शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मित्रपक्षाची ताकद वाढण्याचे टेन्शन

By admin | Updated: October 12, 2015 04:37 IST

२०१५ च्या केडीएमसी निवडणुकीत १५ हून अधिक वर्षे युतीत असलेला मित्रपक्ष भाजपाची ताकद वाढणार असल्याने शिवसेनेवरील दबाव वाढला आहे

अनिकेत घमंडी, डोंबिवली२०१५ च्या केडीएमसी निवडणुकीत १५ हून अधिक वर्षे युतीत असलेला मित्रपक्ष भाजपाची ताकद वाढणार असल्याने शिवसेनेवरील दबाव वाढला आहे. एकंदरीत वस्तुस्थिती बघता शिवसेना तुलनेने अधिक जागा मिळवण्याची शक्यता असली तरीही एवढी वर्षे भाजपाला नाममात्र ठेवण्यात आणि सत्तेतील टेकूची व्हॅल्यू असलेल्या मित्रपक्षाला जास्तीच्या जागा मिळाल्या तर... या चिंतेने शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची झोप उडाली आहे. त्यामुळेच ते नेते कल्याण-डोंबिवलीत तळ ठोकून आहेत.भाजपाच्या म्हणण्यानुसार त्यांना साधारणत: ४०-४५ जागांवर यश मिळणे अपेक्षित आहे. प्रत्यक्ष वस्तुस्थितीचा आढावा घेतल्यास एवढे यश मिळणार नसले तरीही तिशीच्या घरात त्यांना जागा मिळतील, असा अंदाज शिवसेनेनेही वर्तवला आहे. मात्र, ऐवीतेवी दहाच्या आत असलेला मित्रपक्ष वाढणार असल्याने त्याचा प्रभाव कसा कमी करता येईल, याची चिंता त्या पक्षाच्या नेत्यांना आहे. त्या दृष्टीने आता पुढील व्यूहरचना रचण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. भाजपानेही सावध पवित्रा घेऊन जागा वाढतील, असे सांगून नेमक्या किती याचा अंदाज आताच सांगता येत नसल्याचे स्पष्ट केले. शिवसेना नेत्यांच्या सांगण्यानुसार त्यांना डोंबिवलीत फटका बसणार असून कल्याणमध्ये ते एक नंबरवर असतील, असा दावा त्यांनी केला. कल्याण पूर्वसह पश्चिमेतील अवघ्या काही जागा सोडल्या तर तेथे भगवाच दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळेच त्यांचे नेतेही महापौर शिवसेनेचाच असेल, असे ठामपणे सांगत आहेत. तो कसा बसवावा, याच्या आकडेवारीची जुळवाजुळव सुरू असून पूर्ण बहुमत न मिळाल्यास कोणाची मदत घ्यावी, या दिशेने त्यांचे विचारचक्र सुरू आहे. ग्रामीणमध्येही त्यांना जागा मिळतील, असा विश्वास असल्याने तेथील इच्छुकांशीही ठाण्याच्या नेत्यांनी डोंबिवलीच्या मध्यवर्ती कार्यालयात पहाटे साडेचारपर्यंत हितगुज केले. त्यातही संघर्ष समितीची वाटचाल, त्यांची ताकद, त्यांना मिळालेला पाठिंबा आदींबाबतची चाचपणी करण्यात आली. तसेच तेथून शिवसेनेच्या वतीने उमेदवारी हवी असलेल्यांशी चर्चा करण्यात आली. अशा सर्व स्थितीत भाजपासोबत युती झाली नाही, तर मात्र पक्षाची पकड कशी असेल, या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत. तसेच सत्तेचा वापर करून भाजपा दबावतंत्र वापरत असल्याची उघड टीकाही आता त्या नेत्यांनी सुरू केली आहे.