शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
2
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
3
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
4
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
5
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
7
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
8
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
9
भयंकर! भाजपा नेत्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला, काटा काढला, नंतर स्वत:वरच केला हल्ला, अखेर...
10
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
11
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
12
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
13
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
14
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
15
Festival: तिथीवरून वर्षभराचे सण आणि महिने कसे लक्षात ठेवायचे ते शिका आणि मुलांनाही शिकवा!
16
पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!
17
असित मोदींनी 'दयाबेन'सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण, दिशा वकानीबद्दल म्हणाले...
18
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
19
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
20
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी

टेन्शन अन् नाराजी, सायंकाळपर्यंत न पाहता आलेल्या निकालाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे २०२१ चा दहावीचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. परंतु, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे २०२१ चा दहावीचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. परंतु, अवघ्या अर्ध्या-पाऊण तासातच निकालाची वेबसाईट तांत्रिक कारणाने क्रश झाली. ती अगदी सायंकाळपर्यंत सुरू न झाल्याने विद्यार्थी, पालक आणि शाळांमध्ये अतिशय निरुत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

परीक्षा देऊन लागलेल्या निकालाचा आनंद घ्यायला यंदाच्या वर्षीचे विद्यार्थी तर मुकलेच, पण मूल्यांकनाच्या आधारे लागलेला निकाल पाहण्याच्या आनंदावरही शुक्रवारी विरजण पडले. अनेक शाळांमध्येही शिक्षक सायंकाळी उशिरापर्यंत वेबसाईट सुरू होण्याची वाट पाहत होते. मात्र, ती सुरू न झाल्याने अनेक शिक्षक, मुख्याध्यापकही नाराजीचा सूर उमटवत घऱी परतले.

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे २०२१ चा दहावीचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी दुपारी दीड वाजता जाहीर झाला. कोरोनामुळे यंदा पहिल्यांदाच परीक्षा न होता अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार केला आहे. त्यामुळे परीक्षा न देताही विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता होतीच. शुक्रवारी निकाल लागल्यावर तासाभराच्या आधीच वेबसाईट क्रश झाली आणि विद्यार्थ्यांची चिंता अधिकच वाढली. घरोघरी, मोबाईलवर, तर ठाण्यातील अनेक शाळांत विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक मुलांचा निकाल बघण्यासाठी सकाळपासून हजर होते. दुपारनंतर अनेक प्रयत्न करूनही ती साईट काही सुरू झाली नाही. ठाणे जिल्ह्याचा निकाल चांगला लागलेला असल्याने नापास होणाऱ्यांचे प्रमाण कमी असणार हे खरे असले तरी, आपले गुण बघण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी उत्सुक होता. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत ही वेबसाईट सुरूच न झाल्याने कंटाळून शाळेतील शिक्षक, विद्यार्थी निरुत्साही होऊन घरी परतले.

----------------

आमच्यामागे कसले ग्रहण लागले कळतच नाही. कोरोनामुळे आधी शाळा नाही, मग परीक्षा नाही आणि आता जो निकाल लागला, तोही पाहायला मिळत नाही. निकालाची उत्सुकता संपत आलीय, असे मत काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

------------

जिल्ह्यात मीरा-भाईंदर मनपा क्षेत्र अव्वल

ठाणे जिल्ह्यातील १ लाख २४ हजार ९१ विद्यार्थी प्रवीष्ट झाले होते, त्यापैकी १ लाख २३ हजार २०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. ठाणे जिल्ह्यात मीरा-भाईंदर मनपा क्षेत्राचा निकाल सर्वाधिक ९९.७१ टक्के लागला आहे. त्याखालोखाल अंबरनाथचा निकाल ९९.६३ टक्के, ठाणे महानगरपालिका क्षेत्राचा निकाल ९९.६० टक्के, शहापूरचा ९९.४७ टक्के, नवी मुंबईचा निकाल ९९.४२ टक्के, मुरबाडचा ९९.३४ टक्के, कल्याण-डोंबिवलीचा ९९.२७ टक्के, भिवंडीचा ९९.२६ टक्के, उल्हासनगर मनपाचा ९९.२१ टक्के, कल्याण ग्रामीण तालुक्याचा ९९.१५ टक्के, तर सर्वात कमी भिवंडी मनपा क्षेत्राचा निकाल ९७.६१ टक्के इतका लागला आहे.