शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

पैसे खाऊन पाणी, वीज देणाऱ्यांवर काय कारवाई करणार ते सांगा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 00:12 IST

आम्ही खरेदी केलेली चाळीतील खोली बेकायदा आहे, याची आम्हाला कल्पना होती.

ठाणे : आम्ही खरेदी केलेली चाळीतील खोली बेकायदा आहे, याची आम्हाला कल्पना होती. मात्र, आमच्या नगरसेवकाने ती कधीच तुटणार नाही, असे सांगितले होते. ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी आमच्याकडून पैसे घेऊन आम्हाला पाण्याची लाइन दिली, तर महावितरणच्या अधिकाºयांचे खिसे गरम केल्यावर त्यांनी आम्हाला विजेचे कनेक्शन दिले. जर आमची घरे तोडताय, तर आमची फसवणूक करणाºया भूमाफियांवर तुम्ही काय कारवाई करणार, आमच्याकडून पैसे घेऊन पाणी व वीजकनेक्शन देणाºया अधिकाºयांवर काय कारवाई करणार, असा संतप्त सवाल कारवाईत घर तुटलेल्या कोकणातील एका रहिवाशाने केला. असाच सूर उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा येथून दिव्यात राहायला आलेल्या अन्य रहिवाशांनीही लावला.दिव्यातील साबेगाव येथील साळवीनगरातील कांदळवनाच्या सरकारी जागेवरील ३९ चाळींवर जिल्हा प्रशासनाने सोमवारी धडक कारवाई केली. येथील चाळींमध्ये कोकणातील काही कुटुंबांसमवेत बहुतांशी उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा राज्यांतील असलेल्या हजारो रहिवाशांचे संसार उघड्यावर आले. अनेकांनी आपली गावाकडची जमीन विकून किंवा अंगावरील सोन्याचे दागिने विकून अडीच ते तीन लाख रुपयांत १० वर्षांपूर्वी ही घरे घेतली होती. या घरांचे नोटरी रजिस्ट्रेशन केलेली कागदपत्रेही रहिवासी कारवाई करणाºया अधिकाºयांना दाखवत होते. अधिकाºयांशी कारवाई रोखण्याकरिता हुज्जत घालत होते.पहिल्या चाळीतील दोन गाळ्यांवर पोकलेन मशीनने कारवाई सुरू होताच काही महिला धाय मोकलून रडू लागल्या. त्यांच्या कडेवर लहान पोरं होती. काहींच्या घरातील कर्ते पुरुष सकाळीच कामावर निघून गेले होते. घरातील सामानसुमान काढून घेण्याची संधीदेखील काहींना मिळाली नाही. पोलीस व अधिकारी विनंतीला धूप घालत नाहीत, हे पाहिल्यावर जमलेल्या काही तरुणांनी किरकोळ दगडफेक केली. मात्र, पोलिसांनी सौम्य लाठीमार करताच त्या तरुणांनी सुबाल्या केला. मग, काही पोलिसांनी आक्रमक झालेल्या महिला व पुरुषांना घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाच्या आदेशावरून कारवाई होत आहे. हस्तक्षेप करू नका. तुमचे जे म्हणणे आहे ते जिल्हाधिकाºयांना भेटून सांगा. मात्र, लोक त्यांच्या मुद्द्यावर ठाम होते. कांदळवनाच्या जागेवर घरे बांधत असताना पोलिसांनी किंवा जिल्हा प्रशासनाने त्यांना का विरोध केला नाही. तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयाने डोळ्यांवर कातडं का ओढून घेतले होते.