शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

टेंभी नाका, काजूवाडीला २२० आझादनगर, गांधीनगरला केवळ ३० डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:40 IST

ठाणे : ठाणे शहरातील टेंभी नाका, काजूवाडी, शीळ येथील केंद्रांवर तब्बल २२० तर आझादनगर, गांधीनगर, माजिवडा, मानपाडा, बाळकूम केंद्रांवर ...

ठाणे : ठाणे शहरातील टेंभी नाका, काजूवाडी, शीळ येथील केंद्रांवर तब्बल २२० तर आझादनगर, गांधीनगर, माजिवडा, मानपाडा, बाळकूम केंद्रांवर प्रत्येकी ३० डोस दिले आहेत. या प्रकारावरून महापालिकेकडून लसीकरणात दुजाभाव केला जात आहे, असा आरोप भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केला आहे. त्याचबरोबर वाढत्या उन्हामुळे सकाळी ९ वाजता लसीकरण सुरू करण्याची मागणीही त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

शहराच्या विविध भागांतून कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसची नागरिकांकडून मागणी केली जात आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेने बुधवारी २५ केंद्रांवर ती उपलब्ध केली आहे. मात्र, त्यात केंद्रांनुसार दुजाभाव केला आहे.

आपत्तीच्या काळात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा लसपुरवठा करण्याचा निर्णय चुकीचा आहे. त्याऐवजी ठाण्यातील सर्व भागातील नागरिकांना समान न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. सध्या मे महिन्यामुळे कडक उन्हाचे चटके बसत आहेत. अशा परिस्थितीत सर्वच लसीकरण केंद्रांची वेळ दुपारी १२ ते दुपारी ४ पर्यंत ठेवली आहे. त्यातच ज्येष्ठ नागरिकांकडून पहाटे चारपासून रांग लावली जाते. बहुसंख्य वेळा उपलब्ध लसींपेक्षा नागरिकांची संख्या जास्त असल्यामुळे नागरिकांना दुपारी १२ नंतर लस न घेताच परतावे लागते. कोरोना आपत्तीच्या काळात लसीकरण केंद्रांवर गर्दी होत असल्यामुळे संसर्गाचाही धोका उद्भवतो. या पार्श्वभूमीवर दुपारी बाराऐवजी सकाळी ९ वाजता लसीकरण सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

शिवसेनेचा पदाधिकारीच टोकन वाटपात आघाडीवर

महापौर नरेश म्हस्के, आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी टोकन व व्हीआयपी पद्धत बंद केली असल्याचे जाहीर केले असले, तरी शिवसेनेचा एक पदाधिकारीच लसीकरणाचे टोकन वाटपात आघाडीवर आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. या पदाधिकाऱ्याने बिनधास्तपणे ऑफलाइन सेंटरवरील टोकन वाटप सुरू केले आहे. त्याला रोखण्यास शिवसेना हतबल आहे का, असा सवाल त्यांनी केला आहे.