शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
3
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
4
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
5
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
6
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
7
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
8
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
9
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
10
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
11
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
12
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
13
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
14
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
15
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
16
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
17
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
18
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
19
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
20
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
Daily Top 2Weekly Top 5

तानसा धरण भरले;ठाणे जिल्ह्यात सरासरी १४६ मिमी जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 17:09 IST

ठाणे जिल्ह्यास पाणी पुरवठा करणा-या बारवी धरणात ६६.६८ टक्के पाणी साठा तयार आहे. तर वाढीव पाणी साठ्यानुसार बारवीत ४५.८७ टक्के पाणी साठा तयार झाला आहे.

ठळक मुद्देभातसा धरणा सध्या १२८.४८ मीटर पाण्याची पातळी बारवी धरणात ६६.६८ टक्के पाणी साठा तयार आहेतानसा नदीवरील व मोडक सागरच्या वैतरणा नदी काठावरील ३३ गावाना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा

ठाणे : जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्येही पावसाचा जोर कायम आहे. यामुळे तानसा धरण भरले आहे. या तानसा नदी काठावरील गांवाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या २४ तासाच्या कालावधीत एक हजार २७.९८ मिमी. पाऊस पडला असून जिल्हा प्रशासनाने या पावसाची सरासरी १४६.८५ मिमी. नोंद घेतली आहे.तानसासह वैतरणा नदीवरील मोडकसागर धरण भरणाच्या स्थितीत असल्यामुळे या दोन्ही नदी काठावरील गावाना सतर्क राहाण्याचा इशारा दहा दिवसांपूर्वीच दिला होता. यानुसार तानसा धरण गुरूवारी दुपारी २.३० वाजता भरून वाहत आहे. तानसा धरणाची आज ४२१.९६ फूट पाण्याची पातळी होताच ते भरून वाहू लागले आहे. मोडकसागर धरणाची आज ५२९.८५ फूट पाण्याची पातळी आहे. भातसा धरणा सध्या १२८.४८ मीटर पाण्याची पातळी तयार झाली आहे. तर ठाणे जिल्ह्यास पाणी पुरवठा करणा-या बारवी धरणात ६६.६८ टक्के पाणी साठा तयार आहे. तर वाढीव पाणी साठ्यानुसार बारवीत ४५.८७ टक्के पाणी साठा तयार झाला आहे. या पाणी पुरवठा करणा-या धरणांमध्ये पावसाचा जोर कायम राहिल्यास काही दिवसांमध्ये अन्यही धरण भरून वाहण्याची दाट शक्यता आहे.जिल्ह्यातील या मुसळधार पावसा दरम्यान कल्याणच्या पालव सीटी जवळील इमारतीतीत वीजेचे मीटर असलेल्या बोर्डला आग लागली होती. तर उल्हासनग-४ च्या परिसरातील नाल्याची भिंत पडली. यात कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही. तर तानसा धरणाखालील तानसा नदीवरील व मोडक सागरच्या वैतरणा नदी काठावरील ३३ गावाना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा जारी केला आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस भिवंडी तालुक्यात २०० मिमी, तर या खालोखाल उल्हासनगरमध्ये १७५, कल्याणला १५३, अंबरनाथला १५२.६०, शहापूरला १५० आणि ठाणे येथे १११ मिमी. पाऊस पडला. सर्वात कमी पाऊस मुरबाड तालुक्यात अवघा ८६ मिमी . पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

टॅग्स :thaneठाणेDamधरण