शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

न्यायालयात साक्षीदारास अश्रू अनावर

By admin | Updated: March 23, 2017 01:27 IST

तब्बल ७४ जणांचा बळी घेणाऱ्या शीळ-डायघर येथील इमारत दुर्घटनेची ठाणे न्यायालयात सुनावणीसुरू झाली असून याप्रकरणातील

ठाणे : तब्बल ७४ जणांचा बळी घेणाऱ्या शीळ-डायघर येथील इमारत दुर्घटनेची ठाणे न्यायालयात सुनावणीसुरू झाली असून याप्रकरणातील आरोपी धनदांडगे असल्याने आपल्या जीवास धोका असल्याची भीती व्यक्त करताना तक्रारदारास न्यायालयातच रडू कोसळले. या प्रकरणाची संवेदनशील पार्श्वभूमी विचारात घेऊन तक्रारदारास पोलीस संरक्षण पुरवण्याची मागणी विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी यावेळी केली.शीळ-डायघर येथील लकी कम्पाउंडमध्ये बेकायदा उभारण्यात आलेली सात मजली इमारत ४ एप्रिल २०१३ रोजी कोसळली होती. तब्बल ७४ जणांचा बळी घेणाऱ्या या दुर्घटनेप्रकरणी विकासक, पालिका अधिकारी, नगरसेवक, पोलीस कर्मचारी आणि पत्रकारांसह २७ आरोपींना अटक करण्यात आली होती. या इमारतीच्या तळमजल्यावर शरीफउद्दीन अन्सारी यांचे कपड्याचे दुकान होते. या दुर्घटनेत तेदेखील जखमी झाले होते. दुर्घटनेनंतर त्यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला होता. हा जबाबच तक्रार म्हणून ग्राह्य धरून गुन्हे दाखल करण्यात आले होते. या बहुप्रतीक्षित प्रकरणाची सुनावणी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एन. करमरकर यांच्या न्यायालयात बुधवारी सुरू झाली. यावेळी न्यायालयाने शरीफउद्दीन अन्सारी यांची साक्ष तपासली. शरीफउद्दीन हे या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले होते. इमारतीचे बांधकाम अतिशय घिसाडघाईने करण्यात आले होते. अवघ्या ३-४ महिन्यांत संपूर्ण इमारत उभारण्यात आली होती, असे सांगून शरीफउद्दीन यांनी या प्रकरणातील पाच आरोपींची ओळख न्यायालयासमोर पटवली. याप्रकरणातील आरोपी धनदांडगे आहेत. त्यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगताना शरीफउद्दीन यांना भावना अनावर झाल्या. त्यांना न्यायालयातच रडू कोसळले. विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी त्यांना धीर दिला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शरीफउद्दीन यांना पोलीस संरक्षण पुरवण्याची मागणी अ‍ॅड. हिरे यांनी न्यायालयास केली. आरोपींची बाजू अ‍ॅड. बाबा शेख हे मांडत असून त्यांनी साक्षीदाराची उलटतपासणी सुरू केली आहे. (प्रतिनिधी)