शहरं
Join us  
Trending Stories
1
ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळली; ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसांनंतर अपघात झाल्याचे समजले
2
ऐतिहासिक! नितीश कुमार यांनी 10 व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
3
"महाराष्ट्रातील घडामोडींवर माझं लक्ष, तुमचा…’’, तक्रार घेऊन आलेल्या एकनाथ  शिंदेनां अमित शाहांचं मोठं आश्वासन
4
राज्यपालांवर वेळेची मर्यादा घालता येणार नाही; राष्ट्रपतींच्या 'त्या' प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
5
अल फलाह युनिव्हर्सिटीचे चेअरमन जावेद सिद्दीकी यांच्या अडचणी वाढल्या; आता घरावर चालणार बुलडोझर 
6
“डिसेंबर अखेरपर्यंत महामेट्रो मीरा-भाईंदरकरांच्या सेवेत येणार”: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
7
एक 'अशी' शूटर बनली नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये मंत्री; जिनं भारताबाहेर कायम ठेवलाय दबदबा
8
फातिमा सना शेखने फेमिनझमवर केलं भाष्य; म्हणाली, "पुरुषांना कमी दाखवणं म्हणजे..."
9
भारतीय लष्कराला बूस्ट! अमेरिकेने जेव्हलिन क्षेपणास्त्र विक्रीला दिली मंजुरी
10
प्रवाशांसाठी गुड न्यूज! कोकण रेल्वेवरील ‘या’ एक्स्प्रेसचा वेग वाढला; ४० मिनिटे लवकर पोहोचेल
11
Kandivali: कांदिवलीत भरदिवसा तिघांचा दुचाकीने येत इस्टेट एजंटवर गोळीबार!
12
सांगलीकर काळजी घ्या! ऊसाच्या शेतामध्ये बिबट्याची चार पिल्लं सापडली, एकच खळबळ
13
१७० खोल्या, क्रिकेट ग्राऊंड, गोल्फ कोर्स... बकिंघम पॅलेसपेक्षाही चार पट मोठं आहे भारतातील हे घर
14
"तुम्हाला भाजप आवडत आहे, तर तुम्ही काँग्रेसमध्ये कशाला थांबलात?"; माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाने शशी थरूर यांना सुनावले
15
ऐन निवडणुकीत शिंदेसेनेच्या २ उमेदवारांनी अर्ज घेतला मागे; उपजिल्हाप्रमुखांसह भाजपात केला प्रवेश
16
"ठाकरेंवर आरोप करणारी भाजपा २० वर्ष BMC मध्ये उपमहापौरपदी होती हे सोयीस्करपणे विसरते"
17
खंडोबा नवरात्र २०२५: खंडोबाचे षडरात्रोत्सव हा केवळ उत्सव नाही तर कुळाचार; पाहा पूजा साहित्य आणि व्रतविधी
18
Sonam Kapoor : सोनम कपूर दुसऱ्यांदा होणार आई, बेबी बंप फ्लॉन्ट करत केलं फोटोशूट; नवऱ्याची मजेशीर कमेंट
19
कूनोतून आली गुडन्यूज; भारतात जन्मलेल्या पहिल्या मादी चित्ता ‘मुखी’ने दिला 5 शावकांना जन्म
20
नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत हाॅकफोर्सचे पोलीस उपनिरिक्षक आशिष शर्मा यांना वीरमरण, जानेवारीत होणार होतं लग्न
Daily Top 2Weekly Top 5

टीबी इमारतीत पुन्हा कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:37 IST

ठाणे : जिल्ह्यात मागील चार ते पाच महिन्यांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारातील टीबीची इमारत ...

ठाणे : जिल्ह्यात मागील चार ते पाच महिन्यांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारातील टीबीची इमारत चार ते पाच महिन्यांपासून बंद करण्यात आली होती. त्यामुळे ट्रॉमा केअर सेंटरमधील १३० बेडवर उपचार सुरू होते. मात्र, दीड महिन्यापासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने ही टीबीची इमारत पुन्हा सुरू करण्यात आली आहे. तेथे १७० बेडची व्यवस्था आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील ३०० बेड पुन्हा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, मुरबाड, शहापूर तालुक्यात कोरोनाचे एकही केंद्र नसल्याने तेथील कोरोना रुग्णांचा भार जिल्हा सामान्य रुग्णालयावर पडत आहे.

जिल्ह्यात मार्च २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर एप्रिलमध्ये जिल्ह्यातील पहिले शासकीय कोविड रुग्णालय म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय घोषित करण्यात आले. तेव्हा तेथे ३०० बेडची व्यवस्था होती. त्यात कालांतराने रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील ३०० ऐवजी १३० बेड सुरू ठेवून उर्वरित टीबी इमारतीतील बेड बंद ठेवण्यात आले. मात्र, मागील दीड महिन्यापासून पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. तर, गेल्या दोन दिवसांपासून रुग्णांची संख्या तीन हजारांच्या पार गेली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण सेवा बंद केलेल्या १७० बेड पुन्हा रुग्ण सेवेसाठी सुरू करण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. गेल्या चार महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयातील ३०० पैकी १३० बेडवरच रुग्ण सेवा सुरू ठेवण्यात आली होती.

ग्रामीण भागाचा भार जिल्हा शासकीय रुग्णालयावर

- जिल्ह्यातील शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील कोरोना केंद्रे बंद करण्यात आली होती. मात्र, आता रुग्ण वाढत असून, या तालुक्यांत केंद्र नसल्याने तेथील रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी यावे लागत आहे. त्यामुळे या रुग्णालयावर त्या रुग्णांचा भार पडत आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाकडून या तालुक्यांतील केंद्रे पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

- दुसरीकडे ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा-भाईंदर, नवी मुंबई या शहरांत एकूण ११७ कोरोना अतिदक्षता केंद्रे आहेत. मात्र, ठाणे ग्रामीण क्षेत्रात सध्या एकही अतिदक्षता केंद्र नसल्याने येथील रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे.

-------------