शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मुलांना सांगा, युद्धाच्या प्रेरणादायी कथा!

By admin | Updated: January 24, 2017 05:38 IST

देशाने राष्ट्रहितासाठी जी युध्दे केली आणि पराक्रम गाजविला, त्या पराक्रमांचा इतिहास आजच्या पिढीला माहिती नाही. देशाचा अभिमान

बदलापूर : देशाने राष्ट्रहितासाठी जी युध्दे केली आणि पराक्रम गाजविला, त्या पराक्रमांचा इतिहास आजच्या पिढीला माहिती नाही. देशाचा अभिमान सार्थपणे सांगणाऱ्या युद्धकथाच लहान मुलांना, विद्यार्थ्यांना सांगितल्या जात नाहीत, अशी खंत वीरमाता अनुराधा गोरे यांनी व्यक्त केली. १५ जानेवारीच्या लष्कर दिनाच्या पार्शवभूमीवर हे व्याख्यान झाले. ‘युध्दस्य कथा रम्य:’ या विषयावर गोरे बोलल्या. त्यात त्यांनी युद्धकथांचा मुद्दा उपस्थित केला. मूर्ती लहान आणि कीर्ती महान याप्रमाणे प्रख्यात असलेले तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यात प्रचंड हिम्मत होती. १९७१ च्या युद्धाच्या वेळी यशवंतराव चव्हाण यांनी एका क्षणात हवाई दलाला आक्र मणाचे आदेश दिले आणि आदेश दिल्यांनतर पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना कल्पना दिली. म्हणूनच आपण त्यावेळी युद्धात कमीत कमी जवान व युद्धसाहित्य गमावून युद्ध जिंकू शकलो होतो. त्यावेळेपासून ‘हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला’ असे म्हटले जाते, असा संदर्भ त्यांनी सांगितला. ‘सैन्य’ या शब्दातच प्रचंड ऊर्जा आहे. आपल्या कुटुंबियांपैकी कोणी सैन्यात आहे म्हटल्यावर घरात वेगळेच वातावरण तयार होत असते. प्रत्येकाच्या अंगात वेगळेच चैतन्य त्यामुळे निर्माण होत असल्याचा अनुभव मी वेळोवेळी घेतलेला आहे. तोच अनुभव नवीन पिढीला मिळावा, यासाठीच मी सतत फिरत असते. एखाद्या घरातील युवक जर युद्धात शहीद झाला, तर त्यांच्या घरातील वातावरण दु:खी असले तरी त्या दु:खातही त्यांच्यात देशाचा सार्थ अभिमान पाहावयास मिळतो, असा अनुभव गोरे यांनी सांगितला. देशात शांततेच्या काळात जे जवान कायम आपला घाम गाळत असतात. प्रत्यक्ष युद्धात कमी रक्त सांडून युद्ध सहज जिंकता येते, हे आपल्या तिन्ही दलातील जवानांनी अनेक वेळा दाखवून दिलेले आहे. जसवंत सिंह, सैतानसिंह, रामलिंग आदींसारख्या अनेक वीर जवानांच्या शौर्यकथांची डॉक्युमेंट्री काढून विद्यार्थ्यांना दाखवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ‘सुहृद’च्या उन्मेषा कीर्तने यांनी स्वागत व प्रास्तविक केले. (प्रतिनिधी)