शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

तात्पुरती ‘मलमपट्टी’ ठरतेय कुचकामी, डोंबिवलीतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 05:35 IST

गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्ते खड्डेमुक्त करा, असे आदेश केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांनी दिले आहेत. त्यामुळे महापालिकेतील अधिकारी खड्डे बुजवण्याच्या कामाला लागल्याचे चित्र शहरात दिसत आहे. परंतु, पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमध्येच डांबराचा भराव टाकून ते बुजवण्याचा प्रताप त्यांच्याकडून सुरू आहे.

- प्रशांत माने डोंबिवली : गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्ते खड्डेमुक्त करा, असे आदेश केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांनी दिले आहेत. त्यामुळे महापालिकेतील अधिकारी खड्डे बुजवण्याच्या कामाला लागल्याचे चित्र शहरात दिसत आहे. परंतु, पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमध्येच डांबराचा भराव टाकून ते बुजवण्याचा प्रताप त्यांच्याकडून सुरू आहे. त्यामुळे ही तात्पुरती डागडुजी एक प्रकारे थुंकपट्टी ठरत आहे.गणेशोत्सवापूर्वी खड्ड्यांमध्ये चरी भरा तसेच खड्डे बुजवलेल्या रस्त्यांची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर द्या, अशा सूचना वेलरासू यांनी अधिकाºयांना दिल्या होत्या. पावसापूर्वी, ऐन पावसात आणि पावसाळ्यानंतर खड्डे बुजवण्याची तसेच रस्ता दुरुस्तीची कामे केली जातात. यंदाच्या अंदाजपत्रकात खड्डे बुजवण्यासाठी १२ कोटी २५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. ११ कंत्राटदारांवर ही कामे सोपवली आहेत.पावसामुळे सध्या डांबरी रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेत या खड्डेमय परिस्थितीचे पडसाद उमटले होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केले जाणारे नियोजन हे ठोस कृतीअभावी कागदावरच राहत असल्याचा आरोप सर्व पक्षांच्या सदस्यांनी या वेळी केला. त्यावर गणेश विसर्जन मार्गावरील प्रमुख रस्त्यांना विशेष प्राधान्य दिले जाईल आणि तेथील खड्डे बुजवले जातील, अशी ग्वाही प्रशासनाने दिली होती.मात्र, आयुक्त आणि स्थायी समितीने दिलेल्या निर्देशानुसार खड्डे बुजवण्यास प्रारंभ झाला असला, तरी काम करण्याची पद्धत पाहता गणेशोत्सवाच्या धर्तीवर केली जाणारी डागडुजी दिखावा ठरत आहे.पाणी आणि डांबर हे परस्परविरोधी घटक मानले जातात. पाण्यात डांबर टिकाव धरत नाही. असे असले तरी पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमध्ये डांबराचा भराव टाकून ते बुजवले जात असल्याचे चित्र डोंबिवली शहरातीले टिळक चौक ते घरडा सर्कलदरम्यान पाथर्ली नाका येथे गुरुवारी पाहावयास मिळाले. खड्ड्यांमध्ये डांबराचा भराव टाकला जात असताना त्यावर योग्य प्रकारे रोलर फिरवला जात नसल्याने ओबडधोबड आकाराचे निर्माण होणारे ‘पॅच’ आणखी त्रासदायक ठरत आहेत. त्यात खड्ड्यांतील पाण्यावर डांबराचा शिडकावा केला गेल्याने अल्पावधीतच ते डांबर पुन्हा उखडले जाऊन पुन्हा खड्डेमय स्थिती उद्भवत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.मागील आठवड्यातच शहरातील काही ठिकाणी खड्डे बुजवण्याची कामे झाली होती. परंतु, काही दिवसांतच पुन्हा खड्डे निर्माण झाल्याने यातून निकृष्ट कामांचा नमूनाही पुढे आला आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे....तर समज देणारयासंदर्भात केडीएमसीतील बांधकाम विभागाचे डोंबिवलीतील कार्यकारी अभियंता सुभाष पाटील म्हणाले, गणेशोत्सवाच्या धर्तीवर तसेच वाहतूक पोलिसांच्या मागणीनुसार सध्या खड्डे बुजवण्याची कामे सुरू आहेत.पाणी भरलेल्या खड्ड्यांमध्ये डांबराचा भराव टाकून बुजवण्याचा प्रकार होत असेल, तर संबंधित कंत्राटदाराला समज देण्यात येईल.दरम्यान, काम सुरू असतानाच पाऊस आल्याचे स्पष्टीकरण संबंधित कंत्राटदाराने दिल्याचे पाटील यांनी पुढे सांगितले.