शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

स्वच्छतागृहातील नळ व इतर साहित्याची होते चोरी उल्हासनगर रेल्वे स्टेशनवरील स्वच्छतागृह बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2021 16:35 IST

चाकरमान्यांची कुचंबणा

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूचे बांधलेले नवीन स्वच्छतागृह बंद असल्याने, चाकरमान्यांची कुचंबणा होत आहे. स्टेशन व्यवस्थापक मनोहर चौधरी यांनी स्वच्छतागृहात चोरी होत असल्याने व ठेक्यावर घेण्यास कोणी ठेकेदार इच्छुक नसल्याने स्वच्छतागृह बंद ठेवल्याची माहिती स्टेशन चौधरी यांनी दिली. 

उल्हासनगर रेल्वे स्टेशन मधून दररोज हजारो नागरिक ये-जा करतात. नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नं- १ व २ वर स्वच्छतागृह बांधले आहे. मात्र प्लॅटफॉर्म नं-१ वर स्वच्छतागृह बंद ठेवण्यात येत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. नागरिकांच्या मागणीनुसार शिवसेनेचे नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून स्टेशनच्या पश्चिम बाजूला ३ वर्षांपूर्वी स्वच्छतागृह बांधले. मात्र त्याचा फायदा नागरिकांना होत नाही. समाजसेवक प्रशांत चंदनशिव यांनी याबाबत रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही स्वच्छतागृह बंद आहे. चाकरमान्यांकडून स्वच्छतागृह सुरू करण्याची मागणी स्टेशन व्यवस्थापक यांच्याकडे होऊनही, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. 

रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रं-१ वर लाखो रुपये खर्चून बांधलेले स्वच्छतागृह सुरू करा. असा पाठपुरावा रेल्वे प्रवासी संघटनेने केला. मात्र त्यांनाही यश आले नाही. स्वच्छतागृह चालविण्यासाठी कोणीही ठेकेदार पुढे येत नसून, स्वच्छतागृहातून दोन वेळा नळ व इतर साहित्य चोरीला गेले. त्यांच्या भीतीतून स्वच्छतागृह बंद ठेवण्यात आल्याचे स्टेशन कार्यालयाने सांगितले. रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला नशेखोर, गर्दुल्ले, भुरटे चोर, गुन्हेगार आदींचा वावर असल्याने, त्यांच्या भीतीतून स्वच्छतागृह चालविण्यास घेत नसल्याचे बोलले जात आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी याबाबत लक्ष घातल्यास स्टेशनचा विकास होऊन, स्वच्छतागृह सुरू होणार असल्याचे बोलले जाते. स्टेशन व्यवस्थापक मनोहर चौधरी यांनी स्टेशन मध्ये सीआरपीएफ पोलिसांची संख्या अपुरी असल्याने, असे प्रकार घडत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे