शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

तानशेत, उंबरमाळीत लोकलमध्ये चढणे झाले धोकादायक, प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 06:46 IST

कसा-याकडे जाणारी तानशेत (थानशिट) आणि उंबरमाळी ही मध्य रेल्वेच्या मार्गावरील दोन स्थानके प्रवाशांना प्रवासासाठी अत्यंत धोकादायक बनली असून....

भातसानगर : कसा-याकडे जाणारी तानशेत (थानशिट) आणि उंबरमाळी ही मध्य रेल्वेच्या मार्गावरील दोन स्थानके प्रवाशांना प्रवासासाठी अत्यंत धोकादायक बनली असून येथून गाडीत चढउतार करणे, ही तारेवरची कसरतच ठरत आहे.अनेक वर्षांपूर्वीपासूनची ही स्थानके असून येथे फलाटच नाही. तर, प्रवाशांना रेल्वेत चढउतार करण्यासाठी धक्का तयार करण्यात आलेला आहे. मात्र, तोही अनेक ठिकाणी तुटल्याने त्यात पाय अडकून पडण्याच्या आणि कधी रेल्वेखाली जाण्याच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच, या कठड्याला असणारा मातीचा भराव पावसाने वाहून गेल्याने कठड्यावर चढणेही धोक्याचे झाले आहे. तानशेत आणि उंबरमाळी या स्थानकांवर रेल्वे पूर्णपणे थांबल्यानंतरच काळजीपूर्वक उतरावे लागत आहे. जर का चढताना, उतरताना तोल गेला, तर रेल्वेखाली जाण्याची भीती आहे. या स्थानकांवरून शेकडो प्रवासी जीव मुठीत धरून दररोज असा प्रवास करत असतात.या स्थानकांसाठीच्या सुविधांसाठी अनेकदा मागणी करूनही ती स्थानके तोट्यात असल्याच्या कारणाखाली त्यांना सुविधा मिळत नसल्याचे अधिकारी सांगतात. ही गोष्ट जरी खरी असली तरी फायद्यात असलेल्या स्थानकांचा निधी जर येथे वापरला, तर निरपराधांचे जीव तरी वाचतील, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. या स्थानकांसाठीचा विकास व्हावा, यासाठी प्रवासी संघटना सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांना हवे तसे यश अजूनही मिळाले नसल्याचे संघटनांचे पदाधिकारी सांगतात.यासंदर्भात रेल्वे अधिकाºयांना विचारले असता त्यांनी सांगितले की, हे स्थानक तोट्यात असल्यामुळे या दोन्ही ठिकाणी सुविधा देता येत नाही. त्या द्यायच्या म्हटल्यास रेल्वेवर त्याचा बराच ताण पडतो. त्यामुळे त्या मागण्या आजपर्यंत पूर्ण होऊ शकल्या नसल्याचे त्यांनी सांगितले.आम्ही संघटनेच्या माध्यमातून या स्थानकांच्या सुविधेसाठी सातत्याने मागणी करत असून माजी खा. सुरेश टावरे यांच्या कारकिर्दीत निदान हे कठडे तरी झाले. मात्र, इतर कुणीही त्यासाठी खास प्रयत्न केले नाहीत.-शैलेश राऊत, कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटना

 

टॅग्स :central railwayमध्ये रेल्वे