ठाणे : तिवरे धरण खेकड्यांनी पोखरल्याने फुटले, असे बेताल वक्तव्य करणारे जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांची उच्चशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पाठराखण केली आहे. ही चूक त्यांची नसून त्यांना ब्रीफ करणाºया अधिकाऱ्यांची असल्याचा दावा तावडे यांनी केला. सावंत यांना सोडून त्यांनी अधिकाºयांनाच दोषी ठरवल्याने संताप व्यक्त होत आहे.
जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी ठाण्यात भाजपाच्या संघटनापर्व सदस्यता अभियान २०१९ च्या शुभारंभासाठी ते आले होते. यावेळी त्यांनी खरे कारण काय आहे, बांधकाम कच्चे होते, यात भ्रष्टाचार झाला आहे का? याची चौकशी होणे गरजेचे असल्याचेही सांगितले. दुसरीकडे आव्हाडांनी केलेले आंदोलन हा केवळ एक स्टंट असून, जर त्यांना या घटनेचे खरोखरच गांभीर्य असते, तर त्यांनी असे आंदोलन करण्यापेक्षा त्या ठिकाणी जाऊन मदत केली असती, अशी टीका त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे दोघे एकत्रित करत असलेल्या दौºयाबाबत त्यांना छेडले असता, आदित्य म्हणजे नवीन पिढीसाठी एक चांगली गोष्ट असून त्यांच्याकडून ज्या पद्धतीने दौरे सुरू आहेत, ते स्वागतार्हच आहे.
ठाण्यातील संघटना पर्व सदस्यता अभियान २०१९ निमित्त मराठी कलाकार अशोक समेळ, अभिजित चव्हाण, संतोष जुवेकर, खगोलतज्ज्ञ दा.कृ. सोमण, उद्योजक समीर नातू आणि रवींद्र प्रभुदेसाई यांनी भाजपा सदस्यनोंदणी करून भाजपात प्रवेश केला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.राजकारण हा माझा विषय नाही. खगोलशास्त्र हा माझा विषय आहे. परंतु, भारताची प्रगती घडवायची असेल, तर वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक आहे. विज्ञानाचा प्रचार होणे गरजेचे आहे. म्हणून, भाजप आणि त्याचे नेतृत्व यांच्याकडून जनतेला आशा आहे, यासाठीच मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे. देशाची अनेक दृष्टीने प्रगती होत असल्याने प्रत्येकाने त्यात आपले योगदान देणे गरजेचे आहे.- दा.कृ. सोमण : ज्येष्ठ खगोलतज्ज्ञमला अभिमान वाटत आहे, मी सदस्य झाल्याचा. ज्या पक्षाला देशातील जनतेने एकमताने कौल दिला. देशाची सेवा करण्याची संधी दिली आणि आता ती सेवा करण्याची संधी मलासुद्धा आता यानिमित्ताने मिळणार आहे. कलाकार, तंत्रज्ञ या सर्वांच्या समस्या सोडवण्याची गरज असून त्या सोडवण्यासाठी शासनदरबारी मागणी करणार आहे.- अभिजित चव्हाण : सिनेकलावंत