शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
4
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
5
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
6
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
7
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
8
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
9
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
10
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
11
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
12
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
13
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
14
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
15
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
16
Gold Rate Today 15 May: एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
17
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
18
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
19
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
20
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

तानसा धरण भरले;ठाणे जिल्ह्यात सरासरी १४६ मिमी जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 17:09 IST

ठाणे जिल्ह्यास पाणी पुरवठा करणा-या बारवी धरणात ६६.६८ टक्के पाणी साठा तयार आहे. तर वाढीव पाणी साठ्यानुसार बारवीत ४५.८७ टक्के पाणी साठा तयार झाला आहे.

ठळक मुद्देभातसा धरणा सध्या १२८.४८ मीटर पाण्याची पातळी बारवी धरणात ६६.६८ टक्के पाणी साठा तयार आहेतानसा नदीवरील व मोडक सागरच्या वैतरणा नदी काठावरील ३३ गावाना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा

ठाणे : जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्येही पावसाचा जोर कायम आहे. यामुळे तानसा धरण भरले आहे. या तानसा नदी काठावरील गांवाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या २४ तासाच्या कालावधीत एक हजार २७.९८ मिमी. पाऊस पडला असून जिल्हा प्रशासनाने या पावसाची सरासरी १४६.८५ मिमी. नोंद घेतली आहे.तानसासह वैतरणा नदीवरील मोडकसागर धरण भरणाच्या स्थितीत असल्यामुळे या दोन्ही नदी काठावरील गावाना सतर्क राहाण्याचा इशारा दहा दिवसांपूर्वीच दिला होता. यानुसार तानसा धरण गुरूवारी दुपारी २.३० वाजता भरून वाहत आहे. तानसा धरणाची आज ४२१.९६ फूट पाण्याची पातळी होताच ते भरून वाहू लागले आहे. मोडकसागर धरणाची आज ५२९.८५ फूट पाण्याची पातळी आहे. भातसा धरणा सध्या १२८.४८ मीटर पाण्याची पातळी तयार झाली आहे. तर ठाणे जिल्ह्यास पाणी पुरवठा करणा-या बारवी धरणात ६६.६८ टक्के पाणी साठा तयार आहे. तर वाढीव पाणी साठ्यानुसार बारवीत ४५.८७ टक्के पाणी साठा तयार झाला आहे. या पाणी पुरवठा करणा-या धरणांमध्ये पावसाचा जोर कायम राहिल्यास काही दिवसांमध्ये अन्यही धरण भरून वाहण्याची दाट शक्यता आहे.जिल्ह्यातील या मुसळधार पावसा दरम्यान कल्याणच्या पालव सीटी जवळील इमारतीतीत वीजेचे मीटर असलेल्या बोर्डला आग लागली होती. तर उल्हासनग-४ च्या परिसरातील नाल्याची भिंत पडली. यात कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही. तर तानसा धरणाखालील तानसा नदीवरील व मोडक सागरच्या वैतरणा नदी काठावरील ३३ गावाना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा जारी केला आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस भिवंडी तालुक्यात २०० मिमी, तर या खालोखाल उल्हासनगरमध्ये १७५, कल्याणला १५३, अंबरनाथला १५२.६०, शहापूरला १५० आणि ठाणे येथे १११ मिमी. पाऊस पडला. सर्वात कमी पाऊस मुरबाड तालुक्यात अवघा ८६ मिमी . पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

टॅग्स :thaneठाणेDamधरण