे, स्वच्छ भारत असा नारादेऊन स्वच्छता पंधरवडा आयोजिला आहे. त्यानुसार, इतर रेल्वेस्थानकांप्रमाणे ठाणे रेल्वेस्थानकातही या अभियानास सुरुवात झाली आहे. सामाजिक संस्था पुढे येत नसल्याने रेल्वे कर्मचाºयांमार्फत रेल्वेस्थानक स्वच्छ ठेवण्याचा शक्य तितका प्रयत्न केला जात आहे. तसेच प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेस्थानक परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मध्यंतरी, अस्वच्छतेच्या टॉप टेन यादीत ठाण्याचे नाव आल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून स्वच्छतेवर विशेष भर दिला जात आहे. वेळप्रसंगी अस्वच्छता ठेवणाºया प्रवाशांवर कारवाईचा बडगाही उगारला जात आहे.एरव्ही, शासनामार्फतएखादे अभियान राबवत येते, तेव्हा सामाजिक संस्था त्या अभियानात सहभागी होतात आणि ते अभियान यशस्वीरीत्या मार्गी लावण्यात हातभार लावतात. मात्र, ठाण्यात सध्या सुरू असलेल्या पंतप्रधान मोदींच्या स्वच्छता अभियानात हे चित्र उलटे दिसत आहे.>एका संस्थेकडून विचारणाएका संस्थेने सुरुवातीला विचारणा केली होती. मात्र, त्यानंतर तिनेही चक्क पाठ फिरवल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. दुसरीकडे काही राजकीय पक्ष ठाण्यातील या संस्थांना या अभियानापासून लांब राहण्याबाबत समर्थन करत तर नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.