शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

नाले कचऱ्याने तुंबल्याप्रकरणी मीरा भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा

By धीरज परब | Updated: March 12, 2023 14:17 IST

झोपडपट्टीतील अनेक रहिवाशी तर कचरा हा थेट नाला व खाडीत टाकत आहेत . त्यामुळे त्या त्या भागातील नाले व खाड्या हे कचऱ्याने जाम झाल्या आहेत

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कामचुकारपणा मुळे शहरातील अनेक नाले व खाडी कचऱ्याने तुंबले आहेत . त्या कचऱ्यात बंदी असलेल्या प्लास्टिक पिशाच्यांचा मोठा समावेश असून अश्या बेजबाबदार व फुकट पगार खाणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची मागणी विविध स्तरातून केली जात आहे. 

कायद्याने कचरा हा ओला व सुका असा वेगळा करून तो पालिकेच्या सफाई कामगार वा कचरा गाड्यात टाकणे बंधनकारक आहे . सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे दंडनीय अपराध आहे . मात्र पालिकेच्या आरोग्य विभागातील मुकादम - स्वच्छता निरीक्षक पासून संबंधित विभागाचे उपायुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांच्या भोंगळ कामचुकारपणा मुळे शहरातील अनेक झोपडपट्टी व निवासी इमारती , गावठाण आदी परिसरातील नाले व खाड्या हे कचरा कुंड्या बनल्या आहेत. 

झोपडपट्टीतील अनेक रहिवाशी तर कचरा हा थेट नाला व खाडीत टाकत आहेत . त्यामुळे त्या त्या भागातील नाले व खाड्या हे कचऱ्याने जाम झाल्या आहेत . त्या कचऱ्यात बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा मोठा खच दिसून येतो . त्यामुळे पालिकेची प्लास्टिक पिशव्यां विरोधातील कारवाई देखील निव्वळ धूळफेक व दिखाऊ असल्याचे आरोप होत आहेत. दरवर्षी ही परिस्थिती असताना महापालिकेचे अधिकारी आणि स्थानिक माजी नगरसेवक - राजकारणी नागरिकांना नाला व खाडी मध्ये कचरा टाकू नका म्हणून  प्रभावी जनजागृती तसेच प्रबोधन करत नाहीत . तसेच कचरा टाकणाऱ्यांवर व्यापक प्रमाणात कायदेशीर कारवाईची मोहीम राबवत नाही. नाले व खाड्या कचऱ्याने तुंबल्याने दुर्गंधी पसरून रोगराईचा प्रश्न निर्माण होतो. तर शहरात सफसफाईचा ढोल बडवणाऱ्या पालिकेच्या स्वच्छता मोहिमेचा देखील बुरखा फाटला आहे. 

नाले व खाड्या कचऱ्याने तुंबल्या असून त्यात बेकायदा कचरा टाकणाऱ्यांना रोखले जात नाही . प्लास्टिक पिशव्याचा सुळसुळाट आहे. त्यामुळे दरवर्षी करोडोंचा खर्च नालेसफाईसाठी केला जातो. याला महापालिका अधिकाऱ्यांचा निगरगट्ट कामचुकारपणा जबाबदार असून त्यांना तात्काळ सेवेतून निलंबित करून गुन्हे दाखल करावेत. - कृष्णा गुप्ता ( अध्यक्ष - सत्यकाम फाऊंडेशन  )  

 

भावना तिवाडी ( अध्यक्ष - भावना फाऊंडेशन ) -  पालिका बाहेरून शहर स्वच्छ दाखवते पण आत मध्ये अतिशय गलिच्छपणा आहे .  झोपडपट्टी भागातील नाले कचऱ्याने वर्षभर तुंबलेले असताना कचरा नाल्यात टाकू नका म्हणून जनजागृती केली जात नाही . अधिकारी व माजी नगरसेवक हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात . अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे .