शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

बेकायदा लॉजवर त्वरित कारवाई करा

By admin | Updated: March 23, 2017 01:25 IST

ठाणे ग्रामीण पोलिसांनी मीरा भार्इंदरमधील अनैतिक व्यवसायाची केंद्र बनलेल्या बार व लॉजची बेकायदा बांधकामे पाडण्याचे

मीरा रोड : ठाणे ग्रामीण पोलिसांनी मीरा भार्इंदरमधील अनैतिक व्यवसायाची केंद्र बनलेल्या बार व लॉजची बेकायदा बांधकामे पाडण्याचे सांगूनही चार महिन्यात कारवाई झाली नाही. हे अत्यंत खेदजनक असल्याचे सांगत आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी उपायुक्त दीपक पुजारी यांना चांगलेच खडसावले. कारवाई करुन अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. ‘लोकमत’च्या १९ मार्चच्या अंकात ‘पालिकेचे बेकायदा लॉजला अभय’ हे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची आयुक्तांनी गंभीर दखल घेतली.मीरा भार्इंदरमधील आॅर्केट्रा बार व लॉजमध्ये सर्रास शरीरविक्रय व्यवसाय तसेच अनैतिक प्रकार चालत असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईत स्पष्ट झाले आहे. हे अड्डे कायमचे मोडून काढायचे असतील तर बार, लॉजची अनधिकृत बांधकामे पाडण्याची भूमिका त्यावेळी तत्कालिन पोलीस अधीक्षक नवल बजाज यांनी घेतली होती. स्थानिक पोलिसांससह ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी पालिका आयुक्तांना वारंवर पत्र देऊन बेकायदा लॉज, बार जमीनदोस्त करण्याची विनंती केली होती. दुसरीकडे उपायुक्त पुजारी यांनी गेल्या आठवड्यात शहरातील काही आर्केस्ट्रा बार व लॉज चालकांची स्वत:च्या दालनात बैठक बोलावून केवळ लपण्यासाठी तयार केलेल्या खोल्या पाडा असा प्रेमळ सल्ला दिल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. ‘लोकमत’मधील बातमीनंतर आयुक्त डॉ. गीते यांनी या प्रकरणी अतिक्रमण विरोधी पथकाचे उपायुक्त दीपक पुजारी यांना खरमरीत पत्र दिले आहे. वारंवार पत्र देवून चार महिन्यांचा कालावधी गेला. मात्र कारवाई केली नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)