शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

तानशेत, उंबरमाळीत लोकलमध्ये चढणे झाले धोकादायक, प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 06:46 IST

कसा-याकडे जाणारी तानशेत (थानशिट) आणि उंबरमाळी ही मध्य रेल्वेच्या मार्गावरील दोन स्थानके प्रवाशांना प्रवासासाठी अत्यंत धोकादायक बनली असून....

भातसानगर : कसा-याकडे जाणारी तानशेत (थानशिट) आणि उंबरमाळी ही मध्य रेल्वेच्या मार्गावरील दोन स्थानके प्रवाशांना प्रवासासाठी अत्यंत धोकादायक बनली असून येथून गाडीत चढउतार करणे, ही तारेवरची कसरतच ठरत आहे.अनेक वर्षांपूर्वीपासूनची ही स्थानके असून येथे फलाटच नाही. तर, प्रवाशांना रेल्वेत चढउतार करण्यासाठी धक्का तयार करण्यात आलेला आहे. मात्र, तोही अनेक ठिकाणी तुटल्याने त्यात पाय अडकून पडण्याच्या आणि कधी रेल्वेखाली जाण्याच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच, या कठड्याला असणारा मातीचा भराव पावसाने वाहून गेल्याने कठड्यावर चढणेही धोक्याचे झाले आहे. तानशेत आणि उंबरमाळी या स्थानकांवर रेल्वे पूर्णपणे थांबल्यानंतरच काळजीपूर्वक उतरावे लागत आहे. जर का चढताना, उतरताना तोल गेला, तर रेल्वेखाली जाण्याची भीती आहे. या स्थानकांवरून शेकडो प्रवासी जीव मुठीत धरून दररोज असा प्रवास करत असतात.या स्थानकांसाठीच्या सुविधांसाठी अनेकदा मागणी करूनही ती स्थानके तोट्यात असल्याच्या कारणाखाली त्यांना सुविधा मिळत नसल्याचे अधिकारी सांगतात. ही गोष्ट जरी खरी असली तरी फायद्यात असलेल्या स्थानकांचा निधी जर येथे वापरला, तर निरपराधांचे जीव तरी वाचतील, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. या स्थानकांसाठीचा विकास व्हावा, यासाठी प्रवासी संघटना सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांना हवे तसे यश अजूनही मिळाले नसल्याचे संघटनांचे पदाधिकारी सांगतात.यासंदर्भात रेल्वे अधिकाºयांना विचारले असता त्यांनी सांगितले की, हे स्थानक तोट्यात असल्यामुळे या दोन्ही ठिकाणी सुविधा देता येत नाही. त्या द्यायच्या म्हटल्यास रेल्वेवर त्याचा बराच ताण पडतो. त्यामुळे त्या मागण्या आजपर्यंत पूर्ण होऊ शकल्या नसल्याचे त्यांनी सांगितले.आम्ही संघटनेच्या माध्यमातून या स्थानकांच्या सुविधेसाठी सातत्याने मागणी करत असून माजी खा. सुरेश टावरे यांच्या कारकिर्दीत निदान हे कठडे तरी झाले. मात्र, इतर कुणीही त्यासाठी खास प्रयत्न केले नाहीत.-शैलेश राऊत, कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटना

 

टॅग्स :central railwayमध्ये रेल्वे