शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

ठाण्यात करवसुली दणक्यात, मालमत्ता विभागाची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:37 IST

ठाणे महापालिकेने वसुलीसाठी विविध मार्गांचा अवलंब केल्यानंतर मालमत्ता कर, एलबीटी, शहर विकास विभाग आदींसह इतर काही महत्वाच्या विभागांची वसुली मागील वर्षीच्या तुलनेत अधिक झाली आहे

ठाणे : ठाणे महापालिकेने वसुलीसाठी विविध मार्गांचा अवलंब केल्यानंतर मालमत्ता कर, एलबीटी, शहर विकास विभाग आदींसह इतर काही महत्वाच्या विभागांची वसुली मागील वर्षीच्या तुलनेत अधिक झाली आहे. मालमत्ताकराची वसुली मागील वर्षीच्या तुलनेत ५३.५४ कोटींपेक्षा अधिक झाली आहे. दुसरीकडे शहर विकास विभाग, जाहिरात विभाग, अग्निशमन दल आदींची वसुली मात्र मागील वर्षीच्या तुलनेत कमी झाली आहे.ठाणे महापालिकेमार्फत यंदा विविध करांची वसुली करण्यासाठी नाना शकला अवलंबविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये त्यांना काही अंशी यशही आले आहे. मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी काही ठिकाणी सील ठोकण्यात आले तर काही ठिकाणी पालिकेने जप्तीची कारवाईही केली. त्यामुळे मालमत्ता कर विभागाला यंदा ५५० कोटींचे लक्ष्य दिले असतांना या विभागाने आतापर्यंत एप्रिल ते २२ आॅक्टोबर या कालावधीत २५१.३१ कोटींची वसुली केली आहे. मागील वर्षी हीच वसुली १९७.७७ कोटीं एवढी होती. मागील वर्षीच्या तुलनेत ही वाढ ५३.५४ कोटींनी अधिक आहे. स्थानिक संस्था कर बंद झाला असला तरी, मागील वर्षीच्या तुलनेत या विभागामार्फत १३६.८८ कोटींची जास्तीची वसुली झाली आहे. मागील वर्षी या कालावधीत ३८६.३९ कोटींची वसुली झाली होती. यंदा मात्र ५२३.२७ कोटींची वसुली पालिकेने केली आहे.शहर विकास विभागाकडून मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ७० कोटींची कमी वसुली झाली आहे. मागील वर्षी या विभागामार्फत आतापर्यंत २७१.५६ कोटींची वसुली झाली होती. यंदा मात्र ती २००.९८ कोटींवर गेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १८.५२ कोटींनी आघाडीवर आला आहे. मागील वर्षी या विभागाने ९.४१ कोटींची वसुली केली होती. यंदा मात्र या विभागाने केवळ २७.९३ कोटींची वसुली केली आहे. जाहिरात विभागानेही यंदा घोर निराशा केली आहे. मागील वर्षी या विभागाकडून ९.३७ कोटींची वसुली झाली होती. यंदा मात्र त्यात ३.३७ कोटींची घट आली आहे. यंदा या विभागाने सहा कोटींचीच वसुली केली आहे. तसेच अग्निशमन विभागाकडून देखील मागील वर्षीच्या तुलनेत १४.१० कोटींची कमी वसुली केली आहे. मागील वर्षी या विभागाने ३४.१७ कोटींची वसुली केली होती. यंदा मात्र २०.०७ कोटींचीच वसुली झाली आहे.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारthaneठाणे