शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

उल्हासनगरात टेंडर घोटाळ्याला नेत्यांकडून बगल; आरोपकर्ते व पक्ष नेत्यांचे जय श्रीराम उत्तर?

By सदानंद नाईक | Updated: January 30, 2024 15:30 IST

उल्हासनगर महापालिका हद्दीत हजारो कोटीच्या निधीतून विविध विकास कामे सुरू आहेत.

उल्हासनगर : महापालिका टेंडर घोटाळ्यावरून भाजप व शिवसेना शिंदे गटाचे नेते आमने-सामने आल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र एका आठवड्यानंतर आरोप-प्रत्यारोपकर्ते स्थानिक नेते व बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण व खासदार श्रीकांत शिंदे यांना घोटाळ्या बाबत प्रश्न करताच, त्यांनी जय श्रीरामची घोषणा देऊन घोटाळ्याच्या प्रश्नाला बगल दिली आहे. 

उल्हासनगर महापालिका हद्दीत हजारो कोटीच्या निधीतून विविध विकास कामे सुरू आहेत. विकास कामातील टेंडर घोटाळ्यावरून भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी व आमदार कुमार आयलानी यांनी एका आठवड्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन १०० कोटीचा टेंडर घोटाळा झाल्याचा आरोप केला. एका ठेकेदाराला कामे मिळवून देण्याचे काम शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख अरुण अशान करीत असून बोगस कागदपत्र सादर करणाऱ्या या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली. तसेच रामचंदानी व आमदार आयलानी यांनी पत्रकार परिषदेच्या दुसऱ्या दिवशी महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी भेट घेऊन वादग्रस्त कंपनीची चौकशी करून काळ्या यादीत टाकण्याचे निवेदन दिले. तसेच भाजपच्या तब्बल २२ माजी नगरसेवकांनी आयुक्तांना लेखी पत्र देऊन ठेकेदारांला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. 

शहर स्थानिक शिवसेना शिंदे गट नेते व भाजप नेते यांच्यात टेंडर घोटाळ्यावरून आरोप -प्रत्यारोप सुरू होते. दरम्यान गोलमैदान येथे रामजन्मभूमी मंदिराची प्रतिकृती मंदिर भाजपने उभे केले असून याठिकाणी १ फेब्रुवारी पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. या मंदिराच्या दर्शनासाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे व भाजपचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण येऊन गेले. यावेळी खासदार शिंदे व चव्हाण यांना टेंडर घोटाळ्यावरून छेडले असता, त्यांनी जय श्रीरामची घोषणा देऊन बगल दिली. तसेच पत्रकार परिषद घेऊन खळबळ उडून देणारे भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदिप रामचंदानी यांनाही टेंडर घोटाळ्याच्या चौकशी प्रगती बाबत विचारले असता, त्यांनीही पत्रकारांना जय श्रीराम घोषणा देऊन मूळ प्रश्नाला बगल दिली. तीच परिस्थिती शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख अरुण अशान व संबंधित ठेकेदारांची आहे. 

 टेंडरवारचा आरोप-प्रत्यारोप करणाऱ्यात समझोता? महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी भाजप व शिंदे गटाच्या मागणीनुसार टेंडरवारची चौकशी केल्यास, मोठे माशे फसण्याची शक्यता व्यक्त होत होती. अखेर आपले कारनामे चव्हाट्यावर येवू नये म्हणून आरोप-प्रत्यारोप करणाऱ्यानी समझोता।केल्याचे।बोलले जात आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर