शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

कोरोनाकाळात तृतीयपंथी दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 01:27 IST

मंत्रालयात आंदोलनाचा इशारा : कोणतीही मदत न मिळाल्याने उपासमार

प्रज्ञा म्हात्रे ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोनाकाळात सर्वसामान्यांचे हाल झाले असताना दुसरीकडे तृतीयपंथी समाजही दुर्लक्षित राहिला आहे. तृतीयपंथींकडे रेशनकार्ड नसल्याने त्यांना अन्नधान्यही मिळू शकले नाही. लॉकडाऊनमुळे मंगती आणि बधाई बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. एवढे हाल होत असताना, राज्याचे मुख्यमंत्री आहेत तरी कुठे, असा प्रश्न तृतीयपंथी समाजाच्या कार्यकर्त्या माधुरी सरोदे शर्मा यांनी केला. असेच दुर्लक्षित राहिल्यास मंत्रालयात आंदोलन करण्याचा इशारा या समाजाने दिला.लॉकडाऊन जाहीर करताना केवळ सामान्य लोकांचा विचार केला. आज दुकाने, ट्रेन बंद असल्याने तृतीयपंथींची मंगती बंद झाली, लग्नसोहळ्यात ५0 माणसांच्या उपस्थितीला परवानगी असल्याने त्यांची बधाई बंद झाली. मग या समाजाने जायचे तरी कुठे? केंद्र सरकारला आमच्या समस्यांचे पत्र लिहिले तेव्हा मे महिन्यात सीएसआर फंडातून प्रत्येकी दीड हजार रुपये देण्याचे मंजूर झाले. भारतातील एकूण तृतीयपंथी समाजाच्या लोकसंख्येपैकी केवळ सात ते आठ हजार तृतीयपंथीना ही मदत पोहोचली. बँक खाते नसणे, आॅनलाइन व्यवहार न जमणे किंवा ही योजना त्यांच्यापर्यंत न पोहोचणे अशा विविध कारणांमुळे कितीतरी तृतीयपंथींपर्यंत मदत पोहोचलेली नाही, अशी नाराजी माधुरी यांनी व्यक्त केली.रेशनकार्ड नसल्याने आम्हाला रेशन मिळू शकत नाही. आमच्या समाजातील लोक हे सर्वसामान्यांच्या वस्त्यांपासून कितीतरी दूर राहतात त्यांना मदत पोहोचविणार कोण? आधीच आमच्या समाजाबद्दल किळस आणि भीती असल्याने कितीतरी तृतीयपंथी उपाशी राहून दिवस काढत आहेत, असे या समाजाच्या श्रीदेवी यांनी सांगितले.तृतीयपंथी हे भाडेतत्त्वावर राहत आहे, त्यांच्याकडे पैसे नसल्याने भाडे, वीजबिल भरू शकत नाहीत. लोकप्रतिनिधीही फिरकले नाहीत. सुदैवाने आमच्या समाजात कोरोना पसरला नाही. उद्या पसरला तर आमच्यासाठी सरकारच्या कोणत्याही उपयोजना नाहीत.आधीच समाजातून हीन वागणूक मिळते. त्यात कोरोनाग्रस्त झाल्यावर तृतीयपंथींना कशी वागणूक मिळेल? परराज्यातून स्थलांतरित झालेल्या लोकांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्याची व्यवस्था सरकारने केली. आमचा समाजदेखील स्थलांतरित आहे.आम्हाला कुटुंबाने हाकलून दिले आहे. आज उपासमारीची वेळ आल्याने आम्ही जायचे कुठे असा संतप्त सवाल तृतीयपंथींनी व्यक्त केला.आधीच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भेट दिली नाही. आताचे मुख्यमंत्रीही आमच्या समस्या जाणून घेत नाहीत. पंतप्रधान आवास योजनेतून आम्हाला घरे हवी आहेत. आम्हाला रोजगारही हवा आहे. लॉकडाऊनमध्ये सरकारने कल्याणकारी तृतीयपंथी मंडळाची स्थापना केली आहे. ते मंडळ अजून कार्यरत नाही, अशी खंत माधुरी यांनी व्यक्त केली.