शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

पद्मश्री पुरस्कार प्राप्त व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन सामाजिक कार्य करावे : भैय्याजी जोशी

By अनिकेत घमंडी | Updated: April 11, 2023 18:58 IST

संघ स्वयंसेवकांचा सत्कार, अभ्युदय प्रतिष्ठान संस्थेचा कार्यक्रम.

डोंबिवली: पद्मश्री पुरस्कार प्राप्त व्यक्तीकडे पाहिल्यावर त्या पुरस्कारांचा सन्मान होताना दिसून येतो. या व्यक्तींनी त्यांच्या भौतिक गरजापेक्षा त्यांच्या सन्मानाचा स्तर वाढला पाहिजे, यासाठी प्रयत्न केला आहे. या सगळ्य़ा मंडळीचे काम प्रेरणा देणारे आहे. विचारांना दिशा देणारे काम आहे. ते काम समजून घेतले पाहिजे आणि या मार्गावर आपण ही चालले पाहिजे. त्यांच्या कामातून प्रेरणा घेऊन त्याला सामाजिक कृतीत आणण्याची गरज आहे, असे प्रतिपादन रा.स्व. संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य सुरेश (भैय्याजी) जोशी यांनी व्यक्त केले.

येथील अभ्युदय प्रतिष्ठानतर्फे डोंबिवलीत पद्म पुरस्कार प्राप्त संघ स्वयंसेवकांचा गौरव सोहळा टिळकनगर शाळेच्या पटांगणात सोमवारी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी भैय्याजी जोशी बोलत होते. त्या सोहळयात गिरीश प्रभूणे, प्रभाकर मांडे, रमेश पतंगे, भिकूजी (दादा) इदाते, गजानन माने यांचा सन्मान करण्यात आला. प्रभाकर मांडे या कार्यक्रमाला काही कारणामुळे उपस्थित राहू शकले नाही.

यावेळी रा.स्व. संघाचे कोकण प्रांत कार्यवाह विठ्ठल कांबळे, सत्कारमूर्ती गिरीश प्रभुणे, गजानन माने,रमेश पतंगे, दादा इदाते,अभ्युदय प्रतिष्ठान डोंबिवलीचे अध्यक्ष श्रीपाद जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. जोशी पुढे म्हणाले की पद्मश्री पुरस्कार पूर्वी कोणाला मिळत होते हे समजत नव्हते. पण गेल्या काही वर्षापासून एक नवीन अनुभव घेत आहे. अर्ज येतात मग त्यांची छाननी होते. या व्यासपीठावरील मंडळी पुरस्कारासाठी काही धडपड न करणारी आहेत. पुरस्कार यांच्याकडे चालत आले आहेत.

पुरस्कारासाठी व्यक्ती शोधताना दृष्टी नीट नसेल योग्य व्यक्तींना पुरस्कार मिळायला अनेक वर्ष जावी लागतात. समाजातील मोठा वर्ग अनेक गोष्टीपासून उपेक्षित आहे ,कोणी जीवनावश्यक अनेक गोष्टीपासून वंचित आहे. पैसे मिळाला म्हणून सगळे मिळते असे नाही. पैसे कसा ही मिळविता येतो. पण समाजातील हा असा दुर्लक्षित, उपेक्षित असलेला मोठा वर्ग आपली वाट पाहत आहे. त्यांच्या अपेक्षा कोण पूर्ण करणार आहे? कोण त्यांना आपल्या बरोबरीने उभे करणार आहे? त्यांना आपल्या बरोबरीने चालण्याचे साम्थर्य कोण देणार आहे? संघाच्या संस्कारातून आपण आलो आहे.

संघाच्या विचारांशी बांधिलकी आहे. आणि संघाची बांधिलकीचा अर्थच सामाजिक बांधिलकी आहे. ही बांधिलकी कर्मप्रमण करणारी असली पाहिजे. निराशा करणारी असू नये. सत्काराचा असे कार्यक्रम आपल्याला विचार करायला लावणारे आहेत, असे ही त्यांनी सांगितले. टिळकनगर शिक्षण मंडळ, कल्याण जनता सहकारी बॅक, जनकल्याण समिती, अखिल भारतीय साहित्य परिषद, गणेश मंदिर संस्थान, उज्वल चॅरिटेबल ट्रस्ट यांनी सत्कारमूर्तीचा सत्कार केला.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीthaneठाणे