शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

करप्रणालीस विरोध; विकासाला खीळ

By admin | Updated: November 12, 2015 01:26 IST

ग्रामपंचायतीमधून क्षेत्रफळावर आधारित करण्यात येणाऱ्या करप्रणालीस एका याचिकाकर्त्याने विरोध करून उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने ग्रामपंचायतीकडून कराची आकारणी बंद झाली आहे

पालघर : ग्रामपंचायतीमधून क्षेत्रफळावर आधारित करण्यात येणाऱ्या करप्रणालीस एका याचिकाकर्त्याने विरोध करून उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने ग्रामपंचायतीकडून कराची आकारणी बंद झाली आहे. परिणामी, ग्रा.पं.चा आर्थिक डोलारा डळमळू लागला असून विकासाला खीळ बसून गावाना बकाल स्वरूप प्राप्त होत आहे.ग्रामपंचायतीकडून क्षेत्रफळावर आधारित असलेल्या करप्रणालीस एका ग्रामस्थाने विरोध करून ग्रामपंचायतीने (शासनाने) भांडवली मूल्यावर कराची आकारणी करावी, अशी मागणी करीत एका याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात शासनाविरोधात याचिका दाखल केल्याने अनेक महिन्यांपासून ग्रामपंचायतीकडून घरपट्टी, विद्युतपुरवठा, दाखले, घरांची नोंद उतारे (असेसमेंट उतारे), नवीन घरनोंदणी इ.च्या माध्यमातून मिळणाऱ्या कराची वसुली बंद झाली आहे. परिणामी, वरील माध्यमातून मिळणारा लाखो रुपयांचा करच बंद झाल्याने जिल्ह्यातील ४३० ग्रा.पं.पैकी बहुतांशी ग्रा.पं.चा आर्थिक डोलारा डळमळीत होऊन विकासकामांना खीळ बसली आहे. त्यामुळे पाणीपट्टी, करमणूक कर, बाजारकर इ. मर्यादित कराच्या आकारणीवरच ग्रा.पं.ना अवलंबून राहावे लागत असल्याने स्वच्छता, आरोग्य, दिवाबत्ती इ. गावाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबीवर खर्च करण्यास हाती पैसाच शिल्लक राहत नसल्याने गावामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून गटारांची घाण रस्त्यावर येऊन आरोग्य बिघडत चालले आहे. (वार्ताहर)पेसा कायद्यांतर्गत ५ टक्केचा निधी काही ग्रा.पं.कडे वर्ग झाला असला तरी तो निधी खर्च करण्याची परवानगी अजून देण्यात आली नसल्याने ग्रा.पं.चा आर्थिक डोलारा डळमळला आहे. न्यायालयाने सध्या क्षेत्रफळावर आधारित करनियमावली रद्द करून शासनाला नवीन नियमावली बनविण्याचे आदेश दिले असून एप्रिल महिन्यापासून नवीन नियमावली बनविण्याचे काम सुरू असल्याचे कळते. त्यामुळे शासनाच्याही वेळकाढू धोरणामुळे नवीन नियमावली न्यायालयापुढे सादर केली जात नसल्याने न्यायालयाचा निर्णय होऊन करवसुलीचा मार्ग सध्या तरी मोकळा होणार नसल्याने ग्रा.पं.अंतर्गत गावाची आरोग्य व स्वच्छतेबाबत हेळसांड सुरूच राहणार असल्याचे सातपाटीचे ग्रा.पं.चे सरपंच विश्वास पाटील यांनी सांगितले.