शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

नेवाळी आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:43 IST

कोरेगाव भीमा आंदोलनात दाखल केलेले गुन्हे राज्य सरकारने मागे घेतले. मात्र, हक्काच्या शेतजमिनी परत मिळवण्यासाठी वर्षभरापूर्वी झालेल्या नेवाळी आंदोलनातील शेतकरी

कल्याण : कोरेगाव भीमा आंदोलनात दाखल केलेले गुन्हे राज्य सरकारने मागे घेतले. मात्र, हक्काच्या शेतजमिनी परत मिळवण्यासाठी वर्षभरापूर्वी झालेल्या नेवाळी आंदोलनातील शेतकरी व आंदोलकर्त्यांविरोधातील गंभीर गुन्हे सरकारने मागे घेतलेले नाहीत. ते गुन्हा मागे घ्यावेत, अशी मागणी नेवाळी ग्रामस्थ आणि आंदोलकांनी केली आहे.१९४२ मध्ये ब्रिटिश सरकारने नेवाळी येथे विमानतळासाठी एक हजार ६०० हेक्टर जागा ताब्यात घेतली होती. देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी ही जागा शेतकऱ्यांना अद्याप परत केलेली नाही. आता त्याच जागेवर संरक्षक भिंत नौदलाने बांधण्यास सुरुवात केली आहे. त्याविरोधात वर्षभरापूर्वी २२ जून २०१७ ला नेवाळी येथे झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. याप्रकरणी शेकडो आंदोलकाविरोधात गंभीर गुन्हे पोलिसांनी दाखल केले.नेवाळी आंदोलनाला एक वर्ष झाल्यानिमित्त शुक्रवारी नेवाळी आंदोलन जागर सभा चिंचवली येथील समाज मंदिरात झाली. याप्रसंगी भाजपा नेते जगन्नाथ पाटील, शिवसेना आमदार सुभाष भोईर, काँग्रसेचे नेते संतोष केणे, जमीन बचाव संघर्ष समितीचे मथूर म्हात्रे, चैनू जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.वर्ष उलटले तरी सरकारने नेवाळी आंदोलनानंतर हा प्रश्न सोडवण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कायदेशीर मार्गाने हा लढा देण्यासाठी चांगल्या वकिलांची फौज निर्माण करावी लागेल. नेवाळी येथील शेतजमीन परत न मिळाल्याने हे आंदोलन झाले. मात्र, सरकारने पुन्हा भाभा अणुसंशोधन संशोधन केंद्रासाठी येथील १३ एकर जागा घेण्याचा घाट घातला आहे. त्यालाही ग्रामस्थांचा विरोध असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.नेत्यांनी नेवाळी आंदोलकांची फसवणूक केली आहे. जो नेता आपले प्रश्न सोडवित नाही. त्याला मतदान करू नका. त्याला निवडून देऊ नका. आपल्या गावात पक्षाचा झेंडा नको. त्याऐवजी एकीचा झेंडा लावा, अशी विविध मते या सभेतून पुढे आली. आमदार सुभाष भोईर यांनी सांगितले की, नेवाळीचा प्रश्न सुटला नाही, हे मी मान्य करतो. मात्र त्यासाठी प्रयत्नच झाले नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. मी, आमदार गणपत गायकवाड आणि जगन्नाथ पाटील यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. माझ्यासाठी पक्ष नाही, तर समाज महत्त्वाचा आहे. समाजाचा प्रश्न सुटणार नसेल तर आमदारकीवर लाथ मारण्याची तयारी आहे. आमदारकी पाच वर्षांकरीता आहे. समाज जीवनभर आहे. मात्र, आपल्याच समाजातील काही लोक आमचे पाय खेचून अन्य समाजातील नेत्यांची मखलाशी करतात, अशी टीका भोईर यांनी केली.केणे यांनी सांगितले की, नेवाळी आंदोलनाचा दिवस हा काळा दिवस नाही. शेतकरी, समाजाला जागा करणारा जागृत दिन आहे. शेतकºयांवर गोळा चालविणाºया सरकारला हद्दपार करण्याची वेळ आली आहे.