शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

नाले कचऱ्याने तुंबल्याप्रकरणी मीरा भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा

By धीरज परब | Updated: March 12, 2023 14:17 IST

झोपडपट्टीतील अनेक रहिवाशी तर कचरा हा थेट नाला व खाडीत टाकत आहेत . त्यामुळे त्या त्या भागातील नाले व खाड्या हे कचऱ्याने जाम झाल्या आहेत

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कामचुकारपणा मुळे शहरातील अनेक नाले व खाडी कचऱ्याने तुंबले आहेत . त्या कचऱ्यात बंदी असलेल्या प्लास्टिक पिशाच्यांचा मोठा समावेश असून अश्या बेजबाबदार व फुकट पगार खाणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची मागणी विविध स्तरातून केली जात आहे. 

कायद्याने कचरा हा ओला व सुका असा वेगळा करून तो पालिकेच्या सफाई कामगार वा कचरा गाड्यात टाकणे बंधनकारक आहे . सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे दंडनीय अपराध आहे . मात्र पालिकेच्या आरोग्य विभागातील मुकादम - स्वच्छता निरीक्षक पासून संबंधित विभागाचे उपायुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांच्या भोंगळ कामचुकारपणा मुळे शहरातील अनेक झोपडपट्टी व निवासी इमारती , गावठाण आदी परिसरातील नाले व खाड्या हे कचरा कुंड्या बनल्या आहेत. 

झोपडपट्टीतील अनेक रहिवाशी तर कचरा हा थेट नाला व खाडीत टाकत आहेत . त्यामुळे त्या त्या भागातील नाले व खाड्या हे कचऱ्याने जाम झाल्या आहेत . त्या कचऱ्यात बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा मोठा खच दिसून येतो . त्यामुळे पालिकेची प्लास्टिक पिशव्यां विरोधातील कारवाई देखील निव्वळ धूळफेक व दिखाऊ असल्याचे आरोप होत आहेत. दरवर्षी ही परिस्थिती असताना महापालिकेचे अधिकारी आणि स्थानिक माजी नगरसेवक - राजकारणी नागरिकांना नाला व खाडी मध्ये कचरा टाकू नका म्हणून  प्रभावी जनजागृती तसेच प्रबोधन करत नाहीत . तसेच कचरा टाकणाऱ्यांवर व्यापक प्रमाणात कायदेशीर कारवाईची मोहीम राबवत नाही. नाले व खाड्या कचऱ्याने तुंबल्याने दुर्गंधी पसरून रोगराईचा प्रश्न निर्माण होतो. तर शहरात सफसफाईचा ढोल बडवणाऱ्या पालिकेच्या स्वच्छता मोहिमेचा देखील बुरखा फाटला आहे. 

नाले व खाड्या कचऱ्याने तुंबल्या असून त्यात बेकायदा कचरा टाकणाऱ्यांना रोखले जात नाही . प्लास्टिक पिशव्याचा सुळसुळाट आहे. त्यामुळे दरवर्षी करोडोंचा खर्च नालेसफाईसाठी केला जातो. याला महापालिका अधिकाऱ्यांचा निगरगट्ट कामचुकारपणा जबाबदार असून त्यांना तात्काळ सेवेतून निलंबित करून गुन्हे दाखल करावेत. - कृष्णा गुप्ता ( अध्यक्ष - सत्यकाम फाऊंडेशन  )  

 

भावना तिवाडी ( अध्यक्ष - भावना फाऊंडेशन ) -  पालिका बाहेरून शहर स्वच्छ दाखवते पण आत मध्ये अतिशय गलिच्छपणा आहे .  झोपडपट्टी भागातील नाले कचऱ्याने वर्षभर तुंबलेले असताना कचरा नाल्यात टाकू नका म्हणून जनजागृती केली जात नाही . अधिकारी व माजी नगरसेवक हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात . अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे .