शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

त्या कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पालिका यंत्रणेवर कठोर कारवाई करा : मनसेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 18:36 IST

पालिकेच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाग्रस्ताला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

ठळक मुद्देकोरोनाग्रस्ताच्या मृत्यूस पालिका यंत्रणा जबाबदार - मनसे संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी - संदीप पाचंगे पालिका आयुक्तांना मनसेचे निवेदन

ठाणे : ठाणे महापालिकेच्या संबंधित यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे एका ५९ वर्षीय कोरोनाग्रस्त व्यक्तीला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप करीत या प्रकरणात निष्काळजीपणा करुन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या त्या संबंधिताची चौकशी होऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी मनसेने केली आहे. याबाबत मनसेने महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.

भिवंडी येथे राहणारे वासुदेव पाल यांना ६ सप्टेंबर रोजी ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णाची कोरोना चाचणी केल्यानंतर त्यांचा अहवाल २४ तासांत येणे अपेक्षित असताना तब्बल तीन दिवसांनी म्हणजेच ९ सप्टेंबरला त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आला. या रुग्णाला बाकीचे देखील आजार होते. पाल यांच्या नातेवाईकांनी महापालिका अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करुनही बाळकूम येथील कोव्हीड हॉस्पीटलमध्ये रुग्णालयात दाखल केले जात नव्हते. अखेर १३ सप्टेंबरला ठाणे महापालिकेच्या ग्लोबल हॉस्पीटमलमध्ये आणले आणि १२ तासांत हा रुग्ण दगावला असे मनसेने या निवेदनात म्हटले आहे. महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे माझ्या सासºयाचा मृत्यू झाला अशी तक्रार त्यांचे जावई अखिलेश पाल यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्याकडे केली. या प्रकरणाची तात्काळ दखल घेत पाचंगे यांनी निष्काळजीपणा करणाºया संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे.---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------*मृत व्यक्तीस वेळीच उपचार मिळाले असते तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते. यासंदर्भात संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे आणि मनसे या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहणार आहे.- संदीप पाचंगे, ठाणे जिल्हाध्यक्ष मनविसे*या प्रकरणाची चौकशी करुन निर्णय घेतला जाईल.- संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका*सासऱ्यांना कोव्हीड हॉस्पीटलमध्ये आयसीयु बेड मिळावा यासाठी ठाणे महापालिकेतील संबंधित अधिकाºयांना विनवण्या करीत होतो. कळवा हॉस्पीटल हे कोव्हीड हॉस्पीटलमध्ये नसतानाही त्यांना पाच दिवस तेथे दाखल करुन घेतले होते आणि सहाव्या दिवशी ग्लोबल हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले. हे वेळीच झाले असते तर आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला नसता.े- अखिलेश पाल, मृताचे नातेवाईक

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या