शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
3
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
4
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
5
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
6
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
7
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
8
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
9
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
10
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
11
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
12
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
13
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
14
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
15
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
16
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
17
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
18
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
19
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
20
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना

स्मशानभूमींचा तत्काळ निर्णय घ्या

By admin | Updated: March 30, 2017 06:35 IST

स्मशानभूमीच्या मुद्यावरील वातावरण आता आणखी तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पोखरण-१ आणि २ भागातील

ठाणे : स्मशानभूमीच्या मुद्यावरील वातावरण आता आणखी तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पोखरण-१ आणि २ भागातील स्मशानभूमींना यापूर्वी विरोध झाला होता. परंतु, आता या भागातील स्मशानभूमींची कामे मार्गी लागावीत, या उद्देशाने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच धाव घेतल्यानंतर त्यांच्या पत्राची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनीदेखील यासंदर्भात तत्काळ निर्णय घेण्याचे आदेश त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.मागील महासभेच्या वेळेस भार्इंदरपाडा भागात होणाऱ्या सामूहिक स्मशानभूमीच्या मुद्यावरून राजकारण तापले आहे. तिला विरोध करताना पोखरण-१ आणि २ भागांतील स्मशानभूमींचा मुद्दा आधी मार्गी लावा, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी परिषा सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांनी केली होती. विशेष म्हणजे साधारणपणे दीड वर्षापूर्वीदेखील या स्मशानभूमीच्या मुद्यावरून सरनाईकविरुद्ध राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक असा वाद निर्माण झाला होता. पोखरण भागातील स्मशानभूमीला राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने विरोध केला होता. त्यामुळे तिचे काम रखडले होते. परंतु, आता भार्इंदरपाडा स्मशानभूमीच्या निमित्ताने पुन्हा या दोन्ही स्मशानभूमींचा मुद्दा सरनाईक यांनी रेटून धरला आहे. महासभेत त्यांनी केलेल्या मागणीला प्रशासनाने प्रतिसाद न दिल्याने अखेर त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेऊन निवेदनही सादर केले आहे. या निवेदनामध्ये पोखरण रोड नं. १ परिसरातील वर्तकनगर, शास्त्रीनगर, लोकमान्यनगर, शिवाईनगर तसेच पोखरण रोड नं. २ परिसरातील वसंत विहार, लोकपुरम, हिरानंदानी मिडोज व टिकुजिनीवाडी परिसरात हिंदू समाजाची लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात असून या परिसरात येऊरच्या पायथ्याशी रामबाग येथे एकमेव स्मशानभूमी उपलब्ध होती. परंतु, तिचा वन खात्याच्या जागेतून जाणारा रस्ता हा न्यायालयाच्या आदेशानुसार बंद केला असून आता तेथे जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसल्याने ती बंद अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल महापालिका प्रशासनाकडे ८ वर्षांपासून सतत पाठपुरावा करूनसुद्धा कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने आमदार प्रताप सरनाईक यांनी या पत्राद्वारे नाराजी व्यक्त केली आहे.तसेच पोखरण रोड नं. १ आणि २ परिसरात महापालिकेचे स्मशानभूमीचे आरक्षण नसल्याने विकासकाकडून आलेल्या सुविधा भूखंडावर ती उभारल्यास हा प्रश्न सुटू शकेल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी) राजकीय नेते प्रस्ताव रद्द करतात एखाद्या सुविधा भूखंडावर प्रस्ताव ठेवला की, विकासक हा राजकीय नेते अथवा महापालिका अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सदरचा प्रस्ताव रद्द करतो, असा आरोपही सरनाईक यांनी केला असून ज्याप्रमाणे भार्इंदरपाडा येथील ग्रामस्थांचा विरोध झुगारून सर्व धर्मीयांच्या स्मशानभूमी, दफनभूमी, कबरस्थानाला मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे पोखरण रोड नं. १ आणि २ परिसरात स्मशानभूमीची निर्मिती करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्याची दखल घेऊन तत्काळ निर्णय घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.