शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

नाले कचऱ्याने तुंबल्याप्रकरणी मीरा भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा

By धीरज परब | Updated: March 12, 2023 14:17 IST

झोपडपट्टीतील अनेक रहिवाशी तर कचरा हा थेट नाला व खाडीत टाकत आहेत . त्यामुळे त्या त्या भागातील नाले व खाड्या हे कचऱ्याने जाम झाल्या आहेत

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कामचुकारपणा मुळे शहरातील अनेक नाले व खाडी कचऱ्याने तुंबले आहेत . त्या कचऱ्यात बंदी असलेल्या प्लास्टिक पिशाच्यांचा मोठा समावेश असून अश्या बेजबाबदार व फुकट पगार खाणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची मागणी विविध स्तरातून केली जात आहे. 

कायद्याने कचरा हा ओला व सुका असा वेगळा करून तो पालिकेच्या सफाई कामगार वा कचरा गाड्यात टाकणे बंधनकारक आहे . सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे दंडनीय अपराध आहे . मात्र पालिकेच्या आरोग्य विभागातील मुकादम - स्वच्छता निरीक्षक पासून संबंधित विभागाचे उपायुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांच्या भोंगळ कामचुकारपणा मुळे शहरातील अनेक झोपडपट्टी व निवासी इमारती , गावठाण आदी परिसरातील नाले व खाड्या हे कचरा कुंड्या बनल्या आहेत. 

झोपडपट्टीतील अनेक रहिवाशी तर कचरा हा थेट नाला व खाडीत टाकत आहेत . त्यामुळे त्या त्या भागातील नाले व खाड्या हे कचऱ्याने जाम झाल्या आहेत . त्या कचऱ्यात बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा मोठा खच दिसून येतो . त्यामुळे पालिकेची प्लास्टिक पिशव्यां विरोधातील कारवाई देखील निव्वळ धूळफेक व दिखाऊ असल्याचे आरोप होत आहेत. दरवर्षी ही परिस्थिती असताना महापालिकेचे अधिकारी आणि स्थानिक माजी नगरसेवक - राजकारणी नागरिकांना नाला व खाडी मध्ये कचरा टाकू नका म्हणून  प्रभावी जनजागृती तसेच प्रबोधन करत नाहीत . तसेच कचरा टाकणाऱ्यांवर व्यापक प्रमाणात कायदेशीर कारवाईची मोहीम राबवत नाही. नाले व खाड्या कचऱ्याने तुंबल्याने दुर्गंधी पसरून रोगराईचा प्रश्न निर्माण होतो. तर शहरात सफसफाईचा ढोल बडवणाऱ्या पालिकेच्या स्वच्छता मोहिमेचा देखील बुरखा फाटला आहे. 

नाले व खाड्या कचऱ्याने तुंबल्या असून त्यात बेकायदा कचरा टाकणाऱ्यांना रोखले जात नाही . प्लास्टिक पिशव्याचा सुळसुळाट आहे. त्यामुळे दरवर्षी करोडोंचा खर्च नालेसफाईसाठी केला जातो. याला महापालिका अधिकाऱ्यांचा निगरगट्ट कामचुकारपणा जबाबदार असून त्यांना तात्काळ सेवेतून निलंबित करून गुन्हे दाखल करावेत. - कृष्णा गुप्ता ( अध्यक्ष - सत्यकाम फाऊंडेशन  )  

 

भावना तिवाडी ( अध्यक्ष - भावना फाऊंडेशन ) -  पालिका बाहेरून शहर स्वच्छ दाखवते पण आत मध्ये अतिशय गलिच्छपणा आहे .  झोपडपट्टी भागातील नाले कचऱ्याने वर्षभर तुंबलेले असताना कचरा नाल्यात टाकू नका म्हणून जनजागृती केली जात नाही . अधिकारी व माजी नगरसेवक हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात . अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे .