शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

टेन्शन अन् नाराजी, सायंकाळपर्यंत न पाहता आलेल्या निकालाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे २०२१ चा दहावीचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. परंतु, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे २०२१ चा दहावीचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. परंतु, अवघ्या अर्ध्या-पाऊण तासातच निकालाची वेबसाईट तांत्रिक कारणाने क्रश झाली. ती अगदी सायंकाळपर्यंत सुरू न झाल्याने विद्यार्थी, पालक आणि शाळांमध्ये अतिशय निरुत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

परीक्षा देऊन लागलेल्या निकालाचा आनंद घ्यायला यंदाच्या वर्षीचे विद्यार्थी तर मुकलेच, पण मूल्यांकनाच्या आधारे लागलेला निकाल पाहण्याच्या आनंदावरही शुक्रवारी विरजण पडले. अनेक शाळांमध्येही शिक्षक सायंकाळी उशिरापर्यंत वेबसाईट सुरू होण्याची वाट पाहत होते. मात्र, ती सुरू न झाल्याने अनेक शिक्षक, मुख्याध्यापकही नाराजीचा सूर उमटवत घऱी परतले.

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे २०२१ चा दहावीचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी दुपारी दीड वाजता जाहीर झाला. कोरोनामुळे यंदा पहिल्यांदाच परीक्षा न होता अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार केला आहे. त्यामुळे परीक्षा न देताही विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता होतीच. शुक्रवारी निकाल लागल्यावर तासाभराच्या आधीच वेबसाईट क्रश झाली आणि विद्यार्थ्यांची चिंता अधिकच वाढली. घरोघरी, मोबाईलवर, तर ठाण्यातील अनेक शाळांत विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक मुलांचा निकाल बघण्यासाठी सकाळपासून हजर होते. दुपारनंतर अनेक प्रयत्न करूनही ती साईट काही सुरू झाली नाही. ठाणे जिल्ह्याचा निकाल चांगला लागलेला असल्याने नापास होणाऱ्यांचे प्रमाण कमी असणार हे खरे असले तरी, आपले गुण बघण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी उत्सुक होता. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत ही वेबसाईट सुरूच न झाल्याने कंटाळून शाळेतील शिक्षक, विद्यार्थी निरुत्साही होऊन घरी परतले.

----------------

आमच्यामागे कसले ग्रहण लागले कळतच नाही. कोरोनामुळे आधी शाळा नाही, मग परीक्षा नाही आणि आता जो निकाल लागला, तोही पाहायला मिळत नाही. निकालाची उत्सुकता संपत आलीय, असे मत काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

------------

जिल्ह्यात मीरा-भाईंदर मनपा क्षेत्र अव्वल

ठाणे जिल्ह्यातील १ लाख २४ हजार ९१ विद्यार्थी प्रवीष्ट झाले होते, त्यापैकी १ लाख २३ हजार २०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. ठाणे जिल्ह्यात मीरा-भाईंदर मनपा क्षेत्राचा निकाल सर्वाधिक ९९.७१ टक्के लागला आहे. त्याखालोखाल अंबरनाथचा निकाल ९९.६३ टक्के, ठाणे महानगरपालिका क्षेत्राचा निकाल ९९.६० टक्के, शहापूरचा ९९.४७ टक्के, नवी मुंबईचा निकाल ९९.४२ टक्के, मुरबाडचा ९९.३४ टक्के, कल्याण-डोंबिवलीचा ९९.२७ टक्के, भिवंडीचा ९९.२६ टक्के, उल्हासनगर मनपाचा ९९.२१ टक्के, कल्याण ग्रामीण तालुक्याचा ९९.१५ टक्के, तर सर्वात कमी भिवंडी मनपा क्षेत्राचा निकाल ९७.६१ टक्के इतका लागला आहे.