शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

वनविभागासह महावितरणच्या परवानगीअभावी टँकरमुक्ती रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:15 IST

ठाणे : ठाणे जिल्हा टँकरमुक्त करण्यासाठी जिल्हा पातळीवर विविध योजना हाती घेण्यात येत आहेत. परंतु, असे असले ...

ठाणे : ठाणे जिल्हा टँकरमुक्त करण्यासाठी जिल्हा पातळीवर विविध योजना हाती घेण्यात येत आहेत. परंतु, असे असले तरी जिल्हा टँकरमुक्त होण्यात आजही अनेक अडचणी आहेत. ग्रामीण भागात या योजना राबविताना, जागेचा प्रश्न प्रामुख्याने भेडसावत असून वन विभाग, महावितरणकडून मिळणाऱ्या परवानग्यांसाठी होणाऱ्या दिरंगाईमुळेदेखील पाणीपुरवठा योजना लांबणीवर पडत आहेत. त्यामुळेच ग्रामीण भागातील अनेक पाणीपुरवठा योजना गेल्या काही वर्षांपासून रखडल्या आहेत. त्यामुळेच टँकरमुक्तीचा जागर केला जात असला तरी तूर्तास या परवानग्यांमुळे ते शक्य नसल्याचे दिसत आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथ या पाच तालुक्यात साधारणत: फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस अथवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पाणी टंचाई भेडसावण्यास सुरुवात होते. अशावेळी गावपाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर ओढवते. तर, पाण्यासाठी येथील नागरिकांना मैलोनमैल पायपीट करावी लागते. या सर्वाची गांभीर्याने दाखल घेऊन केंद्र व राज्य शासनाच्या पाणी पुरवठ्याच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने आराखडा तयार केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजना, नळ पाणीपुरवठा योजना, पूरक नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. मात्र, या योजना राबविताना अनेकदा पाण्याची टाकी उभारण्यासाठी निर्माण होणारा जागेचा प्रश्न, ती उपलब्ध झाल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींतील हेवेदावे अशा अडीअडचणींचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागातील दुर्गम व आदिवासी गावपाड्यांवर पाणीपुरवठा योजना राबविताना पाइपलाइन टाकतांना वन विभागाच्या जागेसह विद्युत विभागाची देखील आवश्यकता असते, त्यासाठी लागणारे इस्टिमेटदेखील महावितरणकडून मागविण्यात येते. मात्र,ते प्राप्त होण्यासाठी विलंब होत असल्याने अनेक योजनांच्या कामांचा वेग मंदावत आहे. या सर्व प्रक्रिया पार पाडत असताना, होणाऱ्या विलंबामुळे जिल्ह्यातील पाणी पुरवठ्याच्या अनेक योजनांचे काम संथगतीने सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे अनेक योजना रखडलेल्या आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हा टँकरमुक्त करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असताना दुसरीकडे येणाऱ्या अडचणींमुळे टँकरमुक्त ठाणे जिल्ह्याचे स्वप्न पूर्ण होण्यास विलंब होणार असेच चित्र सध्या दिसत आहे.