शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

उल्हासनगरात टेंडर घोटाळ्याला नेत्यांकडून बगल; आरोपकर्ते व पक्ष नेत्यांचे जय श्रीराम उत्तर?

By सदानंद नाईक | Updated: January 30, 2024 15:30 IST

उल्हासनगर महापालिका हद्दीत हजारो कोटीच्या निधीतून विविध विकास कामे सुरू आहेत.

उल्हासनगर : महापालिका टेंडर घोटाळ्यावरून भाजप व शिवसेना शिंदे गटाचे नेते आमने-सामने आल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र एका आठवड्यानंतर आरोप-प्रत्यारोपकर्ते स्थानिक नेते व बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण व खासदार श्रीकांत शिंदे यांना घोटाळ्या बाबत प्रश्न करताच, त्यांनी जय श्रीरामची घोषणा देऊन घोटाळ्याच्या प्रश्नाला बगल दिली आहे. 

उल्हासनगर महापालिका हद्दीत हजारो कोटीच्या निधीतून विविध विकास कामे सुरू आहेत. विकास कामातील टेंडर घोटाळ्यावरून भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी व आमदार कुमार आयलानी यांनी एका आठवड्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन १०० कोटीचा टेंडर घोटाळा झाल्याचा आरोप केला. एका ठेकेदाराला कामे मिळवून देण्याचे काम शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख अरुण अशान करीत असून बोगस कागदपत्र सादर करणाऱ्या या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली. तसेच रामचंदानी व आमदार आयलानी यांनी पत्रकार परिषदेच्या दुसऱ्या दिवशी महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी भेट घेऊन वादग्रस्त कंपनीची चौकशी करून काळ्या यादीत टाकण्याचे निवेदन दिले. तसेच भाजपच्या तब्बल २२ माजी नगरसेवकांनी आयुक्तांना लेखी पत्र देऊन ठेकेदारांला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. 

शहर स्थानिक शिवसेना शिंदे गट नेते व भाजप नेते यांच्यात टेंडर घोटाळ्यावरून आरोप -प्रत्यारोप सुरू होते. दरम्यान गोलमैदान येथे रामजन्मभूमी मंदिराची प्रतिकृती मंदिर भाजपने उभे केले असून याठिकाणी १ फेब्रुवारी पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. या मंदिराच्या दर्शनासाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे व भाजपचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण येऊन गेले. यावेळी खासदार शिंदे व चव्हाण यांना टेंडर घोटाळ्यावरून छेडले असता, त्यांनी जय श्रीरामची घोषणा देऊन बगल दिली. तसेच पत्रकार परिषद घेऊन खळबळ उडून देणारे भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदिप रामचंदानी यांनाही टेंडर घोटाळ्याच्या चौकशी प्रगती बाबत विचारले असता, त्यांनीही पत्रकारांना जय श्रीराम घोषणा देऊन मूळ प्रश्नाला बगल दिली. तीच परिस्थिती शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख अरुण अशान व संबंधित ठेकेदारांची आहे. 

 टेंडरवारचा आरोप-प्रत्यारोप करणाऱ्यात समझोता? महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी भाजप व शिंदे गटाच्या मागणीनुसार टेंडरवारची चौकशी केल्यास, मोठे माशे फसण्याची शक्यता व्यक्त होत होती. अखेर आपले कारनामे चव्हाट्यावर येवू नये म्हणून आरोप-प्रत्यारोप करणाऱ्यानी समझोता।केल्याचे।बोलले जात आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर