शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

कल्याणमध्ये उद्यापासून टॅक्सी सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 00:03 IST

५० टॅक्सी धावणार। ट्रेनने लांबून आलेल्या प्रवाशांना देणार सुविधा

अनिकेत घमंडी ।लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : रेल्वेकडून देशभरात विविध ठिकाणी लांबपल्ल्यांच्या गाड्यांची सेवा सोमवार, १ जूनपासून सुरू होत आहे. या गाड्यांमधून येणाऱ्या प्रवाशांना आपल्या घरी जाता यावे, यासाठी कल्याण रेल्वे स्थानकातून ५० टॅक्सींची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पश्चिमेतून १ जूनच्या रात्रीपासून ही सेवा दिली जाईल, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी दिली.

लांबपल्ल्यांच्या गाड्यांमधून कल्याणला आलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी टॅक्सीबरोबरच एसटी, केडीएमटीच्या बस सोडण्यात येणार आहेत. बसचे नियोजन त्यांच्या यंत्रणा करणार आहेत. सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्यासाठी ५० टॅक्सी ठरावीक अंतरावर उभ्या करण्यात येतील. टॅक्सीचालकांना सॅनिटायझर व स्वच्छता ठेवण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

आरटीओ अधिकाऱ्यांकडे नोंद असलेल्या ५० टॅक्सीच स्टॅण्डवर उभ्या राहतील. आरटीओ अधिकारी तेथे लक्ष देणार आहेत. प्रवासी सुरक्षित राहावेत, यासाठी आवश्यक ती सर्व काळजी टॅक्सीचालकांना घ्यावी लागणार आहे. त्यासाठी त्यांना सुचनांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असेल. नियम न पाळणाºयांची परवानगीही रद्द केली जाऊ शकते, असे ससाणे म्हणाले.या भागांत असेल सेवा : कल्याण स्थानकातून या टॅक्सी शहापूर, मुरबाड, बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली, कल्याण ग्रामीण आदी भागांत सेवा देतील. १ जूनपासून पुढील आदेश येईपर्यंत ही सेवा सुरू राहील, असे ससाणे पुढे म्हणाले.