शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

टीडीसीसीला ३० क८ोटींचा निव्वळ तर ११८ कोटींचा ढोबळ नफा; शेतकऱ्यांना इस्रायलला पाठवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 18:08 IST

बँकेच्या सेवा सहकारी बँकांच्या सचिवाना बँकेमार्फत वेतन देण्याचे सांगून त्यांनी जिल्ह्यात दुग्ध महासंघ सुरू करण्यासाठी बँक प्रयत्नशील असल्याचे पाटील यांनी सांगितले. वर्षभरात सात हजार कोटीच्या ठेवी वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्याचे पाटील यांनी नमुद केले

ठळक मुद्देकृषी विकासासाठी जिल्ह्यातील कृषी अभ्यासक शेतकऱ्यांना लवकरच इस्रायल देशात पाठवणारबँकेच्या सेवा सहकारी बँकांच्या सचिवाना बँकेमार्फत वेतनबँकेच्या सहा हजार २६२ कोटींच्या ठेवीवर्षभरात ३० कोटींचा निव्वळ तर ११८ कोटींचा ढोबळ नफा

ठाणे : राज्यातील जिल्हा बँक म्हणून प्रसिध्द असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेला वर्षभरात ३० कोटींचा निव्वळ तर ११८ कोटींचा ढोबळ नफा झाल्याचे मंगळवारी बँकेच्या ६० व्या वार्षिक सभेत अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी उघड केले. ठाणे, पालघर जिल्ह्यातील तरूणांना नवीन उद्योगधंदे उभारण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्यासह कृषी विकासासाठी जिल्ह्यातील कृषी अभ्यासक शेतकऱ्यांना लवकरच इस्रायल देशात पाठवण्याचे सुतोवासही त्यांनी यावेळी केले.येथील गडकरी रंगायतन येथे बँकेची वार्षिक सभा आज पार पडली. यावेळी व्यासपीठावर खासदार कपील पाटील यांच्यासह खासदार राजेंद्र गावीत, आमदार किसन कथोरे, संजय केळकर, पांडुरंग बरोरा, निरंजन डावखरे, विलास तरे आदीं आमदारांसह बँकेचे उपाध्यक्ष भाऊ कु-हाडे, माजी खासदार बाळीराम जाधव, बँकेचे संचालक मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भगिरथ भोईर उपस्थित होते. बँकेच्या सहा हजार २६२ कोटींच्या ठेवी असून त्यात वर्षभरात दोन हजार २५ कोटींची वाढ केल्याचे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्यातील जिल्हा बँकांमध्ये बँक आग्रेसर असल्याचेही त्यांनी सांगितले. वर्षभरात बँकेच्या नवीन ११ शाखा सुरू करण्यात आल्या. या पुढे आदिवासी, दुर्गम भागात प्राधान्याने शाखा सुरू करण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला.बँकेच्या सेवा सहकारी बँकांच्या सचिवाना बँकेमार्फत वेतन देण्याचे सांगून त्यांनी जिल्ह्यात दुग्ध महासंघ सुरू करण्यासाठी बँक प्रयत्नशील असल्याचे पाटील यांनी सांगितले. वर्षभरात सात हजार कोटीच्या ठेवी वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्याचे पाटील यांनी नमुद केले. यावेळी खासदार पाटील यांनी सेंद्रीय भाजीपाला उत्पादनाकडे शेतकऱ्यांना वळवण्याची अपेक्षा व्यक्त केली. या भाजीपाल्यामुळे केमीकल पोटात जाणार नाही आणि शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळेल. दूध, भाजीपाला आदी नाशिक, नगर आदी भागातून येतो. त्याला येथे आणून विकणे परवडते. मग आपल्या शेतकऱ्यांना का परवडत नाही. असा प्रश्न करून शेतकºयांना यासाठी बँकेने प्रोत्साहित करण्याची गरज असल्यचे पाटील यांनी सांगितले.या बँकेचे ११ वर्ष अध्यक्षपदी राहिलेले आर.सी.पाटील यांनी शेतकऱ्यांना वीज, पाणी मोफत देण्याचा ठराव मांडला. याशिवाय जिल्ह्यातील शेती, माती, रेती मच्छीमारी संपली असल्यामुळे शेतकऱ्यांना दोन टक्के व्यापमाफी देण्याची मागणी पाटील यांनी केली. यावेळी ठाणे, पालघरच्या उपस्थित नागरिकांनी त्यांच्या सूचना मांडून त्यांवर अंमलबजावणी करण्यासाठी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेbankबँक