शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
4
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
5
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
6
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
7
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
8
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
9
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
10
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
11
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
12
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
13
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
14
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
15
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
16
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
17
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
18
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
19
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
20
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे

मित्रपक्षाची ताकद वाढण्याचे टेन्शन

By admin | Updated: October 12, 2015 04:37 IST

२०१५ च्या केडीएमसी निवडणुकीत १५ हून अधिक वर्षे युतीत असलेला मित्रपक्ष भाजपाची ताकद वाढणार असल्याने शिवसेनेवरील दबाव वाढला आहे

अनिकेत घमंडी, डोंबिवली२०१५ च्या केडीएमसी निवडणुकीत १५ हून अधिक वर्षे युतीत असलेला मित्रपक्ष भाजपाची ताकद वाढणार असल्याने शिवसेनेवरील दबाव वाढला आहे. एकंदरीत वस्तुस्थिती बघता शिवसेना तुलनेने अधिक जागा मिळवण्याची शक्यता असली तरीही एवढी वर्षे भाजपाला नाममात्र ठेवण्यात आणि सत्तेतील टेकूची व्हॅल्यू असलेल्या मित्रपक्षाला जास्तीच्या जागा मिळाल्या तर... या चिंतेने शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची झोप उडाली आहे. त्यामुळेच ते नेते कल्याण-डोंबिवलीत तळ ठोकून आहेत.भाजपाच्या म्हणण्यानुसार त्यांना साधारणत: ४०-४५ जागांवर यश मिळणे अपेक्षित आहे. प्रत्यक्ष वस्तुस्थितीचा आढावा घेतल्यास एवढे यश मिळणार नसले तरीही तिशीच्या घरात त्यांना जागा मिळतील, असा अंदाज शिवसेनेनेही वर्तवला आहे. मात्र, ऐवीतेवी दहाच्या आत असलेला मित्रपक्ष वाढणार असल्याने त्याचा प्रभाव कसा कमी करता येईल, याची चिंता त्या पक्षाच्या नेत्यांना आहे. त्या दृष्टीने आता पुढील व्यूहरचना रचण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. भाजपानेही सावध पवित्रा घेऊन जागा वाढतील, असे सांगून नेमक्या किती याचा अंदाज आताच सांगता येत नसल्याचे स्पष्ट केले. शिवसेना नेत्यांच्या सांगण्यानुसार त्यांना डोंबिवलीत फटका बसणार असून कल्याणमध्ये ते एक नंबरवर असतील, असा दावा त्यांनी केला. कल्याण पूर्वसह पश्चिमेतील अवघ्या काही जागा सोडल्या तर तेथे भगवाच दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळेच त्यांचे नेतेही महापौर शिवसेनेचाच असेल, असे ठामपणे सांगत आहेत. तो कसा बसवावा, याच्या आकडेवारीची जुळवाजुळव सुरू असून पूर्ण बहुमत न मिळाल्यास कोणाची मदत घ्यावी, या दिशेने त्यांचे विचारचक्र सुरू आहे. ग्रामीणमध्येही त्यांना जागा मिळतील, असा विश्वास असल्याने तेथील इच्छुकांशीही ठाण्याच्या नेत्यांनी डोंबिवलीच्या मध्यवर्ती कार्यालयात पहाटे साडेचारपर्यंत हितगुज केले. त्यातही संघर्ष समितीची वाटचाल, त्यांची ताकद, त्यांना मिळालेला पाठिंबा आदींबाबतची चाचपणी करण्यात आली. तसेच तेथून शिवसेनेच्या वतीने उमेदवारी हवी असलेल्यांशी चर्चा करण्यात आली. अशा सर्व स्थितीत भाजपासोबत युती झाली नाही, तर मात्र पक्षाची पकड कशी असेल, या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत. तसेच सत्तेचा वापर करून भाजपा दबावतंत्र वापरत असल्याची उघड टीकाही आता त्या नेत्यांनी सुरू केली आहे.