शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागासह महावितरणच्या परवानगीअभावी टँकरमुक्ती रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:15 IST

ठाणे : ठाणे जिल्हा टँकरमुक्त करण्यासाठी जिल्हा पातळीवर विविध योजना हाती घेण्यात येत आहेत. परंतु, असे असले ...

ठाणे : ठाणे जिल्हा टँकरमुक्त करण्यासाठी जिल्हा पातळीवर विविध योजना हाती घेण्यात येत आहेत. परंतु, असे असले तरी जिल्हा टँकरमुक्त होण्यात आजही अनेक अडचणी आहेत. ग्रामीण भागात या योजना राबविताना, जागेचा प्रश्न प्रामुख्याने भेडसावत असून वन विभाग, महावितरणकडून मिळणाऱ्या परवानग्यांसाठी होणाऱ्या दिरंगाईमुळेदेखील पाणीपुरवठा योजना लांबणीवर पडत आहेत. त्यामुळेच ग्रामीण भागातील अनेक पाणीपुरवठा योजना गेल्या काही वर्षांपासून रखडल्या आहेत. त्यामुळेच टँकरमुक्तीचा जागर केला जात असला तरी तूर्तास या परवानग्यांमुळे ते शक्य नसल्याचे दिसत आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथ या पाच तालुक्यात साधारणत: फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस अथवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पाणी टंचाई भेडसावण्यास सुरुवात होते. अशावेळी गावपाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर ओढवते. तर, पाण्यासाठी येथील नागरिकांना मैलोनमैल पायपीट करावी लागते. या सर्वाची गांभीर्याने दाखल घेऊन केंद्र व राज्य शासनाच्या पाणी पुरवठ्याच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने आराखडा तयार केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजना, नळ पाणीपुरवठा योजना, पूरक नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. मात्र, या योजना राबविताना अनेकदा पाण्याची टाकी उभारण्यासाठी निर्माण होणारा जागेचा प्रश्न, ती उपलब्ध झाल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींतील हेवेदावे अशा अडीअडचणींचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागातील दुर्गम व आदिवासी गावपाड्यांवर पाणीपुरवठा योजना राबविताना पाइपलाइन टाकतांना वन विभागाच्या जागेसह विद्युत विभागाची देखील आवश्यकता असते, त्यासाठी लागणारे इस्टिमेटदेखील महावितरणकडून मागविण्यात येते. मात्र,ते प्राप्त होण्यासाठी विलंब होत असल्याने अनेक योजनांच्या कामांचा वेग मंदावत आहे. या सर्व प्रक्रिया पार पाडत असताना, होणाऱ्या विलंबामुळे जिल्ह्यातील पाणी पुरवठ्याच्या अनेक योजनांचे काम संथगतीने सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे अनेक योजना रखडलेल्या आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हा टँकरमुक्त करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असताना दुसरीकडे येणाऱ्या अडचणींमुळे टँकरमुक्त ठाणे जिल्ह्याचे स्वप्न पूर्ण होण्यास विलंब होणार असेच चित्र सध्या दिसत आहे.