शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नेवाळी आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:43 IST

कोरेगाव भीमा आंदोलनात दाखल केलेले गुन्हे राज्य सरकारने मागे घेतले. मात्र, हक्काच्या शेतजमिनी परत मिळवण्यासाठी वर्षभरापूर्वी झालेल्या नेवाळी आंदोलनातील शेतकरी

कल्याण : कोरेगाव भीमा आंदोलनात दाखल केलेले गुन्हे राज्य सरकारने मागे घेतले. मात्र, हक्काच्या शेतजमिनी परत मिळवण्यासाठी वर्षभरापूर्वी झालेल्या नेवाळी आंदोलनातील शेतकरी व आंदोलकर्त्यांविरोधातील गंभीर गुन्हे सरकारने मागे घेतलेले नाहीत. ते गुन्हा मागे घ्यावेत, अशी मागणी नेवाळी ग्रामस्थ आणि आंदोलकांनी केली आहे.१९४२ मध्ये ब्रिटिश सरकारने नेवाळी येथे विमानतळासाठी एक हजार ६०० हेक्टर जागा ताब्यात घेतली होती. देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी ही जागा शेतकऱ्यांना अद्याप परत केलेली नाही. आता त्याच जागेवर संरक्षक भिंत नौदलाने बांधण्यास सुरुवात केली आहे. त्याविरोधात वर्षभरापूर्वी २२ जून २०१७ ला नेवाळी येथे झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. याप्रकरणी शेकडो आंदोलकाविरोधात गंभीर गुन्हे पोलिसांनी दाखल केले.नेवाळी आंदोलनाला एक वर्ष झाल्यानिमित्त शुक्रवारी नेवाळी आंदोलन जागर सभा चिंचवली येथील समाज मंदिरात झाली. याप्रसंगी भाजपा नेते जगन्नाथ पाटील, शिवसेना आमदार सुभाष भोईर, काँग्रसेचे नेते संतोष केणे, जमीन बचाव संघर्ष समितीचे मथूर म्हात्रे, चैनू जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.वर्ष उलटले तरी सरकारने नेवाळी आंदोलनानंतर हा प्रश्न सोडवण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कायदेशीर मार्गाने हा लढा देण्यासाठी चांगल्या वकिलांची फौज निर्माण करावी लागेल. नेवाळी येथील शेतजमीन परत न मिळाल्याने हे आंदोलन झाले. मात्र, सरकारने पुन्हा भाभा अणुसंशोधन संशोधन केंद्रासाठी येथील १३ एकर जागा घेण्याचा घाट घातला आहे. त्यालाही ग्रामस्थांचा विरोध असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.नेत्यांनी नेवाळी आंदोलकांची फसवणूक केली आहे. जो नेता आपले प्रश्न सोडवित नाही. त्याला मतदान करू नका. त्याला निवडून देऊ नका. आपल्या गावात पक्षाचा झेंडा नको. त्याऐवजी एकीचा झेंडा लावा, अशी विविध मते या सभेतून पुढे आली. आमदार सुभाष भोईर यांनी सांगितले की, नेवाळीचा प्रश्न सुटला नाही, हे मी मान्य करतो. मात्र त्यासाठी प्रयत्नच झाले नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. मी, आमदार गणपत गायकवाड आणि जगन्नाथ पाटील यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. माझ्यासाठी पक्ष नाही, तर समाज महत्त्वाचा आहे. समाजाचा प्रश्न सुटणार नसेल तर आमदारकीवर लाथ मारण्याची तयारी आहे. आमदारकी पाच वर्षांकरीता आहे. समाज जीवनभर आहे. मात्र, आपल्याच समाजातील काही लोक आमचे पाय खेचून अन्य समाजातील नेत्यांची मखलाशी करतात, अशी टीका भोईर यांनी केली.केणे यांनी सांगितले की, नेवाळी आंदोलनाचा दिवस हा काळा दिवस नाही. शेतकरी, समाजाला जागा करणारा जागृत दिन आहे. शेतकºयांवर गोळा चालविणाºया सरकारला हद्दपार करण्याची वेळ आली आहे.